शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

‘त्या’ मानसिकतेतून भाजपाला बाहेर पडावे लागेल!

By admin | Updated: July 25, 2016 03:44 IST

आर्थिक सुधारणांचे उपाय भारतासाठी महत्त्वपूर्णच आहेत. देशाचा वेगाने विकास घडवण्याबरोबर लाखो लोकांना दारिद्र्यातून कायमचे बाहेर काढण्याची अलौकिक क्षमता या सुधारणांमध्ये आहे

नवी दिल्ली : आर्थिक सुधारणांचे उपाय भारतासाठी महत्त्वपूर्णच आहेत. देशाचा वेगाने विकास घडवण्याबरोबर लाखो लोकांना दारिद्र्यातून कायमचे बाहेर काढण्याची अलौकिक क्षमता या सुधारणांमध्ये आहे. तथापि, सत्ताधारी भाजपा आणि केंद्र सरकारमध्ये आर्थिक सुधारणांच्या धाडसाबाबत एकमत असल्याचे चित्र दिसत नाही, असे प्रतिपादन भारतातल्या आर्थिक सुधारणांचे जनक व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजधानीत एका इंग्रजी वृत्तपत्राला खास मुलाखत देताना केले.केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने २५ वर्षांपूर्वी १९९१ साली मनमोहन सिंगांनी संसदेत ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला होता. समाजवादाकडे झुकलेल्या संमिश्र अर्थव्यवस्थेचा बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास याच अर्थसंकल्पाद्वारे झाला होता. डॉ. मनमोहन सिंगांना म्हणूनच भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक मानले जाते. त्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला २५ वर्षे पूर्ण होत असताना, विद्यमान स्थितीचा एका खास मुलाखतीद्वारे मनमोहन सिंगांनी थोडक्यात समाचार घेतला.गेल्या दोन वर्षांत आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम राबवण्याची खरं तर केंद्रातल्या सरकारला अपूर्व संधी होती. तथापि, तसे धाडस मोदी सरकार दाखवू शकले नाही, बहुदा त्यामागे त्यांची काही राजकीय अपरिहार्यताही असू शकेल.आर्थिक सुधारणांचे लाभ देशाला खरोखर मिळवून देण्याची इच्छा असेल, तर राजकीय पक्षांमध्ये त्याबाबत सहमतीचा एकच स्वर असायला हवा. तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी मुख्यत्वे विद्यमान केंद्र सरकारवर आहे. उभयपक्षी संवादासाठी सत्ताधारी भाजपला सर्वप्रथम ‘काँग्रेसमुक्त भारत’ या तथाकथित घोषणेच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेससारख्या महत्त्वाच्या राजकीय पक्षाला हे सरकार अशा प्रकारे तुच्छतेची वागणूक देणार असेल तर त्याच काँग्रेसकडून सहकार्याची अपेक्षा ते कोणत्या आधारे करतात? असा सवालही मनमोहन सिंगांनी या वेळी उपस्थित केला.राष्ट्रीय उत्पन्नाची गणना मोदी सरकारने नव्या पद्धतीने सुरू केली. आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांमध्ये या पद्धतीबाबत मूलभूत मतभेद आहेत. ही पद्धत वादग्रस्तही ठरली आहे, याबाबत तुमचे मत काय? असे विचारता, नव्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याबाबत व्यक्तिश: आपण सहमत आहोत, असे निसंदिग्धपणे मनमोहन सिंगांनी सांगितले. त्याचबरोबर, यंदा मान्सून चांगला बरसला, तर भारताचा विकास दर ७ ते ७.५0 टक्क्यांवर पोहोचेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)वस्तू व सेवा कर (जीएसटी) कराबद्दल बोलताना माजी पंतप्रधान म्हणाले, ‘देशातल्या विविध राज्यांमधे विविध स्वरूपाचे कर अस्तित्वात आहेत. हे कर बाद करून त्या ऐवजी देशभर एकिकृत स्वरूपाचा जीएसटी कायदा मंजूर करताना, त्याच्या दूरगामी परिणामांचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाने या संदर्भात ३ महत्त्वाच्या शंका उपस्थित केल्या आहेत. या शंकांचे योग्य प्रकारे निरसन आजतागायत केंद्र सरकारने केलेले नाही. राज्यसभेत म्हणूनच जीएसटी विधेयक अडकून पडले आहे.’