शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘चरखा चालवून स्वातंत्र्य मिळाले नाही’

By admin | Updated: March 18, 2015 23:50 IST

देशात धार्मिक असहिष्णुता वाढली असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असताना विश्व हिंदू परिषदेचे नेते मात्र सातत्याने वादग्रस्त विधाने करून केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढवीत आहेत.

लखनौ : देशात धार्मिक असहिष्णुता वाढली असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असताना विश्व हिंदू परिषदेचे नेते मात्र सातत्याने वादग्रस्त विधाने करून केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढवीत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे ब्रिटिशांचे एजंट होते, असा आरोप करून विहिंपच्या साध्वी प्राची यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. भारताला केवळ चरखे चालवून स्वातंत्र्य मिळालेले नाही, तर वीर सावरकर व भगतसिंग यांच्यासारख्या शूर पुत्रांच्या बलिदानाने हा देश मुक्त होऊ शकला, असेही वक्तव्य त्यांनी केले. उत्तर प्रदेशच्या बहरीच जिल्ह्यात मंगळवारी हिंदू संमेलनात मार्गदर्शन करताना साध्वींनी पुन्हा एकदा आपले कटू विचार मांडले. भारत माता की जय व वंदे मातरम् म्हणण्यास नकार देणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. तसेच गायींची कत्तल करणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असेही मत त्यांनी मांडले. (वृत्तसंस्था)यापूर्वीही अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले होते. भारतीय नागरिकाला मग तो हिंदू असो वा मुस्लिम, दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवले जावे, अशी मागणी करीत त्यांनी ‘हम दो हमारो दो’ चा नारा लावला. विशेष म्हणजे साध्वी प्राची यांनी यापूर्वी हिंदूंना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते.