शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

‘चीन-पाक अणुकरारामुळे सरकार चिंतित’

By admin | Updated: December 18, 2014 05:20 IST

चीन आणि पाकिस्तानमधील अणुकरारामुळे सरकार चिंतेत असून आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे, तथापि भारताने

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानमधील अणुकरारामुळे सरकार चिंतेत असून आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे, तथापि भारताने स्वत:चे हित जपण्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. धमक्या हाणून पाडण्याची पूर्ण तयारी आहे, देशाला कोणतीही झळ पोहोचणार नाही, अशी ग्वाही विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.या दोन देशांमधील अणुकरारामुळे देश सतर्क झाला असून चीनची संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संघटनेकडे तक्रार करण्याजोगी परिस्थिती उद्भवलेली नाही. देशाचे सुरक्षाहित जपण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या. प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी पाकिस्तानकडून अणुहल्ला होण्याच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यासंबंधी पूरक प्रश्नाला उत्तर देताना स्वराज म्हणाल्या की, चीनने आतापर्यंत पाकिस्तानसोबत तीन अणुकरार केले असल्याची माहिती सरकारला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)