शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मानसिकता बदला, विकास निश्चितच होईल बांगर यांचे मार्गदर्शन : दोन हजार रुपयात शोषखड्डा निर्मिती शक्य

By admin | Updated: March 18, 2016 00:14 IST

जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली तर आरोग्याच्या समस्या सुटतील व विकास होईल, असे मत साक्री पं.स.चे शाखा अभियंता व्ही.एस.बांगर यांनी व्यक्त केले.

जळगाव- शौचालये असतात, पण त्यांचा वापर होत नाही. असाच प्रकार गटारींबाबत आहे. आपण टोलेजंग घर बांधतो, पण त्याच्या सांडपाण्याची चांगली व्यवस्था करीत नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणावर पैसे खर्च करावे लागतात. ग्रामस्थांनी मानसिकता बदलली तर आरोग्याच्या समस्या सुटतील व विकास होईल, असे मत साक्री पं.स.चे शाखा अभियंता व्ही.एस.बांगर यांनी व्यक्त केले.
कांताई सभागृहात गुरुवारी शोषखड्डा व भूमीगत गटार निर्मितीबाबत सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळा झाली. त्या वेळी बांगर हे शोषखड्डा निर्मितीसंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. अध्यक्ष प्रयाग कोळी, सभापती नीता चव्हाण, सीईओ आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, मीनल कुटे आदी उपस्थित होते.

दोन हजारात शोषखड्डा
जेथे गटार बांधणे शक्य नाही किंवा इतर कारणे आहे तेथे शोषखड्डा तयार करता येईल. २० इंच व्यास व साधारणत: १० फूट खोल खड्डा करून त्यात वरून पाईपद्वारे सांडपाणी सोडता येईल. या खड्ड्याला आजूबाजूने सिमेंटचे आवरण असते. फक्त दोन हजार रुपयात हा खड्डा तयार करता येईल. त्यात सांडपाणी सोडून भूगर्भात पाणी जिरविता येईल यामुळे गावातील पाणी प्रश्न सुटू शकतो, असेही ते म्हणाले. त्यांनी साक्री तालुक्यात विविध ग्रा.पं.अंतर्गत झालेल्या शोषखड्ड्यांबाबतची सचित्र माहिती दिली.

निम्मे पदाधिकारी अनुपस्थित
या कार्यशाळेला उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती सुरेश धनके, मीना पाटील, दर्शना घोडेस्वार हे अनुपस्थित राहीले.

ग्रामविकासाचे मॉडेल विकसित व्हावे
सीईओ पांडेय म्हणाले, सरपंच व ग्रामसेवक यांनी आपले गाव मॉडेल म्हणून विकसित करावे. त्यासाठी प्रथम मानसिकता बदलावी लागेल. मनरेगातून अकुशल कामे फारशी होत नाहीत. या अकुशल कामांच्या माध्यमातून मध्य प्रदेशात कृषि विकास दर १० टक्के मिळविणे शक्य झाले आहे. दरवर्षी तेथे मनरेगातून शेतीसाठी प्रचंड काम केले जाते. पण आपल्याकडे कुशल कामांवर अधिक भर असतो. त्यामुळे मनरेगाच्या कुशल, अकुशल कामांबाबत ताळमेळ राहत नाही व विकासाचा समतोलही साधला जात नाही. मनरेगा विकास करण्याची मोठी योजना आहे. ती समजून घेतली पाहीजे. वर्षभराच्या कामांचा आराखडा, नियोजन त्यातून सादर केले जावे. पण जी योजना पुढे येते, त्याबाबत नकारात्मक विचार पसरविले जातात. यामुळे कामाची गती मंद असते, असेही पांडेय म्हणाले.