शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला राज्यसभेमध्ये बहुमत मिळणे अवघड

By admin | Updated: May 14, 2016 03:17 IST

सत्ताधारी मोदी सरकारसाठी राज्यसभा हा सतत डोकेदुखीचा विषय ठरला आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीएचे ६२ सदस्य आहेत. राष्ट्रपतींनी नुकत्याच नामनियुक्त केलेल्या ७ सदस्यांची बेरीज त्यात मिळवली

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीसत्ताधारी मोदी सरकारसाठी राज्यसभा हा सतत डोकेदुखीचा विषय ठरला आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीएचे ६२ सदस्य आहेत. राष्ट्रपतींनी नुकत्याच नामनियुक्त केलेल्या ७ सदस्यांची बेरीज त्यात मिळवली तर ही संख्या ६९ होते. काँग्रेसचे राज्यसभेत ६१ खासदार आहेत. त्यात युपीएच्या घटक पक्षांची सदस्य संख्या मिळवली तर प्रमुख विरोधी आघाडीची सदस्य संख्या ८0 वर पोहोचते. याखेरीज तृणमूल, अद्रमुक, बीजेडी, समाजवादी आणि बसप या अन्य विरोधकांची संख्या त्यात मिळवल्यास ही सदस्य संख्या थेट ९0 चा आकडा पार करते. येत्या जून जुलै महिन्यात राज्यसभेचे ५७ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवडणूक ११ जून रोजी आहे. या निवडणुकीनंतर राज्यसभेचे चित्र नेमके कसे दिसेल? त्याचा वेध घेतल्यास भाजपाच्या काही जागा जरूर वाढतील मात्र राज्यसभेत विधेयके मंजूर करण्याइतके हे संख्याबळ २0१८ पर्यंत नसेल. सरकारमधले ५ मंत्री व्यंकय्या नायडू, पियुष गोयल, निर्मला सितारामन, वाय.एस. चौधरी व मुख्तार अब्बास नकवींची मुदतही जूनमध्ये समाप्त होत असली तरी या सर्वांचे पुन्हा निवडून येणे निश्चित आहे. आंध्रप्रदेशातील ४ जागांपैकी ३ तेलुगु देशम भाजपा युतीला तर १ जागा वायएसआर काँग्रेसला मिळेल. व्यंकय्या नायडूंना आंध्रातून निवडून येण्यासाठी तेलगु देशमचे सहकार्य घ्यावे लागेल. निर्मला सितारामन अथवा व्यंकय्या यापैकी एकालाच आंध्रमधून निवडून येता येईल. कर्नाटकातून काँग्रेसचे जयराम रमेश व विरप्पा मोईली निवृत्त होत आहेत. विजय माल्यांच्या राजीनाम्यामुळे आणखी एक जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून यंदा भाजपाला ३, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा मिळणार आहे. त्यात भाजपातर्फे पियुष गोयल, सुरेश प्रभू या दोन मंत्र्यांखेरीज तिसऱ्या जागेसाठी विनय सहस्त्रबुध्देंच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेतर्फे संजय राऊत व राष्ट्रवादीतर्फे प्रफुल पटेल यांची नावे जवळपास निश्चित आहेत. काँग्रेसचा उमेदवार मात्र महिनाअखेरीला जाहीर होईल.> संसदेवरील न्यायपालिकेचे अतिक्रमण चिंताजनकनवी दिल्ली : संसदेच्या अधिकारावर न्यायपालिकेकडून होणाऱ्या कथित अतिक्रमणाबाबत राज्यसभेत शुक्रवारी चिंता व्यक्त करण्यात आली. अर्थमंत्री आणि सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनीही या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज प्रतिपादित केली आहे. निवृत्त झालेल्या ५३ सदस्यांना भावपूर्ण निरोप देताना काही सदस्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या उत्तरदायित्वाकडेही लक्ष वेधले.समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले की, न्यायपालिकेकडून संसदेच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्यामुळे खासदार चिंतित आहेत. देशाच्या राज्यघटनेने संसदेला कायदा आणि अर्थसंकल्प पारित करण्याचा अधिकार बहाल केला आहे. हे काम न्यायपालिका करणार असेल तर आमची प्रासंगिकता उरेल काय? संसदीय सन्मान, सर्वोच्चता आणि क्षमता कायम राखली जावी. संविधानाने त्याबाबत लक्ष्मणरेषा घालून दिली आहे. काही लोक राज्यसभेला निवडून न आलेल्यांचे दुय्यम दर्जाचे सभागृह मानतात, तथापि या सभागृहाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते ही वास्तविकता आहे.बसपा प्रमुख मायावती यांनी यादव यांच्या विधानाला समर्थन दिले. आपण एकजुटीने काम करायला हवे. विशेषत: महत्त्वपूर्ण मुद्यांवर राजकीय भेद बाजूला सारायला हवे. न्यायपालिका का फायदा उचलत आहे, याबाबत आपण अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, असे त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)जीएसटी विधेयक पारित झाले असते तर राज्यांना थेट लाथ मिळाला असता. ते होऊ न शकल्यामुळे राज्यांच्या हिताला बाधा पोहोचल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षरीत्या सूचित केले. निवृत्त सदस्यांसाठी निरोपाच्या भाषणात ते म्हणाले, या सदस्यांचे योगदान आणि हस्तक्षेपामुळे वर्तमान काळात सुधारणांचे महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत, मात्र दोन बाबींबद्दल माझी तक्रार असेल. जीएसटी पारित झाले असते तर आपण प्रतिनिधित्व करीत असलेल्या राज्यांसाठी ते चांगले राहिले असते. ती राज्यांनी नेहमीसाठी गर्वाची बाब मानली असती. जीएसटीमुळे बिहार, उत्तर प्रदेशला खूप लाभ मिळाला असता. एक-दोन राज्ये वगळता अन्य सर्व राज्यांच्या पदरी मोठा लाभ पडला असता. असे त्यांनी नमूद केले.