शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मानसिकतेतून भाजपाला बाहेर पडावे लागेल!

By admin | Updated: July 25, 2016 03:44 IST

आर्थिक सुधारणांचे उपाय भारतासाठी महत्त्वपूर्णच आहेत. देशाचा वेगाने विकास घडवण्याबरोबर लाखो लोकांना दारिद्र्यातून कायमचे बाहेर काढण्याची अलौकिक क्षमता या सुधारणांमध्ये आहे

नवी दिल्ली : आर्थिक सुधारणांचे उपाय भारतासाठी महत्त्वपूर्णच आहेत. देशाचा वेगाने विकास घडवण्याबरोबर लाखो लोकांना दारिद्र्यातून कायमचे बाहेर काढण्याची अलौकिक क्षमता या सुधारणांमध्ये आहे. तथापि, सत्ताधारी भाजपा आणि केंद्र सरकारमध्ये आर्थिक सुधारणांच्या धाडसाबाबत एकमत असल्याचे चित्र दिसत नाही, असे प्रतिपादन भारतातल्या आर्थिक सुधारणांचे जनक व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजधानीत एका इंग्रजी वृत्तपत्राला खास मुलाखत देताना केले.केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने २५ वर्षांपूर्वी १९९१ साली मनमोहन सिंगांनी संसदेत ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला होता. समाजवादाकडे झुकलेल्या संमिश्र अर्थव्यवस्थेचा बाजारपेठीय अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास याच अर्थसंकल्पाद्वारे झाला होता. डॉ. मनमोहन सिंगांना म्हणूनच भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक मानले जाते. त्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला २५ वर्षे पूर्ण होत असताना, विद्यमान स्थितीचा एका खास मुलाखतीद्वारे मनमोहन सिंगांनी थोडक्यात समाचार घेतला.गेल्या दोन वर्षांत आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम राबवण्याची खरं तर केंद्रातल्या सरकारला अपूर्व संधी होती. तथापि, तसे धाडस मोदी सरकार दाखवू शकले नाही, बहुदा त्यामागे त्यांची काही राजकीय अपरिहार्यताही असू शकेल.आर्थिक सुधारणांचे लाभ देशाला खरोखर मिळवून देण्याची इच्छा असेल, तर राजकीय पक्षांमध्ये त्याबाबत सहमतीचा एकच स्वर असायला हवा. तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी मुख्यत्वे विद्यमान केंद्र सरकारवर आहे. उभयपक्षी संवादासाठी सत्ताधारी भाजपला सर्वप्रथम ‘काँग्रेसमुक्त भारत’ या तथाकथित घोषणेच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेससारख्या महत्त्वाच्या राजकीय पक्षाला हे सरकार अशा प्रकारे तुच्छतेची वागणूक देणार असेल तर त्याच काँग्रेसकडून सहकार्याची अपेक्षा ते कोणत्या आधारे करतात? असा सवालही मनमोहन सिंगांनी या वेळी उपस्थित केला.राष्ट्रीय उत्पन्नाची गणना मोदी सरकारने नव्या पद्धतीने सुरू केली. आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांमध्ये या पद्धतीबाबत मूलभूत मतभेद आहेत. ही पद्धत वादग्रस्तही ठरली आहे, याबाबत तुमचे मत काय? असे विचारता, नव्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याबाबत व्यक्तिश: आपण सहमत आहोत, असे निसंदिग्धपणे मनमोहन सिंगांनी सांगितले. त्याचबरोबर, यंदा मान्सून चांगला बरसला, तर भारताचा विकास दर ७ ते ७.५0 टक्क्यांवर पोहोचेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)वस्तू व सेवा कर (जीएसटी) कराबद्दल बोलताना माजी पंतप्रधान म्हणाले, ‘देशातल्या विविध राज्यांमधे विविध स्वरूपाचे कर अस्तित्वात आहेत. हे कर बाद करून त्या ऐवजी देशभर एकिकृत स्वरूपाचा जीएसटी कायदा मंजूर करताना, त्याच्या दूरगामी परिणामांचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाने या संदर्भात ३ महत्त्वाच्या शंका उपस्थित केल्या आहेत. या शंकांचे योग्य प्रकारे निरसन आजतागायत केंद्र सरकारने केलेले नाही. राज्यसभेत म्हणूनच जीएसटी विधेयक अडकून पडले आहे.’