शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
4
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
5
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
6
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
7
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
8
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
9
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
10
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
11
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
12
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
13
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
15
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
16
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
17
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
18
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
19
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
20
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

आर्थिक पाहणी अहवाल - विकास दर ५.४ - ५.९ टक्के राहील

By admin | Updated: July 9, 2014 19:12 IST

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल मांडत २०१४-१५ या आर्थिक वर्षात विकासदर ५.४ ते ५.९ टक्के इतका राहिल, असे नमूद केले

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - पावसाची स्थिती असमाधानकारक राहिली असली तरी २०१४ - १५ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ५.४ ते ५.९ टक्क्यांच्या दराने वाढेल असा निष्कर्ष आर्थिक पाहणी अहवालात असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. अर्थात सर्वसामान्यांना ग्रासणारी महागाई कमी होण्यास काही काळ जावा लागेल अशी कबुलीही त्यांनी दिली.
 
आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -
 
- २०१२ - १३ मध्ये राष्ट्रीय सकल उत्पादन किंवा जीडीपीची वाढ दशकभरातील नीचांकाने म्हणजे ४.५ टक्क्यांनी झाली. जी २०१३ - १४ मध्ये किंचित वधारत ४.७ टक्के झाली. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा हा दर या आर्थिक वर्षात पाच टक्क्यांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे.
- पॅसिफिक समुद्रातील वादळी परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम मान्सूनवर झाला असून त्याचा विपरीत परिणाम काही प्रमाणात अन्नधान्य उत्पादनावर व परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता. 
- जर सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले आणि अथर्व्यवस्थेच्या वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न केले तर आर्थिक वाढ येत्या काळामध्ये ७ ते ८ टक्क्यांच्या गतीने होण्याची अपेक्षा आहे.
- आर्थिक शिस्तीची गरज असून वित्तीय तूट कमी करण्याची गरज आहे, त्यासाठी ठोस पतधोरण आखायला हवे.
- वर्षाच्या नंतरच्या काही महिन्यांमध्ये निर्यातीमध्ये झालेल्या वाढीमध्ये चालू खात्यातील तूट कमी झाली आहे.
- २०१२ - १३ मध्ये चालू खात्यातील तूट जीडीपीच्या ४.७ टक्के होती, जी २०१३ - १४ मध्ये १.७ टक्के इतकी कमी झाली आहे.
- वित्तीय तूटदेखील कमी होत आहे. २०११ - १२ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ५.७ टक्के होती, जी २०१२ - १३ मध्ये ४.९ टक्के व २०१३ - १४ मध्ये ४.५ टक्के इतकी कमी झाली आहे.
- खाण उद्योग व उत्पादन क्षेत्राची कामगिरी गेल्या दोन वर्षांमध्ये निराशाजनक झाली असून या क्षेत्रांची वाढ विशेष झालेली नाही.
- अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला बळ देण्याची आवश्यकता आहे.
- कृषि क्षेत्राची वाढ समाधानकारक झाली आहे. १९९९ - २००० ते २०१२ - १३ या दशकभरात कृषिक्षेत्राच्या उत्पन्नाची सरासरी वाढ ३ टक्के होती, जी २०१३ - १४ या आर्थिक वर्षात ४.७ टक्के झाली आहे.
- २०१३ - १४ या आर्थिक वर्षात अन्नधान्याचे उत्पादन २६४.४ दशलक्ष टन इतके विक्रमी झाले आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता ही वाढ जवळपास २० दशलक्ष टन आहे.
- नॅशनल पेन्शन स्कीममध्ये ६७.११ लाख नागरिकांनी सहभाग घेतला असून सध्याचा निधी ५१.४४ कोटी रुपये आहे.
- महागाईचा २०१३ - १४ मध्ये कमी होऊन ५.९८ टक्के झाला.
- शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ३.३ टक्के झाला, जो गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे.
- गरीबांचे प्रमाण घसरले असून आता ते लोकसंख्येच्या २१.९ टक्के आहे.
- आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांवर भर आणि गुंतवणूक यावर भर देण्याची गरज.
- सेवा क्षेत्राची भरीव कामगिरी झाली असून सेवा जीडीपीचा विचार केला तर जगातल्या टॉपच्या १५ देशांमध्ये भारत १२व्या स्थानावर.
- भारताच्या सेवा क्षेत्राच्या वाढीचा विचार केला तर वाढीचा दर जगात दुस-या स्थानावर.
- दुधाचे उत्पन्न विक्रमी झाले असून तर वर्षाला १३२४३ दशलक्ष टन झाले आहे.
- भारताची आयात ८.३ टक्क्यांनी घसरली आहे.
- कृषिक्षेत्राला देण्यात आलेल्या कर्जात विक्रमी वाढ झाली असून ते ७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.
- भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ. मार्च २०१३मध्ये २९२ अब्ज डॉलर असलेली परकीय गंगाजळी मार्च २०१४मध्ये ३०४.२ अब्ज डॉलर झाली आहे.
- चालू खात्यातली तूट २०१२ - १३मध्ये ८८.२ अब्ज डॉलर होती जी घटून ३२.४ अब्ज डॉलर झालेली आहे.