शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पापुआ न्यू गिनीला मुखर्जींची भेट

By admin | Updated: April 29, 2016 05:11 IST

४ लाख लोकसंख्येचे पोर्ट मोर्सबी शहर त्याची राजधानी.

सुरेश भटेवरा,

पोर्ट मोर्सबी-तेल, नैसर्गिक वायू, सोने आणि घनदाट जंगलांच्या नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला पापुआ न्यू गिनी हा भारताच्या अतिपूर्वेकडचा छोटासा देश. प्रशांत महासागराचा ८00 कि.मी.लांबीचा विस्तीर्ण किनारा लाभलेल्या या देशात साधारणत: ८0 लाखांची लोकवस्ती आहे. ४ लाख लोकसंख्येचे पोर्ट मोर्सबी शहर त्याची राजधानी. भारतातर्फे या देशाला भेट देणारे प्रणव मुखर्जी हे पहिलेच राष्ट्रपती. साहजिकच इथल्या राजकीय नेतृत्वापासून सामान्य जनतेला त्यांच्या दोन दिवसांच्या ऐतिहासिक भेटीविषयी कमालीचे अप्रुप आहे.पापुआ न्यू गिनी देखील भारताप्रमाणेच ब्रिटीशांच्या गुलामगिरीत वाढलेला देश. ब्रिटनने आॅस्ट्रेलियाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचे शोषण केले. लोकशाही व्यवस्था स्वीकारलेला हा देश अखेर १९७५ साली स्वतंत्र झाला. नव्या शतकात भारताने पूर्वेकडील देशांसाठी लूक इस्ट पॉलिसी चे धोरण अवलंबले. राष्ट्रपतींच्या या भेटीत त्याचा उत्तरार्ध अ‍ॅक्ट इस्ट पॉलिसीने सुरू झाला. पापुआ न्यू गिनी आणि भारत परस्परांच्या अधिक जवळ येण्याची प्रक्रिया या निमित्ताने सुरू झाली आहे.दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती मुखर्जींचे शानदार स्वागत झाल्यानंतर दिवसभरात राष्ट्राध्यक्ष गव्हर्नर जनरल सर मायकेल ओगिओ, पंतप्रधान पीटर ओ नील, व विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. उर्जा संवर्धनात सोलर एनर्जी, शेती व आरोग्य सेवांचा विकास, औषधांची निर्मिती व पायाभूत सुविधांमधे भारतीय गुंतवणुकीची या देशाला अपेक्षा आहे. या खेरीज शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व पर्यटन यासारखे विषयही द्विपक्षीय संबंधांच्या अजेंड्यावर आहेत. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी उभय देशांमधे आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, शेती तंत्रज्ञानाचे आदान प्रदान इत्यादींचे ४ करार होतील व भारताकडून या देशासाठी १00 अब्ज डॉलर्सच्या लाईन आॅफ के्रडिटची घोषणाही होईल. पापुआ न्यू गिनीत भारताचे उच्चायुक्तालय १९९६ पासून सुरू झाले. नागेंद्रकुमार सक्सेना सध्या इथे भारतीय उच्चायुक्त आहेत. साधारणत: ३ हजार भारतीय व्यापारी आणि व्यावसायिकांचे या देशात वास्तव्य आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळावे यासाठी पापूआ न्यू गिनीने हार्दिक पाठिंबा दिला आहे. याखेरीज राष्ट्रकुल व नॅम देशांच्या संघटनेत हा देश भारताचा निकटचा सहकारी आहे. भारतीय उद्योजक व व्यावसायिकांना या निसर्गरम्य देशात मोठी संधी आहे. तथापि इतक्या दूर अंतरावरच्या देशात गुंतवणूक करण्यास किती भारतीय स्वेच्छेने पुढे येतील, याविषयी थोडी शंका आहे.