शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

भूक निर्देशांकात ११७ देशांत भारत घसरून १0२ व्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 04:36 IST

भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते १00 असे गुण दिले जातात.

नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीचे वातावरण असताना जागतिक भूक निर्देशांकातही (हंगर इंडेक्स) मध्येही भारताची मोठी घसरण झाली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये असलेल्या ११७ देशांच्या यादीत भारत १0२ व्या स्थानी गेला आहे. दक्षिण आशियाई देशांत भारत सर्वात तळाला आहे. नेपाळ, बांग्लादेश व पाकिस्तान हेही भारतापेक्षा वरच्या स्थानी आहे. म्हणजेच तेथील स्थिती भारतापेक्षा चांगली आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये असलेल्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) गटातील देशांतही भारत खूपच मागे आहे. या इंडेक्समध्ये २0१५ साली भारत ९३ व्या स्थानावर होता. भारत यंदा १0२ व्या स्थानी गेला असताना पाकिस्तान मात्र ९४ व्या स्थानावर पोहोचला आहे.ग्लोबल हंगर इंडेक्स तयार करताना २0१४ ते २0१८ या काळातील माहिती एकत्र करण्यात आली होती. त्यानुसार क्रम ठरविला गेला.या माहितीमध्ये ११७ देशांतील कुपोषित मुलांची संख्या, कमी वजन आणि वयाच्या तुलनेत कमी उंची असलेल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या आणि याच वयोगटातील मुलांचा मृत्युदर यांचा समावेश होता.

या क्रमवारीत नेपाळने खूपच प्रगती केली आहे, तर ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत खूप मागे पडल्याने दक्षिण आफ्रिकेतील देशांपेक्षा दक्षिणआशियाईदेशही मागे पडले आहेत. या अहवालात म्हटले आहे की, भारतात ६ ते २३ महिने या वयोगटातील केवळ ९.६ टक्के बालकांनाच योग्य आहार मिळतो.कसा ठरतो निर्देशांक?भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते १00 असे गुण दिले जातात. ज्या देशाचे गुण 0 आहेत, तो या निर्देशांकात सर्वात वर असतो. म्हणजेच शून्य गुण सर्वोत्तम असतात आणि तेथील देशात भुकेचा प्रश्न नाही, असे मानले जाते. तसेच १0 पेक्षा कमी गुण असलेल्या देशांत भुकेची स्थिती गंभीर नाही, असे मानले जाते.२0 ते ३४.९ गुण मिळण्याचा अर्थ त्या देशात भुकेची स्थिती गंभीर आहे. जिथे भुकेचा प्रश्न हे आव्हान आहे, त्यांना ३५ ते ४९.४ गुण मिळतात, तर ५0 वा त्यापेक्षा जास्त गुण असल्यास तिथे भुकेची स्थिती भयावह आहे, असे मानले जाते.