शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

आंबा बागायतदारांना भरघोस मदत : मुख्यमंत्री

By admin | Updated: May 12, 2014 19:48 IST

-ज्या देशांनी आंबा नाकारला त्यांचे गैरसमज दूर करणार

-ज्या देशांनी आंबा नाकारला त्यांचे गैरसमज दूर करणार
-फळप्रक्रिया उद्योग कोकणात येण्यासाठी अनुदान देणार
-आंबा, काजू बोर्डाला लवकरच निधी


दापोली : कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्यातील इतर फळपिकांप्रमाणेच नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, कोकणातील शेतकर्‍यांना भरघोस मदत देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत जाहीर केले. ४२ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती परिषदेसाठी ते दापोलीत आले होते.
कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याचे पीक घेतो. मात्र, यावर्षी अवकाळी पाऊस व युरोप देशाने आंब्यावर घातलेल्या बंदीमुळे शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. देशातील केवळ तीन टक्के आंबा युरोपात जातो. युरोपमध्ये बंदी घालण्याचे काही कारण नव्हते; परंतु ही बंदी केवळ गैरसमजुतीतून झाली आहे. युरोपीय देशात राज्याचे एक शिष्टमंडळ पाठविण्यात आले आहे. लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.
कोकणातील हापूसला दुबईत चांगली बाजारपेठ मिळाली आहे. हापूस आंबा मोठ्या प्रमाणात दुबईच्या मार्केटमध्ये दाखल झाला आहे. आखाती देशात अजून आंबा पाठवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील दोन दिवसांत दुबईला रवाना होणार आहेत. दुबईतील आंबा आयात व्यापारी यांच्याशी चर्चा करून राज्यातील अधिक आंबा दुबईच्या बाजारपेठेत कसा जाईल, शेतकर्‍यांचे नुकसान कसे टाळता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत. ज्या देशांनी आंबा नाकारला, त्यांची गैरसमज दूर करण्याबरोबरच जे देश आंबा आयात करतात त्यांच्याशी व्यावसायिक संबंध दृढ करून शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
कोकणातील आंबा, काजू बोर्डाला लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, कोकणातील शेतकर्‍यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. वाशी मार्केट येथे फळप्रक्रिया युनिट व आंबा केंद्र स्थापन करून शेतकर्‍याला दिलासा देण्यात येणार आहे. आंबा-काजू बोर्ड रत्नागिरी येथे हलविण्यात आले नाही, तर बोर्ड दापोलीत ठेवायचे की, अन्य ठिकाणी याबाबत चर्चा सुरू आहे. कोकणातील फळपिकांवरील प्रकल्प कोकणात यावेत यासाठी अनुदान दिले जाईल.
या पत्रकार परिषदेला जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

चौकट
हापूसचे दर गडगडण्याची चौकशी होणार
देशात दर पडण्यासारखी कसल्याही प्रकारची परिस्थिती नसतानासुद्धा आंब्याचे दर का पडले? हे दर कोणी पाडले. दर पाडण्यामागे दलालांचे राजकारण आहे की, गैरसमजुतीतून दर पाडले गेले? ज्यांनी दर पाडले, त्यांनी हे दर का पाडले? याबाबत चौकशी केली जाईल. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दीपक तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, ही समिती चौकशी करून अहवाल सादर करेल व यामध्ये दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.