गोविंदा मंडळांना मुख्यमंत्रीचा उत्तर देतील-
By admin | Updated: August 26, 2015 00:19 IST
गोविंदा मंडळांना मुख्यमंत्रीच उत्तर देतील
गोविंदा मंडळांना मुख्यमंत्रीचा उत्तर देतील-
गोविंदा मंडळांना मुख्यमंत्रीच उत्तर देतीलक्रीडामंत्री तावडे यांचा पवित्रा: चंेडू परस्पर टोलावलामुंबई- गोविंदा मंडळांवर लादलेल्या निर्बंधाबाबत राज्य सरकारने ७२ तासांमध्ये निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही उत्सवात सहभागी होणार नाही, असा अल्टीमेटम या मंडळांनी मुख्यमंत्र्यांना दिला असल्याने तेच याबाबत उत्तर देतील, असा पवित्रा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी घेतला.गोविंदा मंडळांवर थर लावण्याबाबत तसेच गोविंदांच्या वयाबाबत न्यायालयाच्या आदेशावरून बंधने घालण्यात आली आहेत. तसे आदेश राज्य शासनाने जारी केल्याने गोविंदा मंडळांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे काही मंडळांनी येत्या ७२ तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असा पवित्रा घेतला. दहीहंडी उत्सवावर बहिष्कार घालण्याची भाषा काही मंडळांनी केली आहे. याकडे तावडे यांचे लक्ष वेधले असता यंदा उत्सव दणदणीत साजरा केला जाईल. प्रत्यक्ष कोण उत्सवात भाग घेण्यास रस्त्यावर उतरले ते तुम्हाला पाहायला मिळेल. क्रीडा खात्याने याबाबत सर्व बाबी स्पष्ट करणारे पत्रक काढले असून उद्यापासून गोविंदा मंडळे सराव सुरु करतील, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)