शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

‘आप’मधील यादवी तीव्र!

By admin | Updated: March 12, 2015 01:58 IST

आम आदमी पार्टीत (आप)आलेल्या भूकंपाचे हादरे अजूनही थांबले नसून पक्षावरील राजकीय संकट अधिक वाढले आहे.मुंबईत पक्षाचा चे

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीत (आप)आलेल्या भूकंपाचे हादरे अजूनही थांबले नसून पक्षावरील राजकीय संकट अधिक वाढले आहे.मुंबईत पक्षाचा चेहरा राहिलेल्या अंजली दमानिया यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गेल्या वर्षी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचे सहा आमदार खरेदीचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत बुधवारी आपला सोडचिठ्ठी दिल्याने या पक्षाला मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे एका आमदाराने शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांच्यासह योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी हस्ताक्षर मोहीम सुरू केली आहे.आपण अरविंद केजरीवाल यांना सिद्धांतांसाठी पाठिंबा दिला होता घोडेबाजारासाठी नाही, अशी तोफ दमानिया यांनी पक्ष सोडताना डागली आहे. केजरीवाल यांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची गोष्ट केली होती, असा आरोप या पक्षाचे रोहिणी येथील माजी आमदार राजेश गर्ग यांनी केला आहे. आपल्या या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी केजरीवाल यांनी यासंदर्भात केलेल्या संभाषणाची आॅडिओ क्लिपही जारी केली आहे. दमानिया यांनी याच क्लिपचा हवाला देऊन राजीनामा दिला.राजेश गर्ग यांच्या म्हणण्यानुसार विद्यमान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया काँग्रेस आमदारांच्या संपर्कात होते आणि त्यांना एक नवा राजकीय पक्ष स्थापन करून आपला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी चिथावत होते. कारण केजरीवाल यांना पुन्हा विधानसभा निवडणुका नको होत्या. त्यांनी पुराव्यादाखल जारी केलेल्या आॅडिओ क्लिपमध्ये केजरीवाल हे ‘आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहोत. परंतु काँग्रेस आम्हाला पाठिंबा देण्यास तयार नाही. मनीष सिसोदिया काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये फूट पाडा. सहा आमदारांना नवा पक्ष स्थापन करून आपल्याला पाठिंबा देण्यास सांगा’असे स्पष्ट सांगत आहेत. पक्षांतरविरोधी कायद्यापासून बचावाकरिता पक्षातून बाहेर पडणाऱ्या गटात किमान सहा आमदार असणे आवश्यक होते.