शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
4
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
5
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
6
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
7
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
8
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
9
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
10
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
11
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
12
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
13
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
14
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
15
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
16
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
17
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
18
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
19
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
20
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
Daily Top 2Weekly Top 5

‘आलम’ वादळ संसदेवर धडकले!

By admin | Updated: March 10, 2015 01:41 IST

जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटीरवादी मसरत आलम याच्या सुटकेमुळे राज्यातील पीडीपी-भाजपा सरकारमध्ये वादंग माजले असतानाच सोमवारी ‘आलम’

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटीरवादी मसरत आलम याच्या सुटकेमुळे राज्यातील पीडीपी-भाजपा सरकारमध्ये वादंग माजले असतानाच सोमवारी ‘आलम’ नावाचे हे वादळ थेट संसदेवर धडकले. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला. काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी केली. आणि तोपर्यत कामकाज चालु दिले जाणार नाही असा इशारा दिला. गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचेही कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.अखेर पंतप्रधानांनी लोकसभेत याप्रकरणी निवेदन दिले.लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आलमच्या सुटकेच्या मुद्यावर प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. नंतर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर असंतोष जाहीर करुन काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि डाव्यांनी सभात्याग केला. या मुद्यावर काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे, दीपेंद्रसिंग हुडा आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. खडगे म्हणाले की, एका देशद्रोही फुटीरवाद्यास कारागृहातून मुक्त करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मसरतच्या सुटकेबाबत राज्य आणि केंद्र सरकारमध्ये काही अंतर्गत चर्चा झाली होती काय? हे देशाला जाणून घ्यायचे आहे. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणाची मागणी करतानाच मसरतच्या सुटकेला भारतीय जनता पक्षाचे गुप्त समर्थन होते असा आरोप केला. अनेक मुद्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अण्णाद्रमुक पक्षाचे के.पी. वेणुगोपाल यांनी सुद्धा मसरतच्या सुटकेची निंदा केली. भाजपाने सरकारमधून बाहेर पडून जम्मू-काश्मिरात नव्याने निवडणुका घ्याव्यात,अशी मागणीही त्यांनी केली.राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील पीडीपी- भाजपा युती सरकारने देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड केली असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित करुन यासाठी आपण स्थगनप्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मिरात नवे सरकार आल्यानंतर आठवडाभरातच फुटीरवादी तत्वांच्या कारवाया वाढल्या असून हे लोक जनसभा घेऊन देशविरोधी बयाणबाजी करीत असल्याचा आरोप केला. बसपा प्रमुख मायावती यांनी राज्य सरकारकडून एकापाठोपाठ एक घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची देशात निंदा होत असल्याकडे लक्ष वेधले. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी करताना मसरत आलाम खोऱ्यातील ११२ मुलांच्या हत्येस जबाबदार असल्याचा आरोप केला. तर संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी भाजपा आणि पीडीपीदरम्यान जम्मू-काश्मीर किमान समान कार्यक्रमाअंतर्गत (सीएमपी) कुठला अजेंडा निश्चित झाला आहे, हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. अण्णाद्रमुकचे नवनीत कृष्णन, माकपाचे पी. राजीव, भाकपाचे डी. राजा, अपक्ष एच.के. दुआ, काँग्रेसचे आनंद शर्मा, प्रमोद तिवारी, शांताराम नाईक, सपाचे जावेद अली खान, बीजदचे भूपेंद्रसिंग, संजदचे के.सी. त्यागी यांनी सुद्धा आलमच्या सुटकेशी संबंधित मुद्यावर सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)