शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

विजेच्या खांबाची वादळात पडझड ; सुरगाणा तालुक्यातील गावे तीन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: May 8, 2014 20:53 IST

सुरगाणा : तालुक्यातील नार-पार नदीच्या खोर्‍यातील वार्‍हे, ननाशी, मनखेड, शिरीषपाडा, रोधांणे, गळवड, देवळा यांसह ननाशी उपकेंद्रातील ६० ते ७० गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या भागात तीन दिवसांपूर्वी जोरदार चक्रीवादळ झाल्याने पहुचीबारी येथील दोन विजेचे खांब जमीनदोस्त झाले, तर ननाशी येथील चार खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज गायब असल्याचे सांगितले जात आहे. वार्‍हे भागातील ग्रामस्थांनी ननाशी येथील वीज वितरण कार्यालयात धाव घेतली असता तेथील कार्यकारी अभियतांच तीन ते चार दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वीज गायब असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांना पाणीपुरवठा योजना बंद आहेत, तर काही गावांना कूपनलिकांमध्ये मोटारी बसविल्यामुळे गावांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्यामुळे अंधाराचे साम्र

सुरगाणा : तालुक्यातील नार-पार नदीच्या खोर्‍यातील वार्‍हे, ननाशी, मनखेड, शिरीषपाडा, रोधांणे, गळवड, देवळा यांसह ननाशी उपकेंद्रातील ६० ते ७० गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या भागात तीन दिवसांपूर्वी जोरदार चक्रीवादळ झाल्याने पहुचीबारी येथील दोन विजेचे खांब जमीनदोस्त झाले, तर ननाशी येथील चार खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज गायब असल्याचे सांगितले जात आहे. वार्‍हे भागातील ग्रामस्थांनी ननाशी येथील वीज वितरण कार्यालयात धाव घेतली असता तेथील कार्यकारी अभियतांच तीन ते चार दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वीज गायब असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांना पाणीपुरवठा योजना बंद आहेत, तर काही गावांना कूपनलिकांमध्ये मोटारी बसविल्यामुळे गावांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले असून, जंगली श्वापदांचा धोका वाढला आहे. जंगलात पाणी नसल्यामुळे तरस, बिबट्या, गावाजवळील पाणवठ्यावर येतात. सायंकाळी पाणी आणण्यास जाणार्‍या महिलांचा दृष्टीस पडत असल्याने महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरण्यास विहिरींवर, पाणवठ्यावर जावे लागत आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असून, वीज नसल्यामुळे घरात झोपणे असहय्य होत असतानाच अंगणात झोपणेही मुश्कील आहे. तालुक्याच्या वार्‍हे, अंबाडे, रोघाणे, मनखेड, जाहुले, भवाडा या गावांसह निम्म्या तालुक्यात दिंडोरी तालुक्यातील ननाशी उपकेंद्रात वीजपुरवठा होत असल्याने त्याची तक्रार मात्र तालुक्यातील अधिकारी ऐकून घेण्यास तयार नाही. वीज वितरण कंपनीने तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी देवळा, गळवड येथील देवराम वार्डे, रतन वार्डे, सीताराम मिसाळ, यमुना गायकवाड, सावित्रीबाई जाधव, जनाबाई वार्डे, गुलाब वार्डे यांनी केली आहे. दिंडोरीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सुरगाणा येथील वीजपुरवठा जवळपास १२ तास खंडित झाला होता.
तसेच पिंपळसोंड, उंबरपाडा, खंुटविहीर, मालगोदा या परिसरात तीन दिवसांपासून वीज गायब असून, पिंळसोंड येथील नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)