शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वालचंदनगर परिसरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

वालचंदनगर : वालचंदनगरसह परिसरातील चिखली, रणगाव, कळंब, भोरकरवाडी, रत्नपुरी, लालपुरी, परिटवाडी आदी भागांतील नागरिकांच्या जोरदार मागणी, पाठपुरावा, प्रयत्नामुळे ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणीस मान्यता मिळाली. त्या उपकेंद्र निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती खंडकरी शेतकरी कृती समितीचे सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांनी दिली

वालचंदनगर : वालचंदनगरसह परिसरातील चिखली, रणगाव, कळंब, भोरकरवाडी, रत्नपुरी, लालपुरी, परिटवाडी आदी भागांतील नागरिकांच्या जोरदार मागणी, पाठपुरावा, प्रयत्नामुळे ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणीस मान्यता मिळाली. त्या उपकेंद्र निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती खंडकरी शेतकरी कृती समितीचे सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांनी दिली
या संदर्भात बारामती वितरण परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराम मुंडे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. या परिसरात विहिरी, नदीवरील उपसा सिंचन योजना व अन्य काही जलसाठ्यातील पाणी शेतीसाठी वापरण्यास विजेची खूपच गरज भासते. त्यातच महाराष्ट्र राज्य शेतीमहामंडळाकडील शेतजमीन रत्नपुरी मळ्यांतर्गत असलेल्या खंडकरी शेतकर्‍यांना वारसाहक्काने परत मिळाल्या आहेत. यामुळे भविष्यात या भागातील खंडकरी शेतकर्‍यांच्या जमिनी ओलिताखाली येणार आहेत. त्यासाठी विजेची मागणी दिवसेंदिवस वाढती राहणार आहे.
सध्या जंक्शन येथील फिडरवरून वालचंदनगर, कळंब, चिखली, रणगांव, अंथुर्णे, लासुर्णे आदी गावांना विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे तांत्रिक कारणाने वीजप्रवाह खंडित होऊन कमालीच्या विद्युत भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या परिसरातील कळंब येथे ३३/११ केव्ही उपकेंद्र उभारणीची या परिसरातील असंख्य कामगार, शेतकरी, विद्यार्थी व अन्य लोकांनी मागणी केली होती. अखेर मागणीस यश आले आहे. उपकेंद्रासाठी सुमारे अडीच एकर जागा घेतली आहे. त्या जागेच्या कब्जा हक्काची रक्कम संबंधितांकडे भरली आहे. या जागेचा हस्तांतरण प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर प्रत्यक्षात उपकेंद्र उभारणीस युद्धपातळीवर सुरुवात होईल, असे मुंडे व गायकवाड यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे शेतकर्‍यांसह विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांचे नुकसान होणार नाही. या बैठकीस बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, स्थापत्य व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुमे, उपअभियंता गोफणे, खंडकरी प्रतिनिधी हर्षवर्धन गायकवाड, ॲड. पांडुरंग गायकवाड, बाळासाहेब डोंबाळे, सुहास वाघ उपस्थित होते.