शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

‘चरखा चालवून स्वातंत्र्य मिळाले नाही’

By admin | Updated: March 18, 2015 23:50 IST

देशात धार्मिक असहिष्णुता वाढली असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असताना विश्व हिंदू परिषदेचे नेते मात्र सातत्याने वादग्रस्त विधाने करून केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढवीत आहेत.

लखनौ : देशात धार्मिक असहिष्णुता वाढली असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असताना विश्व हिंदू परिषदेचे नेते मात्र सातत्याने वादग्रस्त विधाने करून केंद्रातील मोदी सरकारच्या अडचणी वाढवीत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे ब्रिटिशांचे एजंट होते, असा आरोप करून विहिंपच्या साध्वी प्राची यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. भारताला केवळ चरखे चालवून स्वातंत्र्य मिळालेले नाही, तर वीर सावरकर व भगतसिंग यांच्यासारख्या शूर पुत्रांच्या बलिदानाने हा देश मुक्त होऊ शकला, असेही वक्तव्य त्यांनी केले. उत्तर प्रदेशच्या बहरीच जिल्ह्यात मंगळवारी हिंदू संमेलनात मार्गदर्शन करताना साध्वींनी पुन्हा एकदा आपले कटू विचार मांडले. भारत माता की जय व वंदे मातरम् म्हणण्यास नकार देणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. तसेच गायींची कत्तल करणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असेही मत त्यांनी मांडले. (वृत्तसंस्था)यापूर्वीही अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले होते. भारतीय नागरिकाला मग तो हिंदू असो वा मुस्लिम, दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवले जावे, अशी मागणी करीत त्यांनी ‘हम दो हमारो दो’ चा नारा लावला. विशेष म्हणजे साध्वी प्राची यांनी यापूर्वी हिंदूंना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते.