शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

परदेश दौरे बंद करा आणि कामाला लागा - राहुल गांधींचा मोदींना टोला

By admin | Updated: November 8, 2015 14:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरे बंद करुन देशात कामाला लागावे असा खोचक सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ८ - बिहार निवडणुकीत अहंकारावर प्रेमाचा,  विभाजनवादावर एकतेचा विजय झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरे बंद करुन देशात कामाला लागावे असा खोचक सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना दिला आहे. 

बिहार निवडणुकीत जदयूप्रणीत महाआघाडीने मुसंडी मारली असून या विजयानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. भाजपावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, मोदींनी परदेश दौरे थांबवून देशातील शेतक-यांकडे गेले पाहिजे, त्यांच्यासाठी काम करावे. देशातील वर्षभरापासून मोदींमुळे थांबली आहे. मोदींनी प्रचार, भाषण थांबवून गाडीचा अॅक्सिलेटर दाबावा व काम सुरु करावे असा टोलाही त्यांनी लगावला. बिहारमधील विजय हा रालोआविरोधातील नसून संघ व भाजपाच्या विचारधारेविरोधातील हा कौल आहे असेही त्यांनी नमूद केले. मोदींनी त्यांचा अहंकार कमी केला तर त्याचा फायदा त्यांना व देशालाच होईल. मोदींनी सुधारणा केली नाही तर बिहारमध्ये जे झाले तसेच संपूर्ण देशात होईल असेही त्यांनी म्हटले आहे.