शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

दिल्लीतील अधिकारी म्हणजे भाजपाचीच 'बी टीम' - केजरीवाल

By admin | Updated: December 31, 2015 17:00 IST

दिल्लीतील आयएएस व डीएएनआयसीएस नागरी सेवेतील अधिकारी म्हणजे भाजपाचीच बी-टीम आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ - दिल्ली सरकार व केंद्र सरकार यांच्यादरम्यानचा लढा आता आणखीनच तीव्र होताना दिसत असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा भाजपा व पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. 'दिल्लीतील आयएएस व डीएएनआयसीएस (दिल्ली, अंदमान अॅंड निकोबार आयलंड) नागरी सेवेतील अधिकारी म्हणजे भाजपाचीच बी-टीम आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हे पंतप्रधान कार्यालयातील नृपेंद्र मिश्रा यांच्या संपर्कात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 
मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेल्या फाईल्सवर स्वाक्षरी करायला नकार दिला म्हणून दिल्ली सरकारने डीएएनआयसीएस केडरचे यशपाल गर्ग आणि सुभाष चंद्रा या दोन अधिका-यांना बुधवारी निलंबित केले. या निलंबनाच्या कारवाई विरोधात आणि राज्य व केंद्र सरकारमधील संघर्षामध्ये अधिकारी भरडले असल्याचे सांगचत गुरुवारी दिल्लीतील २०० अधिकारी एकदिवसाच्या सामूहिक रजेवर गेले. 
मात्र केंद्र सरकारने गुरुवारी सकाळी दिल्ली सरकारने या अधिका-यांचे केलेले निलंबन रद्द केले. दिल्ली सरकारचा हा निर्णय बेकायदा ठरवत केंद्रीय गृहमंत्रालयाने  ही निलंबनाची कारवाई रद्द केली. केवळ दिल्लीचे नायब राज्यपाल केंद्र सरकारच्या परवानगीने दिल्ली, अंदमान अॅंड निकोबार आयलंड नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना निलंबित करू शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.