शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भूक निर्देशांकात ११७ देशांत भारत घसरून १0२ व्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 04:36 IST

भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते १00 असे गुण दिले जातात.

नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीचे वातावरण असताना जागतिक भूक निर्देशांकातही (हंगर इंडेक्स) मध्येही भारताची मोठी घसरण झाली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये असलेल्या ११७ देशांच्या यादीत भारत १0२ व्या स्थानी गेला आहे. दक्षिण आशियाई देशांत भारत सर्वात तळाला आहे. नेपाळ, बांग्लादेश व पाकिस्तान हेही भारतापेक्षा वरच्या स्थानी आहे. म्हणजेच तेथील स्थिती भारतापेक्षा चांगली आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये असलेल्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) गटातील देशांतही भारत खूपच मागे आहे. या इंडेक्समध्ये २0१५ साली भारत ९३ व्या स्थानावर होता. भारत यंदा १0२ व्या स्थानी गेला असताना पाकिस्तान मात्र ९४ व्या स्थानावर पोहोचला आहे.ग्लोबल हंगर इंडेक्स तयार करताना २0१४ ते २0१८ या काळातील माहिती एकत्र करण्यात आली होती. त्यानुसार क्रम ठरविला गेला.या माहितीमध्ये ११७ देशांतील कुपोषित मुलांची संख्या, कमी वजन आणि वयाच्या तुलनेत कमी उंची असलेल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या आणि याच वयोगटातील मुलांचा मृत्युदर यांचा समावेश होता.

या क्रमवारीत नेपाळने खूपच प्रगती केली आहे, तर ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत खूप मागे पडल्याने दक्षिण आफ्रिकेतील देशांपेक्षा दक्षिणआशियाईदेशही मागे पडले आहेत. या अहवालात म्हटले आहे की, भारतात ६ ते २३ महिने या वयोगटातील केवळ ९.६ टक्के बालकांनाच योग्य आहार मिळतो.कसा ठरतो निर्देशांक?भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते १00 असे गुण दिले जातात. ज्या देशाचे गुण 0 आहेत, तो या निर्देशांकात सर्वात वर असतो. म्हणजेच शून्य गुण सर्वोत्तम असतात आणि तेथील देशात भुकेचा प्रश्न नाही, असे मानले जाते. तसेच १0 पेक्षा कमी गुण असलेल्या देशांत भुकेची स्थिती गंभीर नाही, असे मानले जाते.२0 ते ३४.९ गुण मिळण्याचा अर्थ त्या देशात भुकेची स्थिती गंभीर आहे. जिथे भुकेचा प्रश्न हे आव्हान आहे, त्यांना ३५ ते ४९.४ गुण मिळतात, तर ५0 वा त्यापेक्षा जास्त गुण असल्यास तिथे भुकेची स्थिती भयावह आहे, असे मानले जाते.