शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

किमान दोन सरचिटणीसांना हटवा- दुर्रानी यांची मागणी काँग्रेसमध्ये मतभेद : संघटनात्मक बदलाच्या मागणीला जोर

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता उघड उघड तलवारबाजी सुरू झाली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसमधील संघर्ष जाहीररीत्या चव्हाट्यावर आणला होता. आता माजी सरचिटणीस अनिस दुर्रानी यांनी किमान दोन सरचिटणीसांना हटवा, अशी मागणी करीत अंतर्गत संघर्षात भर घातली आहे.

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता उघड उघड तलवारबाजी सुरू झाली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसमधील संघर्ष जाहीररीत्या चव्हाट्यावर आणला होता. आता माजी सरचिटणीस अनिस दुर्रानी यांनी किमान दोन सरचिटणीसांना हटवा, अशी मागणी करीत अंतर्गत संघर्षात भर घातली आहे.
अलीकडील निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार असलेल्या किमान दोन सरचिटणीसांना हटविण्याची मागणी करताना त्यांनी जनार्दन द्विवेदी आणि मधुसुदन मिस्त्री यांना लक्ष्य बनविले. मे २०१४ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे दोघे जबाबदार असल्याचे त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. पक्षाच्या पराभवाबद्दल केवळ प्रदेश नेत्यांनाच जबाबदार धरले जात असून त्यांची उचलबांगडी केली जाते, दुसरीकडे सरचिटणीसांना किरकोळ बदल करीत कायम ठेवले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
------------------
काय म्हणाले होते द्विवेदी?
लोकसभेच्या निवडणुकीआधी जनार्दन द्विवेदी यांनी अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य घटकांच्या नोकरीतील आरक्षणाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती, त्यामुळे काँग्रेसच्या व्होटबँकेला हादरा बसला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीयत्वाचे प्रतीक असे संबोधत मुक्तकंठाने स्तुती केली होती. त्यामुळे दिल्लीतील पारंपरिक मतदारांवर प्रभाव पडला, असेही दुर्रानींनी पत्रात म्हटले. द्विवेदी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत बेजबाबदार तुलनात्मक विधाने करीत काँग्रेसनिष्ठ कार्यकर्त्यांना चुकीचा संदेश दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
-------------------
उपोषणाला बसणार
या दोन नेत्यांना हटविले जात नाही तोपर्यंत काँग्रेसच्या मुख्यालयासमोर उपोषणाची परवानगी द्यावी. काँग्रेसचे दुसरे सरचिटणीस मधुसुदन मिस्त्री यांनी उत्तर प्रदेशातील सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांचा राजकारणाशी संबंध नसल्यामुळे पक्षाची स्थिती आणखी खालावत गेली, या शब्दांत दुर्रानी यांनी तोफ डागली.