शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

गांधीजी ब्रिटीशांचे एजंट होते - मार्कंडेय काटजू

By admin | Updated: March 10, 2015 12:01 IST

महात्मा गांधी हे ब्रिटीशांचे एजंट होते अशी टीका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजूंनी राष्ट्रपिता महात्मा गांधीना लक्ष्य केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० - वादग्रस्त वक्तव्ये व टिपण्ण्यांमुळे सतत चर्चेत असणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजूंनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीना लक्ष्य केले आहे. महात्मा गांधी हे ब्रिटीशांचे एजंट होते, असे त्यांनी म्हटले आहे. काटजूंनी त्यांच्या ब्लॉगद्वारे गांधीजींवर टीका करत 'गांधींनी देशाचे खूप मोठे नुकसान केले' असा आरोपही केला आहे. 
'फोडा आणि राज्य करा हे ब्रिटीशांचे धोरण होते. राजकारण सतत धर्माला घूसवून गांधीजींनी ब्रिटीशांचे तेच धोरण सुरू ठेवले', असे काटजूंनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. गांधीजींची भाषणे अथवा वर्तमानपत्रातील त्यांचे लेख पाहिले असता हेच लक्षात येते की त्यांचा हिंदूंकडे जास्त ओढा होता. बापूंच्या प्रत्येक भाषणांत रामराज्यस ब्रह्मचर्य, गोमाता रक्षण यांसारख्या हिंदुत्ववादी विचारांचे उल्लेख असायचे', असेही लेखात म्हटले आहे. गांधीजींच्या अनेक सभांमध्ये 'रघुपति राघव राजा राम'चे बोल कानी पडत असत, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे. 
या लेखात काटजूंनी महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनालाही लक्ष्य करत त्यावर टीका केली आहे. गांधींजीनी क्रांतिकारी आंदोलनाला सत्याग्रही आंदोलनाकडे नेत ब्रिटीशांना फायदा करून दिला असा आरोपही लेखात करण्यात आला आहे.