शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ई रिक्षेच्या माध्यमातून गडकरींच्या पूर्तीचे कल्याण ?

By admin | Updated: July 1, 2014 13:01 IST

ई रिक्षांना ग्रीन सिग्नल दाखवत या रिक्षांसाठी अल्प व्याजदरात कर्ज देण्याची घोषणा नितीन गडकरींनी केली असली तरी यात सायकल रिक्षाचालकांसह गडकरींच्या नातेवाईकांनाही फायदा होणार असल्याचे वृत्त आहे.

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १ - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पूर्ती उद्योग समुहामुळे पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी ई रिक्षांना ग्रीन सिग्नल दाखवत या रिक्षांसाठी अल्प व्याजदरात कर्ज देण्याची घोषणा नितीन गडकरींनी केली असली तरी यात सायकल रिक्षाचालकांसह गडकरींच्या नातेवाईकांनाही फायदा होणार असल्याचे वृत्त आहे. गडकरी कुटुंबाशी संबंध असलेली कंपनीच आता ई रिक्षा उत्पादन क्षेत्रात उतरत असल्याने गडकरींच्या या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
गेल्या महिन्यात दिल्लीतील रामलीला मैदानात झालेल्या ई रिक्षाचालकांच्या मेळाव्यात केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात ई रिक्षांना परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.  साडेसहाशे वॉट क्षमता असलेल्या या रिक्षांसाठी चालकांना पोलिस आणि आरटीओचे फेरे मारावे लागणार नव्हते. या रिक्षेची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थेत करावी लागणार होती. सायकल रिक्षा चालवाणा-यांनी या ई रिक्षेचा पर्याय निवडावा. त्यांच्यासाठी ३ टक्के दराने कर्ज मिळेल. यासाठी दिनदयाल योजना सुरु करु असेही गडकरींनी सांगितले होते.   
मात्र आता नितीन गडकरींच्या या ई रिक्षा प्रेमावर  प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नितीन गडकरी यांचा नातेवाईक राजेश तोतडे यांची पूर्ती  ग्रीन टेक्नोलॉजीस ही कंपनी असून ही कंपनी लवकरच ई रिक्षांची निर्मिती करणार असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. तोतडेंनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून आमच्या ई रिक्षांना सरकारी यंत्रणांकडून मंजूरी मिळाल्यास आमच्या कंपनीच्या ई रिक्षा रस्त्यावर धावतील असे तोतडेंनी संबंधित वृत्तपत्राला सांगितले आहे.
त्यामुळे गडकरींनी ई रिक्षांना परवानगी देत गोरगरिब रिक्षाचालकांचा हित साधला की पूर्ती उद्योग समुहाचा असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. आप आणि काँग्रेसनेही यावरुन नितीन गडकरींवर निशाणा साधला आहे. 
नितीन गडकरींनी त्यांच्या कंपनीच्या फायद्यासाठीच ई रिक्षांना मंजूरी दिली असा आरोपही विरोधकांनी केला आहे. 
दरम्यान, गडकरींनी हे आरोप फेटाळून लावले आहे. देशात अनेक कंपन्या ई रिक्षांची निर्मिती करतात. आम्ही कोणत्याही एका कंपनीला सूट किंवा अन्य कंपन्यांवर बंदी लादलेली नाही असे गडकरींनी स्पष्ट केले.