शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

मानसिकता बदला, विकास निश्चितच होईल बांगर यांचे मार्गदर्शन : दोन हजार रुपयात शोषखड्डा निर्मिती शक्य

By admin | Updated: March 18, 2016 00:14 IST

जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली तर आरोग्याच्या समस्या सुटतील व विकास होईल, असे मत साक्री पं.स.चे शाखा अभियंता व्ही.एस.बांगर यांनी व्यक्त केले.

जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली तर आरोग्याच्या समस्या सुटतील व विकास होईल, असे मत साक्री पं.स.चे शाखा अभियंता व्ही.एस.बांगर यांनी व्यक्त केले.
कांताई सभागृहात गुरुवारी शोषखड्डा व भूमीगत गटार निर्मितीबाबत सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळा झाली. त्या वेळी बांगर हे शोषखड्डा निर्मितीसंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. अध्यक्ष प्रयाग कोळी, सभापती नीता चव्हाण, सीईओ आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, मीनल कुटे आदी उपस्थित होते.

दोन हजारात शोषखड्डा
जेथे गटार बांधणे शक्य नाही किंवा इतर कारणे आहे तेथे शोषखड्डा तयार करता येईल. २० इंच व्यास व साधारणत: १० फूट खोल खड्डा करून त्यात वरून पाईपद्वारे सांडपाणी सोडता येईल. या खड्ड्याला आजूबाजूने सिमेंटचे आवरण असते. फक्त दोन हजार रुपयात हा खड्डा तयार करता येईल. त्यात सांडपाणी सोडून भूगर्भात पाणी जिरविता येईल यामुळे गावातील पाणी प्रश्न सुटू शकतो, असेही ते म्हणाले. त्यांनी साक्री तालुक्यात विविध ग्रा.पं.अंतर्गत झालेल्या शोषखड्ड्यांबाबतची सचित्र माहिती दिली.

निम्मे पदाधिकारी अनुपस्थित
या कार्यशाळेला उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती सुरेश धनके, मीना पाटील, दर्शना घोडेस्वार हे अनुपस्थित राहीले.

ग्रामविकासाचे मॉडेल विकसित व्हावे
सीईओ पांडेय म्हणाले, सरपंच व ग्रामसेवक यांनी आपले गाव मॉडेल म्हणून विकसित करावे. त्यासाठी प्रथम मानसिकता बदलावी लागेल. मनरेगातून अकुशल कामे फारशी होत नाहीत. या अकुशल कामांच्या माध्यमातून मध्य प्रदेशात कृषि विकास दर १० टक्के मिळविणे शक्य झाले आहे. दरवर्षी तेथे मनरेगातून शेतीसाठी प्रचंड काम केले जाते. पण आपल्याकडे कुशल कामांवर अधिक भर असतो. त्यामुळे मनरेगाच्या कुशल, अकुशल कामांबाबत ताळमेळ राहत नाही व विकासाचा समतोलही साधला जात नाही. मनरेगा विकास करण्याची मोठी योजना आहे. ती समजून घेतली पाहीजे. वर्षभराच्या कामांचा आराखडा, नियोजन त्यातून सादर केले जावे. पण जी योजना पुढे येते, त्याबाबत नकारात्मक विचार पसरविले जातात. यामुळे कामाची गती मंद असते, असेही पांडेय म्हणाले.