शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जातीय विद्वेष पसरवणा-यांची हयगय नाही - सरन्यायाधीश

By admin | Updated: October 26, 2015 13:30 IST

धार्मिक व जातीय विद्वेषातून घडणा-या गुन्ह्यांमध्ये किंवा हेट क्राइममध्ये वाढ होत असून भारताचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी अशा गुन्हेगारांविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २६ - धार्मिक व जातीय विद्वेषातून घडणा-या गुन्ह्यांमध्ये किंवा हेट क्राइममध्ये वाढ होत असून भारताचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी अशा गुन्हेगारांविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. भारतात कायद्याचं राज्य चालतं आणि ते अबाधित रहावं म्हणून न्याययंत्रणा निकराचा प्रयत्न करत राहील, तसेच जातीय हिंसाचारातील गुन्हेगारांना कठोर शासन करण्यात येईल असंही टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दत्तू म्हणाले.
लोकांनी निवडून दिलेल्या प्रत्येक सरकारचं प्राथमिक कर्तव्य हे कायद्याचं राज्य अबाधित राखणं समाजात फूट पाडणा-यांपासून नागरीकांना संरक्षण देणं हे आहे. सध्याच्या सरकारवरही ही जबाबदारी आहे. मला खात्री आहे की सध्याचं सरकारही त्या दिशेनं प्रयत्न करत असून घटनेने नागरीकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांटे जतन केले जाईल.  
तोंड उघडायच्याआधी आपण काय बोलतोय याचा विचार करा अशा शब्दांमध्ये दोनच दिवसांपूर्वी गृहमंत्री राजनाथ सिंहांनी केंद्र सरकारातील काही वरीष्ठ नेत्यांची कानउघाडणी केली होती. सरनायाधीशांनी स्पष्ट शब्दांत व्यक्त केलेल्या या भूमिकेमुळे जातीय द्वेष पसरवणा-यांविरोधात कडक उपाय योजण्यासाठी राज्य सरकारांना बळ मिळेल अशी शक्यता आहे.