शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मानसिकतेतून भाजपाला बाहेर पडावे लागेल!

By admin | Updated: July 25, 2016 03:44 IST

आर्थिक सुधारणांचे उपाय भारतासाठी महत्त्वपूर्णच आहेत. देशाचा वेगाने विकास घडवण्याबरोबर लाखो लोकांना दारिद्र्यातून कायमचे बाहेर काढण्याची अलौकिक क्षमता या सुधारणांमध्ये आहे

नवी दिल्ली : आर्थिक सुधारणांचे उपाय भारतासाठी महत्त्वपूर्णच आहेत. देशाचा वेगाने विकास घडवण्याबरोबर लाखो लोकांना दारिद्र्यातून कायमचे बाहेर काढण्याची अलौकिक क्षमता या सुधारणांमध्ये आहे. तथापि, सत्ताधारी भाजपा आणि केंद्र सरकारमध्ये आर्थिक सुधारणांच्या धाडसाबाबत एकमत असल्याचे चित्र दिसत नाही, असे प्रतिपादन भारतातल्या आर्थिक सुधारणांचे जनक व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजधानीत एका इंग्रजी वृत्तपत्राला खास मुलाखत देताना केले.केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने २५ वर्षांपूर्वी १९९१ साली मनमोहन सिंगांनी संसदेत ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला होता. समाजवादाकडे झुकलेल्या संमिश्र अर्थव्यवस्थेचा बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास याच अर्थसंकल्पाद्वारे झाला होता. डॉ. मनमोहन सिंगांना म्हणूनच भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक मानले जाते. त्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला २५ वर्षे पूर्ण होत असताना, विद्यमान स्थितीचा एका खास मुलाखतीद्वारे मनमोहन सिंगांनी थोडक्यात समाचार घेतला.गेल्या दोन वर्षांत आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम राबवण्याची खरं तर केंद्रातल्या सरकारला अपूर्व संधी होती. तथापि, तसे धाडस मोदी सरकार दाखवू शकले नाही, बहुदा त्यामागे त्यांची काही राजकीय अपरिहार्यताही असू शकेल.आर्थिक सुधारणांचे लाभ देशाला खरोखर मिळवून देण्याची इच्छा असेल, तर राजकीय पक्षांमध्ये त्याबाबत सहमतीचा एकच स्वर असायला हवा. तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी मुख्यत्वे विद्यमान केंद्र सरकारवर आहे. उभयपक्षी संवादासाठी सत्ताधारी भाजपला सर्वप्रथम ‘काँग्रेसमुक्त भारत’ या तथाकथित घोषणेच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेससारख्या महत्त्वाच्या राजकीय पक्षाला हे सरकार अशा प्रकारे तुच्छतेची वागणूक देणार असेल तर त्याच काँग्रेसकडून सहकार्याची अपेक्षा ते कोणत्या आधारे करतात? असा सवालही मनमोहन सिंगांनी या वेळी उपस्थित केला.राष्ट्रीय उत्पन्नाची गणना मोदी सरकारने नव्या पद्धतीने सुरू केली. आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांमध्ये या पद्धतीबाबत मूलभूत मतभेद आहेत. ही पद्धत वादग्रस्तही ठरली आहे, याबाबत तुमचे मत काय? असे विचारता, नव्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याबाबत व्यक्तिश: आपण सहमत आहोत, असे निसंदिग्धपणे मनमोहन सिंगांनी सांगितले. त्याचबरोबर, यंदा मान्सून चांगला बरसला, तर भारताचा विकास दर ७ ते ७.५0 टक्क्यांवर पोहोचेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)वस्तू व सेवा कर (जीएसटी) कराबद्दल बोलताना माजी पंतप्रधान म्हणाले, ‘देशातल्या विविध राज्यांमधे विविध स्वरूपाचे कर अस्तित्वात आहेत. हे कर बाद करून त्या ऐवजी देशभर एकिकृत स्वरूपाचा जीएसटी कायदा मंजूर करताना, त्याच्या दूरगामी परिणामांचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाने या संदर्भात ३ महत्त्वाच्या शंका उपस्थित केल्या आहेत. या शंकांचे योग्य प्रकारे निरसन आजतागायत केंद्र सरकारने केलेले नाही. राज्यसभेत म्हणूनच जीएसटी विधेयक अडकून पडले आहे.’