शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

‘आलम’ वादळ संसदेवर धडकले!

By admin | Updated: March 10, 2015 01:41 IST

जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटीरवादी मसरत आलम याच्या सुटकेमुळे राज्यातील पीडीपी-भाजपा सरकारमध्ये वादंग माजले असतानाच सोमवारी ‘आलम’

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटीरवादी मसरत आलम याच्या सुटकेमुळे राज्यातील पीडीपी-भाजपा सरकारमध्ये वादंग माजले असतानाच सोमवारी ‘आलम’ नावाचे हे वादळ थेट संसदेवर धडकले. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला. काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी केली. आणि तोपर्यत कामकाज चालु दिले जाणार नाही असा इशारा दिला. गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचेही कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.अखेर पंतप्रधानांनी लोकसभेत याप्रकरणी निवेदन दिले.लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आलमच्या सुटकेच्या मुद्यावर प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. नंतर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर असंतोष जाहीर करुन काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि डाव्यांनी सभात्याग केला. या मुद्यावर काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे, दीपेंद्रसिंग हुडा आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. खडगे म्हणाले की, एका देशद्रोही फुटीरवाद्यास कारागृहातून मुक्त करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मसरतच्या सुटकेबाबत राज्य आणि केंद्र सरकारमध्ये काही अंतर्गत चर्चा झाली होती काय? हे देशाला जाणून घ्यायचे आहे. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणाची मागणी करतानाच मसरतच्या सुटकेला भारतीय जनता पक्षाचे गुप्त समर्थन होते असा आरोप केला. अनेक मुद्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अण्णाद्रमुक पक्षाचे के.पी. वेणुगोपाल यांनी सुद्धा मसरतच्या सुटकेची निंदा केली. भाजपाने सरकारमधून बाहेर पडून जम्मू-काश्मिरात नव्याने निवडणुका घ्याव्यात,अशी मागणीही त्यांनी केली.राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील पीडीपी- भाजपा युती सरकारने देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड केली असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित करुन यासाठी आपण स्थगनप्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मिरात नवे सरकार आल्यानंतर आठवडाभरातच फुटीरवादी तत्वांच्या कारवाया वाढल्या असून हे लोक जनसभा घेऊन देशविरोधी बयाणबाजी करीत असल्याचा आरोप केला. बसपा प्रमुख मायावती यांनी राज्य सरकारकडून एकापाठोपाठ एक घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची देशात निंदा होत असल्याकडे लक्ष वेधले. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी करताना मसरत आलाम खोऱ्यातील ११२ मुलांच्या हत्येस जबाबदार असल्याचा आरोप केला. तर संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी भाजपा आणि पीडीपीदरम्यान जम्मू-काश्मीर किमान समान कार्यक्रमाअंतर्गत (सीएमपी) कुठला अजेंडा निश्चित झाला आहे, हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. अण्णाद्रमुकचे नवनीत कृष्णन, माकपाचे पी. राजीव, भाकपाचे डी. राजा, अपक्ष एच.के. दुआ, काँग्रेसचे आनंद शर्मा, प्रमोद तिवारी, शांताराम नाईक, सपाचे जावेद अली खान, बीजदचे भूपेंद्रसिंग, संजदचे के.सी. त्यागी यांनी सुद्धा आलमच्या सुटकेशी संबंधित मुद्यावर सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)