शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

मोदी सरकारला राज्यसभेमध्ये बहुमत मिळणे अवघड

By admin | Updated: May 14, 2016 03:17 IST

सत्ताधारी मोदी सरकारसाठी राज्यसभा हा सतत डोकेदुखीचा विषय ठरला आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीएचे ६२ सदस्य आहेत. राष्ट्रपतींनी नुकत्याच नामनियुक्त केलेल्या ७ सदस्यांची बेरीज त्यात मिळवली

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीसत्ताधारी मोदी सरकारसाठी राज्यसभा हा सतत डोकेदुखीचा विषय ठरला आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीएचे ६२ सदस्य आहेत. राष्ट्रपतींनी नुकत्याच नामनियुक्त केलेल्या ७ सदस्यांची बेरीज त्यात मिळवली तर ही संख्या ६९ होते. काँग्रेसचे राज्यसभेत ६१ खासदार आहेत. त्यात युपीएच्या घटक पक्षांची सदस्य संख्या मिळवली तर प्रमुख विरोधी आघाडीची सदस्य संख्या ८0 वर पोहोचते. याखेरीज तृणमूल, अद्रमुक, बीजेडी, समाजवादी आणि बसप या अन्य विरोधकांची संख्या त्यात मिळवल्यास ही सदस्य संख्या थेट ९0 चा आकडा पार करते. येत्या जून जुलै महिन्यात राज्यसभेचे ५७ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवडणूक ११ जून रोजी आहे. या निवडणुकीनंतर राज्यसभेचे चित्र नेमके कसे दिसेल? त्याचा वेध घेतल्यास भाजपाच्या काही जागा जरूर वाढतील मात्र राज्यसभेत विधेयके मंजूर करण्याइतके हे संख्याबळ २0१८ पर्यंत नसेल. सरकारमधले ५ मंत्री व्यंकय्या नायडू, पियुष गोयल, निर्मला सितारामन, वाय.एस. चौधरी व मुख्तार अब्बास नकवींची मुदतही जूनमध्ये समाप्त होत असली तरी या सर्वांचे पुन्हा निवडून येणे निश्चित आहे. आंध्रप्रदेशातील ४ जागांपैकी ३ तेलुगु देशम भाजपा युतीला तर १ जागा वायएसआर काँग्रेसला मिळेल. व्यंकय्या नायडूंना आंध्रातून निवडून येण्यासाठी तेलगु देशमचे सहकार्य घ्यावे लागेल. निर्मला सितारामन अथवा व्यंकय्या यापैकी एकालाच आंध्रमधून निवडून येता येईल. कर्नाटकातून काँग्रेसचे जयराम रमेश व विरप्पा मोईली निवृत्त होत आहेत. विजय माल्यांच्या राजीनाम्यामुळे आणखी एक जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून यंदा भाजपाला ३, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा मिळणार आहे. त्यात भाजपातर्फे पियुष गोयल, सुरेश प्रभू या दोन मंत्र्यांखेरीज तिसऱ्या जागेसाठी विनय सहस्त्रबुध्देंच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेतर्फे संजय राऊत व राष्ट्रवादीतर्फे प्रफुल पटेल यांची नावे जवळपास निश्चित आहेत. काँग्रेसचा उमेदवार मात्र महिनाअखेरीला जाहीर होईल.> संसदेवरील न्यायपालिकेचे अतिक्रमण चिंताजनकनवी दिल्ली : संसदेच्या अधिकारावर न्यायपालिकेकडून होणाऱ्या कथित अतिक्रमणाबाबत राज्यसभेत शुक्रवारी चिंता व्यक्त करण्यात आली. अर्थमंत्री आणि सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनीही या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज प्रतिपादित केली आहे. निवृत्त झालेल्या ५३ सदस्यांना भावपूर्ण निरोप देताना काही सदस्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या उत्तरदायित्वाकडेही लक्ष वेधले.समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले की, न्यायपालिकेकडून संसदेच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्यामुळे खासदार चिंतित आहेत. देशाच्या राज्यघटनेने संसदेला कायदा आणि अर्थसंकल्प पारित करण्याचा अधिकार बहाल केला आहे. हे काम न्यायपालिका करणार असेल तर आमची प्रासंगिकता उरेल काय? संसदीय सन्मान, सर्वोच्चता आणि क्षमता कायम राखली जावी. संविधानाने त्याबाबत लक्ष्मणरेषा घालून दिली आहे. काही लोक राज्यसभेला निवडून न आलेल्यांचे दुय्यम दर्जाचे सभागृह मानतात, तथापि या सभागृहाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते ही वास्तविकता आहे.बसपा प्रमुख मायावती यांनी यादव यांच्या विधानाला समर्थन दिले. आपण एकजुटीने काम करायला हवे. विशेषत: महत्त्वपूर्ण मुद्यांवर राजकीय भेद बाजूला सारायला हवे. न्यायपालिका का फायदा उचलत आहे, याबाबत आपण अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, असे त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)जीएसटी विधेयक पारित झाले असते तर राज्यांना थेट लाथ मिळाला असता. ते होऊ न शकल्यामुळे राज्यांच्या हिताला बाधा पोहोचल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षरीत्या सूचित केले. निवृत्त सदस्यांसाठी निरोपाच्या भाषणात ते म्हणाले, या सदस्यांचे योगदान आणि हस्तक्षेपामुळे वर्तमान काळात सुधारणांचे महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत, मात्र दोन बाबींबद्दल माझी तक्रार असेल. जीएसटी पारित झाले असते तर आपण प्रतिनिधित्व करीत असलेल्या राज्यांसाठी ते चांगले राहिले असते. ती राज्यांनी नेहमीसाठी गर्वाची बाब मानली असती. जीएसटीमुळे बिहार, उत्तर प्रदेशला खूप लाभ मिळाला असता. एक-दोन राज्ये वगळता अन्य सर्व राज्यांच्या पदरी मोठा लाभ पडला असता. असे त्यांनी नमूद केले.