शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

निवडणूक निकालांमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता, संघटनात्मक बदलांची मागणी

By admin | Updated: March 11, 2017 19:18 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, संदीप दीक्षित यांनी अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले

शीलेश शर्मा

नवी दिल्ली, दि. 11 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, संदीप दीक्षित यांनी अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले असले तरी पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात आम्ही वाईट पद्धतीने हरलो आहोत, हे स्वीकारायला हवे. संघटनेत व्यापक बदल करावे लागतील. रणनीतीवरही मंथन करावे लागेल. काँग्रेस निवडणूक हरली असली, तरी आमची भूमिका कायम आहे. नोटाबंदी हा चुकीचा निर्णय होता, असे आम्ही आजही मानतो.

सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पक्षातून कोणीही आव्हान दिलेले नसले तरी बदलाची भाषा सर्वच करीत आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या नेत्यांपासून स्वत:ची सुटका करून घेणे आवश्यक आहे. उदा. सोनिया गांधी यांचे सचिव अहमद पटेल हे आजकाल पूर्ण अंधारात असतात. पक्षात काय निर्णय होत आहेत, याची त्यांना कल्पनाच नसते. उत्तर प्रदेश निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांना आणले होते. त्यावरून अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले होते. सपासोबत युती करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनीच दिला होता. त्याला गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, प्रमोद तिवारी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता.

तथापि, राहुल यांची टीम ठाम राहिली. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला नेत्यांची लांबलचक यादी दिली होती. तथापि, संपूर्ण प्रचार अभियान राहुल यांच्याभोवतीच फिरत राहिले. नवज्योतसिंग सिद्धू, नगमा, दिग्विजयसिंग यांच्यासह अनेक नेत्यांचा उपयोग काँग्रेसला करता आला असता; पण हे नेते प्रशांत किशोर यांच्या यादीत नव्हते. त्यामुळे त्यांना दूरच ठेवण्यात आले. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी प्रचारात भागच घेतला नाही. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या निवडणुकांतही त्याचीच पुनरावृत्ती झाली; मात्र काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर कोणतेही बदल केले नाहीत. उत्तर प्रदेशातील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसला संघटनात्मक बदल करावे लागतील, असे मानले जात आहे. कार्यसमितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटणे अपरिहार्य समजले जात आहे.