शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

निवडणूक निकालांमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता, संघटनात्मक बदलांची मागणी

By admin | Updated: March 11, 2017 19:18 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, संदीप दीक्षित यांनी अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले

शीलेश शर्मा

नवी दिल्ली, दि. 11 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, संदीप दीक्षित यांनी अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले असले तरी पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात आम्ही वाईट पद्धतीने हरलो आहोत, हे स्वीकारायला हवे. संघटनेत व्यापक बदल करावे लागतील. रणनीतीवरही मंथन करावे लागेल. काँग्रेस निवडणूक हरली असली, तरी आमची भूमिका कायम आहे. नोटाबंदी हा चुकीचा निर्णय होता, असे आम्ही आजही मानतो.

सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पक्षातून कोणीही आव्हान दिलेले नसले तरी बदलाची भाषा सर्वच करीत आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या नेत्यांपासून स्वत:ची सुटका करून घेणे आवश्यक आहे. उदा. सोनिया गांधी यांचे सचिव अहमद पटेल हे आजकाल पूर्ण अंधारात असतात. पक्षात काय निर्णय होत आहेत, याची त्यांना कल्पनाच नसते. उत्तर प्रदेश निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांना आणले होते. त्यावरून अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले होते. सपासोबत युती करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनीच दिला होता. त्याला गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, प्रमोद तिवारी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता.

तथापि, राहुल यांची टीम ठाम राहिली. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला नेत्यांची लांबलचक यादी दिली होती. तथापि, संपूर्ण प्रचार अभियान राहुल यांच्याभोवतीच फिरत राहिले. नवज्योतसिंग सिद्धू, नगमा, दिग्विजयसिंग यांच्यासह अनेक नेत्यांचा उपयोग काँग्रेसला करता आला असता; पण हे नेते प्रशांत किशोर यांच्या यादीत नव्हते. त्यामुळे त्यांना दूरच ठेवण्यात आले. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी प्रचारात भागच घेतला नाही. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या निवडणुकांतही त्याचीच पुनरावृत्ती झाली; मात्र काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर कोणतेही बदल केले नाहीत. उत्तर प्रदेशातील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसला संघटनात्मक बदल करावे लागतील, असे मानले जात आहे. कार्यसमितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटणे अपरिहार्य समजले जात आहे.