शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"माझी मुलगी कोविड वॉर्डात डॉक्टर होती, मला माहितेय टाळी-थाळीचे महत्त्व"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 20:05 IST

mansukh mandaviya : मनसुख मंडाविया म्हणाले, कोरोना वॉरियर्स, देशाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या.

नवी दिल्ली : कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण केल्याच्या आणि आकडे लपवण्याच्या आरोपाचे खंडन करताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, कोरोना महामारीविषयी कधीही राजकारण केले नाही. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची नोंद राज्ये करीत आहेत. केंद्र सरकारने कधीही कोणत्याही राज्यात कमी प्रकरणे नोंदविण्यास सांगितले नाही. (my daughter was a doctor in covid ward i know the encouragement raised by thali and clapping says mansukh mandaviya)

"मी भारत सरकारचा मंत्री आहे, याआधी मी एका मुलीचा बाप आहे. माझी मुलगी ज्यावेळी कोरोना संकट काळात डॉक्टर म्हणून कोविड वॉर्डात काम करत होती. अशावेळी तिच्या आई-वडिलांची काय परिस्थिती असते? माझ्या मुलीने स्वतःहून सांगितले होते की ती त्या वॉर्डात काम करेल आणि तिने काम सुरू केले. त्यावेळी मला थाळी-टाळीचे महत्व पटले होते. आम्हाला धैर्य मिळाले", असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला टाळी-थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते, त्यावरून विरोधकांकडून सातत्याने मोदी सरकारवर टीका करण्यात आली. मनसुख मंडाविया म्हणाले, "कोरोना वॉरियर्स, देशाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या. बरेच सदस्य म्हणाले की, केंद्र सरकार कोरोना मृत्यूदराची आकडेवारी लपवत आहे. मात्र राज्य सरकार जे देते तेच केंद्र सरकार प्रकाशित करते. सरकारने कोणालाही कमी आकडेवारी देण्यास सांगितले नाही." 

मनसुख मंडाविया पुढे म्हणाले, "भारतासारखा देश कोणावरही अवलंबून राहू शकत नाही, त्यामुळे पंतप्रधानांनी बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि वैज्ञानिकांना त्वरित लसीवर काम करण्याचे निर्देश दिले. भारताने  123 देशांना औषध पुरवठा केला होता, त्यापैकी 64 देशांनी भारताचे आभार मानले होते. ज्यावेळी कोरोनाटी दुसरी लाट चालू होती आणि आम्हाला औषधांची बरीच गरज होती, त्यावेळी अमेरिकेने म्हटले होते की, भारताने आम्हाला त्वरित मदत केली होती, हे आपण विसरू शकत नाही."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajya Sabhaराज्यसभा