शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

"माझी मुलगी कोविड वॉर्डात डॉक्टर होती, मला माहितेय टाळी-थाळीचे महत्त्व"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 20:05 IST

mansukh mandaviya : मनसुख मंडाविया म्हणाले, कोरोना वॉरियर्स, देशाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या.

नवी दिल्ली : कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण केल्याच्या आणि आकडे लपवण्याच्या आरोपाचे खंडन करताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, कोरोना महामारीविषयी कधीही राजकारण केले नाही. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची नोंद राज्ये करीत आहेत. केंद्र सरकारने कधीही कोणत्याही राज्यात कमी प्रकरणे नोंदविण्यास सांगितले नाही. (my daughter was a doctor in covid ward i know the encouragement raised by thali and clapping says mansukh mandaviya)

"मी भारत सरकारचा मंत्री आहे, याआधी मी एका मुलीचा बाप आहे. माझी मुलगी ज्यावेळी कोरोना संकट काळात डॉक्टर म्हणून कोविड वॉर्डात काम करत होती. अशावेळी तिच्या आई-वडिलांची काय परिस्थिती असते? माझ्या मुलीने स्वतःहून सांगितले होते की ती त्या वॉर्डात काम करेल आणि तिने काम सुरू केले. त्यावेळी मला थाळी-टाळीचे महत्व पटले होते. आम्हाला धैर्य मिळाले", असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला टाळी-थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते, त्यावरून विरोधकांकडून सातत्याने मोदी सरकारवर टीका करण्यात आली. मनसुख मंडाविया म्हणाले, "कोरोना वॉरियर्स, देशाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या. बरेच सदस्य म्हणाले की, केंद्र सरकार कोरोना मृत्यूदराची आकडेवारी लपवत आहे. मात्र राज्य सरकार जे देते तेच केंद्र सरकार प्रकाशित करते. सरकारने कोणालाही कमी आकडेवारी देण्यास सांगितले नाही." 

मनसुख मंडाविया पुढे म्हणाले, "भारतासारखा देश कोणावरही अवलंबून राहू शकत नाही, त्यामुळे पंतप्रधानांनी बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि वैज्ञानिकांना त्वरित लसीवर काम करण्याचे निर्देश दिले. भारताने  123 देशांना औषध पुरवठा केला होता, त्यापैकी 64 देशांनी भारताचे आभार मानले होते. ज्यावेळी कोरोनाटी दुसरी लाट चालू होती आणि आम्हाला औषधांची बरीच गरज होती, त्यावेळी अमेरिकेने म्हटले होते की, भारताने आम्हाला त्वरित मदत केली होती, हे आपण विसरू शकत नाही."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajya Sabhaराज्यसभा