शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

सरकारवर टीका करा, पण मातृभूमीचा अवमान नको - रिजिजू

By admin | Updated: February 27, 2017 19:37 IST

राजमस महाविद्यालयात झालेला गोंधळ आणि गुरमेहर कौर विवादावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षामध्ये विवाद वाढत चालला आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 27 - राजमस महाविद्यालयात झालेला गोंधळ  आणि गुरमेहर कौर विवादावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षामध्ये विवाद वाढत चालला आहे. एकीकडे काँग्रेसने या घटनेसाठी संघ आणि मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. तर  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर देशविरोधी घोषणाबाजी करणे अयोग्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.  
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विद्यापीठांच्या आवारात देशविरोधी घोषणाबाजी करण्याचा परवाना नव्हे. विरोधकांनी सरकारवर टीका करावी, पण मातृभूमीला शिविगाळ करू नये, असे ट्विट केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे. तर भय आणि अत्याचाराविरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता आणि अन्यायाविरोधात उठलेल्या प्रत्येक आवाजात गुरमोहर कौर असेल, असे ट्विट करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. 
दरम्यान, "केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही या विवादावरून विरोधकांना टोला लगावला आहे. "काही व्यक्ती विद्यापीठांना फुटिरतावादाच्या प्रयोगशाळा बनवू इच्छित आहेत. येथे विरोधाचे स्वागत आहे, पण फुटिरतावाद खपवून घेतला जाणार नाही," असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेस आणि आपने गुरमोहर कौरला मिळालेल्या धमक्यांवरून भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. या विवादात उडी घेताना वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानची बाजू घेणाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.