शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानगीसाठी ‘आवाज’ मोजा

By admin | Updated: August 17, 2016 04:59 IST

आता शहरात नवे बांधकाम करण्यापूर्वी विकासकांना प्रस्तावित बांधकामांमुळे संबंधित परिसरात आवाजाची पातळी किती वाढणार आहे

मुंबई : आता शहरात नवे बांधकाम करण्यापूर्वी विकासकांना प्रस्तावित बांधकामांमुळे संबंधित परिसरात आवाजाची पातळी किती वाढणार आहे, याची माहिती देणे बंधनकारक होणार आहे. उच्च न्यायालयाने वाढत्या ध्वनिप्रदूषणाची गांभीर्याने दखल घेत सर्व नियोजन प्राधिकरणांना विकासकांकडून अशी माहिती घेण्याचे बंधन घाला, असा आदेश राज्य सरकारला दिला. तसेच राज्यातील सर्व मुख्य शहरांचे ध्वनिमापन करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणांबाबत उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने मंगळवारी निकाल दिला.शहराचे ध्वनिप्रदूषण मर्यादेपेक्षा अधिक वाढू नये यासाठी उच्च न्यायालयाने विकासकांना नवीन बांधकामासाठी परवानगी देण्यापूर्वी प्रस्तावित बांधकामामुळे संबंधित परिसरातील आवाजाच्या पातळीत किती वाढ होईल? याची माहिती देणे बंधनकारक करा. तसा आदेश सर्व नियोजन प्राधिकरणांना द्या, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले. या याचिकांमध्ये धार्मिक स्थळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करण्यात आला असला तरी आम्ही नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा विचार करत आहोत. जे आदेश देण्यात येतील, ते सर्व धर्मांसाठी लागू होतील. कोणताही धर्म नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यास सांगत नाही, असेही खंडपीठाने म्हटले. सर्व धार्मिक स्थळे ‘शांतता क्षेत्रात’ येत असल्याने त्यांना ध्वनीक्षेपक लावण्यासाठी संबंधित प्रशासनकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच त्यांनी ध्वनीक्षेपकाचा आवाज धार्मिक स्थळाच्या आवराबाहेर जाऊ देऊ नये, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.मंडपांना परवानगी देताना सारासार विचार करा, आता उत्सवांचा काळ सुरू झाल्याने उच्च न्यायालयाने महापालिका व पोलीस आयुक्तांना मंडप, ध्वनीक्षेपक, खड्डे खणणे, होर्डिंग्स लावणे इत्यादींना परवानगी देताना सारासार विचार करा, असे बजावले. वाहनांची कोंडी आणि पादचारी कोंडी होणार नाही, याची काळजी घ्या, असे खंडपीठाने म्हटले. तसेच मंडप उभारण्यास परवानगी दिली, याचा अर्थ ध्वनीक्षेपक लावण्यास, खड्डे खणण्यास व होर्डिंग लावण्यास परवानगी दिली, असे होत नाही. प्रत्येक बाबीसाठी संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल, असेही खंडपीठाने आयोजकांना बजावले. (प्रतिनिधी)वर्षातून केवळ १५ दिवसांचा अपवादरात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत आवजाची मर्यादा ५५ डेसिबलपेक्षा अधिक असू नये, असे ध्वनीप्रदूषणाच्या नियमांत म्हटले आहे. मात्र राज्य सरकारने ३१ जुलै २०१३ रोजी अधिसूचना काढून वर्षातून ३० दिवस याला अपवाद ठरवले. तसेच कोणत्या सणासाठी किती दिवस द्यायचे, याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घेण्यास सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही मुभा केवळ १५ दिवस दिली जाऊ शकते. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारची २०१३ ची अधिसूचना बेकायदेशीर ठरवून जिल्हाधिकाऱ्यांना असे अधिकार देता येणार नाहीत, असेही स्पष्ट केले. हॉर्नच्या ध्वनीप्रदूषणास आळा घालाहॉर्नमुळे व बांधकामांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणास आळा घालण्यासाठी येत्या तीन महिन्यांत उपाययोजना आखा, असे निर्देश देत उच्च न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्या. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली की नाही, याचा आढावा घेण्यासाठी खंडपीठाने या याचिकांवरील सुनावणी ४ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे.कायद्यानुसार ‘शांतता क्षेत्रात’ ध्वनिक्षेपक वापरण्यास बंदी असून, या नियमाचे उल्लंघन करणे म्हणजे गुन्हा आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देणे शक्य नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारची भूमिका अयोग्य ठरवली. त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्क व शांतता क्षेत्रात येणाऱ्या अनेक मोकळ्या मैदानांवर राजकीय सभांसाठी व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी येऊ शकते. मात्र या शांतता क्षेत्रात एखादे चित्रपटगृह, नाट्यगृह व एखाद्या समाजाचा हॉल असल्यास आवाज त्यांच्या आवाराबाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही न्यायालयाने निकालात म्हटले.