शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘आलम’ वादळ संसदेवर धडकले!

By admin | Updated: March 10, 2015 01:41 IST

जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटीरवादी मसरत आलम याच्या सुटकेमुळे राज्यातील पीडीपी-भाजपा सरकारमध्ये वादंग माजले असतानाच सोमवारी ‘आलम’

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटीरवादी मसरत आलम याच्या सुटकेमुळे राज्यातील पीडीपी-भाजपा सरकारमध्ये वादंग माजले असतानाच सोमवारी ‘आलम’ नावाचे हे वादळ थेट संसदेवर धडकले. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला. काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी केली. आणि तोपर्यत कामकाज चालु दिले जाणार नाही असा इशारा दिला. गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचेही कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.अखेर पंतप्रधानांनी लोकसभेत याप्रकरणी निवेदन दिले.लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आलमच्या सुटकेच्या मुद्यावर प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. नंतर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर असंतोष जाहीर करुन काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि डाव्यांनी सभात्याग केला. या मुद्यावर काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे, दीपेंद्रसिंग हुडा आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. खडगे म्हणाले की, एका देशद्रोही फुटीरवाद्यास कारागृहातून मुक्त करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मसरतच्या सुटकेबाबत राज्य आणि केंद्र सरकारमध्ये काही अंतर्गत चर्चा झाली होती काय? हे देशाला जाणून घ्यायचे आहे. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणाची मागणी करतानाच मसरतच्या सुटकेला भारतीय जनता पक्षाचे गुप्त समर्थन होते असा आरोप केला. अनेक मुद्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अण्णाद्रमुक पक्षाचे के.पी. वेणुगोपाल यांनी सुद्धा मसरतच्या सुटकेची निंदा केली. भाजपाने सरकारमधून बाहेर पडून जम्मू-काश्मिरात नव्याने निवडणुका घ्याव्यात,अशी मागणीही त्यांनी केली.राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील पीडीपी- भाजपा युती सरकारने देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड केली असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित करुन यासाठी आपण स्थगनप्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मिरात नवे सरकार आल्यानंतर आठवडाभरातच फुटीरवादी तत्वांच्या कारवाया वाढल्या असून हे लोक जनसभा घेऊन देशविरोधी बयाणबाजी करीत असल्याचा आरोप केला. बसपा प्रमुख मायावती यांनी राज्य सरकारकडून एकापाठोपाठ एक घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची देशात निंदा होत असल्याकडे लक्ष वेधले. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी करताना मसरत आलाम खोऱ्यातील ११२ मुलांच्या हत्येस जबाबदार असल्याचा आरोप केला. तर संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी भाजपा आणि पीडीपीदरम्यान जम्मू-काश्मीर किमान समान कार्यक्रमाअंतर्गत (सीएमपी) कुठला अजेंडा निश्चित झाला आहे, हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. अण्णाद्रमुकचे नवनीत कृष्णन, माकपाचे पी. राजीव, भाकपाचे डी. राजा, अपक्ष एच.के. दुआ, काँग्रेसचे आनंद शर्मा, प्रमोद तिवारी, शांताराम नाईक, सपाचे जावेद अली खान, बीजदचे भूपेंद्रसिंग, संजदचे के.सी. त्यागी यांनी सुद्धा आलमच्या सुटकेशी संबंधित मुद्यावर सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)