शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

श्रीलंकेच्या साईटवर जयललिता-मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर

By admin | Updated: August 1, 2014 16:39 IST

श्रीलंकेच्या संरक्षणखात्याच्या वेबसाईटवर भारताविषयी असलेल्या आक्षेपार्ह मजकूरामुळे तामिळनाडूमध्ये श्रीलंकेविरोधात प्रक्षोभ उसळला आहे.

ऑनलाइन टीम

चेन्नई, दि. १ - श्रीलंकेच्या संरक्षणखात्याच्या वेबसाईटवर भारताविषयी असलेल्या आक्षेपार्ह मजकूरामुळे तामिळनाडूमध्ये श्रीलंकेविरोधात प्रक्षोभ उसळला असून भारताने श्रीलंकेशी असलेले संबंध तोडावेत अशी टोकाची मागणी करण्यात येत आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मच्छिमारांच्या प्रश्नावरून अनेक पत्रे लिहिली आहेत. या पत्रांचा उल्लेख करताना श्रीलंकेच्या वेबसाईटवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत या नेत्यांबाबत टिप्पणी करण्यात आली होती आणि त्याचा निषेध तामिळनाडूमधल्या नेत्यांनी केला आहे. श्रीलंकेने या वेबसाईटवर सदर लेखात असलेले कार्टून व लेख काढून टाकला असून या प्रकरणाची निश्चित माहिती मिळाल्यावर भाष्य करू असे श्रीलंकेच्या उच्च अधिका-यांनी भारतीय न्यूज चॅनेलना सांगितले.
दरम्यान, श्रीलंकेशी विळा-भोपळ्याचं सख्य असलेल्या तामिळनाडूतल्या राजकीय पक्षांनी या प्रकरणी एकजूट दाखवली असून श्रीलंकेविरोधात सगळे एकत्र आले आहेत. तर या सगळ्या प्रकरणाबाबत मोदीसरकार गप्प का आहे असेही विचारण्यात येत आहे. जयललिता या मोदी सरकारसाठी त्रास होत असल्याचं, त्यांच्यात व मोदींमध्ये जमत नसल्याचं इत्यादी वाट्टेल त्या टिप्पणी या लेखात करण्यात आल्याचं समजतं. यावरून झालेल्या गदारोळानंतर सदर लेख चुकून अपलोड झाल्याचं सांगत श्रीलंका सरकारनं तो वेबसाईटवरून काढून टाकल्याचं श्रीलंकेचे एक मंत्री डग्लस देवानंद यांनी सांगितले.