शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गुरमेहरसाठी गंभीर मैदानात

By admin | Updated: March 2, 2017 04:06 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील विचारांनी चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची (डीयू) विद्यार्थिनी गुरमेहर कौरसाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर मैदानात उतरला

नवी दिल्ली : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील विचारांनी चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची (डीयू) विद्यार्थिनी गुरमेहर कौरसाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर मैदानात उतरला आहे, तर कौरची टिंगल केल्याबद्दल टीका सुरू झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागलाही बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. डीयूतील राड्यानंतर गुरमेहरने अभाविपविरुद्ध सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. तिच्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्यानंतर काहींनी तिला बलात्काराची धमकी दिली होती. शहीद जवानाची मुलगी असलेल्या गुरमेहरच्या विचारांची टिंगल करणे किंवा ट्रोलिंग करणे अत्यंत घृणास्पद होते, असे गंभीरने म्हटले आहे. एआयएसए या संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या दोन जणांना अभाविपने संघटनेतून काढले आहे. त्या दोघांनी पोलिसांसमोरच एआयएसएच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सेहवागनेही तिची टर उडविणारी टिपणी केली होती. मात्र, आता त्याने टिष्ट्वट करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिला तिची मते मांडण्याचा अधिकार आहे. तिला हिंसाचाराची किंवा बलात्काराची धमकी देणारे क्षुद्र आहेत. फोगट भगिनी असतील किंवा गुरमेहर. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहेच, असे टिष्ट्वट सेहवागने केले. आपण एका स्वतंत्र देशात राहतो. येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. युद्धात पिता गमावलेली एखादी मुलगी शांतता राहावी या उद्देशाने युद्घाच्या भयानकतेविषयी पोस्ट टाकत असेल, तर तिला तो पूर्ण अधिकार आहे, असे गंभीरने एका निवेदनात म्हटले आहे. कन्हैयाकुमारविरुद्ध पुरावे नाहीतगेल्या वर्षी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या आंदोलनाच्या वेळी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केलेले भाषण देशद्रोही होते, असे कोणतेही पुरावे दिल्ली पोलिसांना आढळलेले नाहीत. पोलिसांनीच ही माहिती न्यायालयात दिली आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी कन्हैयाकुमार व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा आरोप ठेवला होता आणि त्यांना काही काळ कोठडीतही ठेवले होते. त्यावेळी त्याला न्यायालयात नेताना भाजपशी संबंधित काही वकिलांनी त्याला मारहाणही केली होती. आता त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप नाहीत, असे पोलिसांनी सांगितल्याने त्याच्या विरोधकांची पंचाईत झाली आहे. >जेएनयू विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततापूर्णनिदर्शक विद्यापीठ कॅम्पसमधील प्रशासकीय विभाग बंद पाडत होते, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात केला असताना पोलिसांनी मात्र जेएनयूत विद्यार्थ्यांनी शांततेने आंदोलन केल्याचे न्यायालयात सांगितले. हा विषय न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी प्रशासकीय इमारतीपासून ५० मीटर अंतरावर आंदोलन करीत होते, असे सांगितले. कुलगुरू, शिक्षक आणि जेएनयूचे कर्मचारी कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रशासकीय इमारतीचा वापर करीत होते, असेही पोलिसांनी सांगितले.