शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
3
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

सरकारी बँकांना 20 लाख कोटी रुपयांचा चुना?

By admin | Updated: February 27, 2017 14:00 IST

भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जांचा आकडा हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 27 - भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जांचा आकडा हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केला आहे. फर्स्ट पोस्ट या बेलसाईटला दिलेल्या मुलाखतीत चक्रवर्ती यांनी बँकांनी सांगितलेली आकडेवारी तसेच रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या अंदाजापेक्षा बुडीत कर्जाच्या रक्कमेचा आकडा जास्त आहे असा दावा केला आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्र सध्या थकित कर्जांच्या समस्येचा सामना करत आहे, मात्र, नेमके बुडीत कर्ज किती आहे ते समजून घेतल्याशिवाय या समस्येतून बाहेर पडता येणार नाही असे चक्रवर्ती यांनी सांगितले. नॉन परफॉर्मिंग असेट्स किंवा एनपीए म्हणजे थकीत कर्ज 6 ते 7 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही आकडेवारी अर्धवट असून, कर्जांची फेररचना, माफ केलेले कर्ज आणि बुडीत कर्ज एकत्र करुन हा आकडा 20 लाख कोटीच्या घरात जातो असे चक्रवर्ती म्हणाले.
 
 
(टेबल सौजन्य - फर्स्टपोस्ट)
 
डिसेंबरपर्यंत भारतातील 42 नोंदणीकृत बँकांचा एनपीए 7.3 लाख कोटी रुपये आहे. बँकांनी कर्जाची केलेली फेररचना आणि माफ केलेले कर्ज याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. मार्च 2016 च्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 59,547 कोटीचे कर्ज माफ केले. तर आधीच्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सर्व बँकांनी मिळून कागदोपत्री बंद केलेली कर्जे 1.13 लाख कोटी रुपये आहेत. कॉर्पोरेट कर्जांच्या परतफेडीच्या मुद्यावरुन नेहमीच विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात येते. त्यासाठी 9000 कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असलेला व भारतातून फरार झालेल्या विजय माल्या यांचे उदाहरण देण्यात येते.
 2009 ते 2014 या काळात रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर असलेल्या चक्रवर्ती यांच्या मते, रिझर्व्ह बँक, बँका, सरकार व अन्य सरकारी नियामक संस्था यांना अद्याप या समस्येचा नीट अंदाजच आलेला नाही. 20 सरकारी बँकांची थकीत कर्जे त्यांच्या कर्जवाटपाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत. 6 बँकांनी 15 टक्क्यांची तर एका बँकेने 22 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे.
कर्जवाटप करताना घ्यायची खबरदारी, कंपनीच्या प्रवर्तकांचे नामानिराळे रहाणे, रिझर्व्ह बँकेच्या उपायांची अपरिणामकारकता अशी अनेक कारणे थकीत कर्जे वाढण्यामागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लवकरात लवकर थकीत कर्जांचा नीट आढावा घेणे आवश्यक असून, जी कुठली कर्जे वसूल होत नाहीयेत ती थकीत कर्जे समजावीत असा मार्ग चक्रवर्ती यांनी सुचवला आरबीआयच्या सेवेत असताना सुचवला होता, परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.