शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

प्राणवायू घेऊन प्राणवायूच सोडणारा पृथ्वीतलावर गाय एकमेव प्राणी!

By admin | Updated: January 17, 2017 05:17 IST

श्वास घेताना प्राणवायू घेणारा व श्वास सोडतानाही प्राणवायूच बाहेर सोडणारा गाय हा या पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी आहे

जयपूर : श्वास घेताना प्राणवायू घेणारा व श्वास सोडतानाही प्राणवायूच बाहेर सोडणारा गाय हा या पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी आहे, अशी मुक्ताफळे राजस्थानचे शिक्षण आणि पंचायत राजमंत्री वासुदेव देवनानी यांनी उधळली आहेत.राज्याच्या शिक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार अक्षयपात्र फौंडेशनने हिंगोनिया गोशाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात देवनानी यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ‘गाय एकमात्र प्राणी है जो आॅक्सिजन ग्रहण करता है और आॅक्सिजनही छोडता है!’गाईंचे संगोपन व रक्षण करणे का गरजेचे आहे हे विषद करताना देवनानी यांनी गाय या प्राण्याला आणखीही काही महान गुणधर्ण बहाल करून टाकले. सर्दी अणि पडसे यासारखे आजार केवळ गाईच्या सहवासात राहिल्याने बरे होतात, एवढेच सांगून न थांबता, गाईच्या शेणात ‘बी’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते व त्यामुळे किरणोत्साराचे दुष्परिणाम शोषून घेतले जातात, असेही त्यांनी सांगून टाकले.सजीव प्राणी हवेतील प्राणवायू घेतात व कार्बन डायआॅक्साईड बाहेर सोडतात, हे सर्वमान्य वैज्ञानिक सत्य आहे. किंबहुना सजीव हवेतील प्राणवायूमुळेच जिवंत राहू शकतो व म्हणूनच या वायूला प्राणवायू म्हणतात. या वैज्ञानिक सत्याला गाईच्या बाबतीत खोटे ठरविणारे विधान करताना मंत्री देवनानी यांनी कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यांचा दाखला दिला नाही. परंतु गाईचे वैज्ञानिक महत्व समजून घेऊन त्याचा प्रसार करण्याचे काम खास करून तरुण पिढीने करावे, असे त्यांनी आवाहन केले.देवनानी यांची ही मुक्ताफळे संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या (फाओ) २००६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वैज्ञानिक अहवालास पूर्णपणे छेद देणारे आहे. जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरणारे १८ टक्के ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ गुरांसह अन्य पाळीव प्राण्यांमुळे उत्सर्जित होतात व हे उत्सर्जनाचे प्रमाण विमानांसह सर्व प्रकारच्या वाहनांमुळे होणाऱ्या ‘ग्रान हाऊस गॅसेस’च्या एकत्रित उत्सर्जनाहून जास्त आहे, असे त्या अहवालात नमूद करण्यात आले होते. देवनानी यांची ही विधाने धक्कादायक असली तरी आश्चर्यकारक नाहीत. कारण केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून गाय हे संघ परिवारवाल्यांचे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक अस्त्रही बनले आहे. >गार्इंच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय व मंत्री असलेले राजस्थान हे भारतातील एकमेव राज्य आहे.मंत्री देवनानी यांनी ज्या हिंगोनिया गोशाळेत हे गोमहात्म्य आख्यान लावले त्याच ठिकाणी गेल्या वर्षी जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांत ५०० हून अधिक गाई हेळसांड होऊन मरण पावल्या होत्या. एवढेच नव्हे तर राज्य सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या गोशाळांमध्ये गेल्या वर्षभरात ८,१२२ गायी मरण पावल्याची आकडेवारी राज्य सरकारनेच दिली होती.>500हून अधिक गायींचा मृत्यू जुलै व आॅगस्ट दोन महिन्यांत >8122गायींचा वर्षभरात मृत्यू