शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

सरकारी बँकांना 20 लाख कोटी रुपयांचा चुना?

By admin | Updated: February 27, 2017 14:00 IST

भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जांचा आकडा हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 27 - भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जांचा आकडा हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केला आहे. फर्स्ट पोस्ट या बेलसाईटला दिलेल्या मुलाखतीत चक्रवर्ती यांनी बँकांनी सांगितलेली आकडेवारी तसेच रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या अंदाजापेक्षा बुडीत कर्जाच्या रक्कमेचा आकडा जास्त आहे असा दावा केला आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्र सध्या थकित कर्जांच्या समस्येचा सामना करत आहे, मात्र, नेमके बुडीत कर्ज किती आहे ते समजून घेतल्याशिवाय या समस्येतून बाहेर पडता येणार नाही असे चक्रवर्ती यांनी सांगितले. नॉन परफॉर्मिंग असेट्स किंवा एनपीए म्हणजे थकीत कर्ज 6 ते 7 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही आकडेवारी अर्धवट असून, कर्जांची फेररचना, माफ केलेले कर्ज आणि बुडीत कर्ज एकत्र करुन हा आकडा 20 लाख कोटीच्या घरात जातो असे चक्रवर्ती म्हणाले.
 
 
(टेबल सौजन्य - फर्स्टपोस्ट)
 
डिसेंबरपर्यंत भारतातील 42 नोंदणीकृत बँकांचा एनपीए 7.3 लाख कोटी रुपये आहे. बँकांनी कर्जाची केलेली फेररचना आणि माफ केलेले कर्ज याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. मार्च 2016 च्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 59,547 कोटीचे कर्ज माफ केले. तर आधीच्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सर्व बँकांनी मिळून कागदोपत्री बंद केलेली कर्जे 1.13 लाख कोटी रुपये आहेत. कॉर्पोरेट कर्जांच्या परतफेडीच्या मुद्यावरुन नेहमीच विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात येते. त्यासाठी 9000 कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असलेला व भारतातून फरार झालेल्या विजय माल्या यांचे उदाहरण देण्यात येते.
 2009 ते 2014 या काळात रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर असलेल्या चक्रवर्ती यांच्या मते, रिझर्व्ह बँक, बँका, सरकार व अन्य सरकारी नियामक संस्था यांना अद्याप या समस्येचा नीट अंदाजच आलेला नाही. 20 सरकारी बँकांची थकीत कर्जे त्यांच्या कर्जवाटपाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत. 6 बँकांनी 15 टक्क्यांची तर एका बँकेने 22 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे.
कर्जवाटप करताना घ्यायची खबरदारी, कंपनीच्या प्रवर्तकांचे नामानिराळे रहाणे, रिझर्व्ह बँकेच्या उपायांची अपरिणामकारकता अशी अनेक कारणे थकीत कर्जे वाढण्यामागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लवकरात लवकर थकीत कर्जांचा नीट आढावा घेणे आवश्यक असून, जी कुठली कर्जे वसूल होत नाहीयेत ती थकीत कर्जे समजावीत असा मार्ग चक्रवर्ती यांनी सुचवला आरबीआयच्या सेवेत असताना सुचवला होता, परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.