शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

हुंडाप्रकरणात तात्काळ अटक नको- सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: July 3, 2014 10:00 IST

हुंडाविरोधी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे परखड मत मांडत याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करु नये असे महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३- हुंडाविरोधी कायद्याचा गैरवापर होत असल्याचे परखड मत मांडत याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करु नये असे महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पोलिसांनी आवश्यकता असेल तरच आरोपींना अटक करावी सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 
देशभरात हुंडा प्रथेवर आळा घालण्यासाठी भारतीय दंड विधानात कलम ४९८ अ हा कायदा आणला गेला. हा गुन्हा अजामीनपात्र ठरवण्यात आला आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टातील न्या. सी.के. प्रसाद आणि पी.सी घोष यांच्या खंडपीठाने बुधवारी हुंडाबळी कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय दिला. यात सुप्रीम कोर्टाने या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे ताशेरे मारत या गुन्ह्यात तात्काळ अटक न करण्याचे आदेश दिले. सात वर्षांपर्यंतची शिक्षा असलेल्या कलमांमध्ये आरोपींनी गुन्हा केला असेल या एका निकषावर अटक करता येणार नाही. अटक करताना पोलिसांकडे सबळ पुरावा असणे गरजेचे आहे. हुंडाविरोधी कायद्यात अटक करताना पोलिसांनी क्रिमिनल प्रोसिजर कोडमधील अटक करण्याच्या नऊ निकषांचा आधार घ्यावा असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. दंडाधिका-यांनीही या प्रकरणात चौकशी करावी असेही कोर्टाने सांगितले. पोलिसांनी दंडाधिका-यांसमोर अटकेचे कारण, अटकेचे निकष पाळलेत का व अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्र दंडाधिका-यांसमोर सादर करणे गरजेचे आहे असे निर्देश कोर्टाने सर्व राज्यातील पोलिसांना दिले. 
हुंडाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण वाढण्यावरही कोर्टाने चिंता व्यक्त केली. देशात कलम ४९८ अ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ १५ टक्के आरोपी दोषी सिद्ध होतात अनेकदा पतीचे वृद्ध आजारी आजी - आजोबा, परदेशात राहणारे नातेवाईकांनाही या गुन्ह्यांमध्ये आरोपी केले जाते असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले.