शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

हुंडाप्रकरणात तात्काळ अटक नको- सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: July 3, 2014 10:00 IST

हुंडाविरोधी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे परखड मत मांडत याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करु नये असे महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३- हुंडाविरोधी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे परखड मत मांडत याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करु नये असे महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पोलिसांनी आवश्यकता असेल तरच आरोपींना अटक करावी सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 
देशभरात हुंडा प्रथेवर आळा घालण्यासाठी भारतीय दंड विधानात कलम ४९८ अ हा कायदा आणला गेला. हा गुन्हा अजामीनपात्र ठरवण्यात आला आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टातील न्या. सी.के. प्रसाद आणि पी.सी घोष यांच्या खंडपीठाने बुधवारी हुंडाबळी कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय दिला. यात सुप्रीम कोर्टाने या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे ताशेरे मारत या गुन्ह्यात तात्काळ अटक न करण्याचे आदेश दिले. सात वर्षांपर्यंतची शिक्षा असलेल्या कलमांमध्ये आरोपींनी गुन्हा केला असेल या एका निकषावर अटक करता येणार नाही. अटक करताना पोलिसांकडे सबळ पुरावा असणे गरजेचे आहे. हुंडाविरोधी कायद्यात अटक करताना पोलिसांनी क्रिमिनल प्रोसिजर कोडमधील अटक करण्याच्या नऊ निकषांचा आधार घ्यावा असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. दंडाधिका-यांनीही या प्रकरणात चौकशी करावी असेही कोर्टाने सांगितले. पोलिसांनी दंडाधिका-यांसमोर अटकेचे कारण, अटकेचे निकष पाळलेत का व अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्र दंडाधिका-यांसमोर सादर करणे गरजेचे आहे असे निर्देश कोर्टाने सर्व राज्यातील पोलिसांना दिले. 
हुंडाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण वाढण्यावरही कोर्टाने चिंता व्यक्त केली. देशात कलम ४९८ अ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ १५ टक्के आरोपी दोषी सिद्ध होतात अनेकदा पतीचे वृद्ध आजारी आजी - आजोबा, परदेशात राहणारे नातेवाईकांनाही या गुन्ह्यांमध्ये आरोपी केले जाते असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले.