शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

मानसिकता बदला, विकास निश्चितच होईल बांगर यांचे मार्गदर्शन : दोन हजार रुपयात शोषखड्डा निर्मिती शक्य

By admin | Updated: March 18, 2016 00:14 IST

जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली तर आरोग्याच्या समस्या सुटतील व विकास होईल, असे मत साक्री पं.स.चे शाखा अभियंता व्ही.एस.बांगर यांनी व्यक्त केले.

जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली तर आरोग्याच्या समस्या सुटतील व विकास होईल, असे मत साक्री पं.स.चे शाखा अभियंता व्ही.एस.बांगर यांनी व्यक्त केले.
कांताई सभागृहात गुरुवारी शोषखड्डा व भूमीगत गटार निर्मितीबाबत सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळा झाली. त्या वेळी बांगर हे शोषखड्डा निर्मितीसंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. अध्यक्ष प्रयाग कोळी, सभापती नीता चव्हाण, सीईओ आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, मीनल कुटे आदी उपस्थित होते.

दोन हजारात शोषखड्डा
जेथे गटार बांधणे शक्य नाही किंवा इतर कारणे आहे तेथे शोषखड्डा तयार करता येईल. २० इंच व्यास व साधारणत: १० फूट खोल खड्डा करून त्यात वरून पाईपद्वारे सांडपाणी सोडता येईल. या खड्ड्याला आजूबाजूने सिमेंटचे आवरण असते. फक्त दोन हजार रुपयात हा खड्डा तयार करता येईल. त्यात सांडपाणी सोडून भूगर्भात पाणी जिरविता येईल यामुळे गावातील पाणी प्रश्न सुटू शकतो, असेही ते म्हणाले. त्यांनी साक्री तालुक्यात विविध ग्रा.पं.अंतर्गत झालेल्या शोषखड्ड्यांबाबतची सचित्र माहिती दिली.

निम्मे पदाधिकारी अनुपस्थित
या कार्यशाळेला उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती सुरेश धनके, मीना पाटील, दर्शना घोडेस्वार हे अनुपस्थित राहीले.

ग्रामविकासाचे मॉडेल विकसित व्हावे
सीईओ पांडेय म्हणाले, सरपंच व ग्रामसेवक यांनी आपले गाव मॉडेल म्हणून विकसित करावे. त्यासाठी प्रथम मानसिकता बदलावी लागेल. मनरेगातून अकुशल कामे फारशी होत नाहीत. या अकुशल कामांच्या माध्यमातून मध्य प्रदेशात कृषि विकास दर १० टक्के मिळविणे शक्य झाले आहे. दरवर्षी तेथे मनरेगातून शेतीसाठी प्रचंड काम केले जाते. पण आपल्याकडे कुशल कामांवर अधिक भर असतो. त्यामुळे मनरेगाच्या कुशल, अकुशल कामांबाबत ताळमेळ राहत नाही व विकासाचा समतोलही साधला जात नाही. मनरेगा विकास करण्याची मोठी योजना आहे. ती समजून घेतली पाहीजे. वर्षभराच्या कामांचा आराखडा, नियोजन त्यातून सादर केले जावे. पण जी योजना पुढे येते, त्याबाबत नकारात्मक विचार पसरविले जातात. यामुळे कामाची गती मंद असते, असेही पांडेय म्हणाले.