शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

सरकारी बँकांना 20 लाख कोटी रुपयांचा चुना?

By admin | Updated: February 27, 2017 14:00 IST

भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जांचा आकडा हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 27 - भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जांचा आकडा हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केला आहे. फर्स्ट पोस्ट या बेलसाईटला दिलेल्या मुलाखतीत चक्रवर्ती यांनी बँकांनी सांगितलेली आकडेवारी तसेच रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या अंदाजापेक्षा बुडीत कर्जाच्या रक्कमेचा आकडा जास्त आहे असा दावा केला आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्र सध्या थकित कर्जांच्या समस्येचा सामना करत आहे, मात्र, नेमके बुडीत कर्ज किती आहे ते समजून घेतल्याशिवाय या समस्येतून बाहेर पडता येणार नाही असे चक्रवर्ती यांनी सांगितले. नॉन परफॉर्मिंग असेट्स किंवा एनपीए म्हणजे थकीत कर्ज 6 ते 7 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही आकडेवारी अर्धवट असून, कर्जांची फेररचना, माफ केलेले कर्ज आणि बुडीत कर्ज एकत्र करुन हा आकडा 20 लाख कोटीच्या घरात जातो असे चक्रवर्ती म्हणाले.
 
 
(टेबल सौजन्य - फर्स्टपोस्ट)
 
डिसेंबरपर्यंत भारतातील 42 नोंदणीकृत बँकांचा एनपीए 7.3 लाख कोटी रुपये आहे. बँकांनी कर्जाची केलेली फेररचना आणि माफ केलेले कर्ज याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. मार्च 2016 च्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 59,547 कोटीचे कर्ज माफ केले. तर आधीच्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सर्व बँकांनी मिळून कागदोपत्री बंद केलेली कर्जे 1.13 लाख कोटी रुपये आहेत. कॉर्पोरेट कर्जांच्या परतफेडीच्या मुद्यावरुन नेहमीच विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात येते. त्यासाठी 9000 कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असलेला व भारतातून फरार झालेल्या विजय माल्या यांचे उदाहरण देण्यात येते.
 2009 ते 2014 या काळात रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर असलेल्या चक्रवर्ती यांच्या मते, रिझर्व्ह बँक, बँका, सरकार व अन्य सरकारी नियामक संस्था यांना अद्याप या समस्येचा नीट अंदाजच आलेला नाही. 20 सरकारी बँकांची थकीत कर्जे त्यांच्या कर्जवाटपाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत. 6 बँकांनी 15 टक्क्यांची तर एका बँकेने 22 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे.
कर्जवाटप करताना घ्यायची खबरदारी, कंपनीच्या प्रवर्तकांचे नामानिराळे रहाणे, रिझर्व्ह बँकेच्या उपायांची अपरिणामकारकता अशी अनेक कारणे थकीत कर्जे वाढण्यामागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लवकरात लवकर थकीत कर्जांचा नीट आढावा घेणे आवश्यक असून, जी कुठली कर्जे वसूल होत नाहीयेत ती थकीत कर्जे समजावीत असा मार्ग चक्रवर्ती यांनी सुचवला आरबीआयच्या सेवेत असताना सुचवला होता, परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.