शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

बौद्धांचे प्रेरणास्रोत अनागारिक धम्मपाल

By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST

बुद्ध महोत्सव... बौद्धांचे प्रेरणास्रोत अनागारिक धम्मपाल रत्नावली व्याख्यान : भंते रेवत महास्थवीर नागपूर : आधुनिक बुद्ध धम्माची सखोल असलेली पाळेमुळे खोदून त्याला पुनरुज्जीवित करण्याचे अत्यंत कठीण असे काम अनागारिक धम्मपाल यांनी केले आहे. भारतातील बुद्धांना पुनरुज्जीवित करण्याच्या त्यांच्या योगदानामुळे समस्त बौद्धांचे ते प्रेरणास्रोत मानले जातात, असे प्रतिपादन सारनाथ वाराणसी येथील ...


बुद्ध महोत्सव...

बौद्धांचे प्रेरणास्रोत अनागारिक धम्मपाल

रत्नावली व्याख्यान : भंते रेवत महास्थवीर
नागपूर :
आधुनिक बुद्ध धम्माची सखोल असलेली पाळेमुळे खोदून त्याला पुनरुज्जीवित करण्याचे अत्यंत कठीण असे काम अनागारिक धम्मपाल यांनी केले आहे. भारतातील बुद्धांना पुनरुज्जीवित करण्याच्या त्यांच्या योगदानामुळे समस्त बौद्धांचे ते प्रेरणास्रोत मानले जातात, असे प्रतिपादन सारनाथ वाराणसी येथील भंते रेवत महास्थवीर यांनी केले.
दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवांतर्गत रत्नावली व्याख्यानमालेत गुरुवारी त्यांनी पुष्प गुंफले. अनागारिक धम्मपाल यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना भंते रेवत महास्थवीर म्हणाले, भारत हा बुद्ध धम्माची जन्मभूमी आहे. परंतु काही अपप्रवृत्तींच्या आक्रमणामुळे बुद्धधम्म या देशातून हद्दपार झाला. नष्ट झाला. अनागारिक धम्मपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत कठीण परिश्रमातून भारत जगात पुन्हा बुद्धाचा देश म्हणून ओळखल्या जाऊ लागला. भारताबद्दल जगभरातील बौद्ध राष्ट्रांमध्ये आदर निर्माण झाला. बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनामुळे विषमतेने ग्रासलेल्या भारतीय जनतेला नवजीवन मिळाले. म्हणून भारतीय समाजव्यवस्था समतेकडे वाटचाल करीत आहे.
अनागारिक धम्मपाल यांचा जन्म श्रीलंकेत एका श्रीमंत बौद्ध कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणी श्रीलंकेत बौद्ध धम्माचे शिक्षण देणाऱ्या संस्था नव्हत्या. त्यामुळे त्यांना ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिक्षण घ्यावे लागले. नंतर युवा अवस्थेमध्ये त्यांच्या मनात बुद्ध धम्माचे जगात अपूर्ण राहिलेले कार्य करण्याची अभिलाषा निर्माण झाली आणि ते भारतात आले. भारतात बुद्ध धम्माची अधोगती पाहून त्यांना अतीव दु:ख झाले. महाबोधी महाविहार मुक्ती आणि भारतातील बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करण्याचे त्यांनी ठरविले. अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या. जीवाची पर्वा न करता त्यांनी आंदोलन केले. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी महाबोधी सोसायटीची स्थापना करून जगातील बौद्ध राष्ट्रांना आवाहन केले. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. १८९३ च्या शिकागो येथील धर्मपरिषद अनागारिक धम्मपाल यांनी गाजवली होती. भारतात त्याबद्दल फारसे सांगितले जात नसले तरी जगभराने ते मान्य केले आहे. शिकागो धर्मपरिषदेमध्ये अनागारिक धम्मपाल हे स्वामी विवेकानंद यांना सोबत घेऊन गेले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संचालन धम्मचारी रत्नदर्शी यांनी केले. धम्मचारी नागमित्र यांनी परिचय करून दिला.