शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

भाजपा, संघाला मराठा आरक्षण नको

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

नारायण राणे : बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी बीड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा व शिवसेना पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते ...


नारायण राणे : बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी

बीड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा व शिवसेना पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केला.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा अभ्यासपूर्ण अहवाल बनविला होता. त्याचे कौतुक झाले. मात्र कोर्टात सरकारची बाजू मांडताना भाजपा सरकार कमी पडले. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी जसा आरक्षणाचा लढा उभा केला आहे त्या प्रकारे महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकी दाखवावी. एका बाजूला शेतकर्‍यावर नैसर्गिक संकट ओढावले आहे तर दुसर्‍या बाजूला शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. मराठवाड्यावर एकाच वेळी सुलतानी व नैसर्गिक संकट आले आहे.
राणे यांनी शिरुर कासार तालुक्यातील खालापुरी, बीड तालुक्यातील लिंबागणेश, औरंगपुर, रुई गावांची पाहणी केली. (प्रतिनिधी)
-----------------
पाणी द्या !
मालदीवच्या लोकांना विमानामार्फत पाणी नेऊन देण्याचे पाऊल मोदी सरकारने उचलले आहे. मराठवाड्यातील लोकांना पाण्याची गरज आहे. त्यांच्याही पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी राणे यांनी केली.
--------------
दीर्घकालीन उपायांची गरज - शे˜ी
शासनाकडून शेती व्यवसायासाठी जोपर्यंत दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येणार नाहीत, तोपर्यंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शे˜ी यांनी नांदेडमध्ये सांगितले.
-----------
दिल्लीला मोर्चा - रघुनाथ पाटील
शेतकर्‍यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळावा आजी मागण्यांसाठी दिल्लीत २ ऑक्टोबरला देशभरातील शेतकरी संघटना मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी नगरमध्ये दिली.
---------------
साधुसंत योग्यतेचे आहेत का?
सरकार हिंदुत्ववाद्यांचे आहे म्हणून नाशिकला होणार्‍या कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये दिले़ मात्र, हे साधुसंत त्या योग्यतेचे आहेत का? सरकार धार्मिकता पसरवत आहे़ तेच पैसे शेतकर्‍यांसाठी का वापरले जात नाहीत? दुष्काळात छावण्या सुरु न करता सरकारने शेतकर्‍यांना घरीच जनावरे सांभाळण्यासाठी पैसे द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी केली.