शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

‘आधार’ होणार सक्तीचे; संसदेत कायदा मंजूर

By admin | Updated: March 17, 2016 03:40 IST

शासकीय योजनांचे लाभ आणि अनुदान ‘आधार’ क्रमांकाच्या आधारे लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्याच्या योजनेस वैधानिक अधिष्ठान देणारे विधेयक संसदेने

नवी दिल्ली : शासकीय योजनांचे लाभ आणि अनुदान ‘आधार’ क्रमांकाच्या आधारे लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्याच्या योजनेस वैधानिक अधिष्ठान देणारे विधेयक संसदेने बुधवारी मंजूर केले. विधेयक मंजुरीच्या आधी राज्यसभेत व नंतर लोकसभेत झालेल्या प्रक्रियेचा परिणाम असा की यापुढे ‘आधार’ सक्तीचे होणार असून त्याशिवाय सरकारी योजनांचे लाभ व अनुदान मिळणार नाही.आधीच्या संपुआ सरकारने ‘आधार’ची योजना सुरु केली; पण ती केवळ प्रशासकीय निर्देशांवर सुरु होती. मोदी सरकारने त्यास वैधानिक पाठबळ देण्यासाठी ‘आधार (टार्गेटेड डिलिव्हरी आॅफ फायनान्शियल सबसिडिज, बेनेफिटस् अ‍ॅण्ड सर्व्हिसेस) बिल हे विधेयक आणले. राज्यसभेत सत्ताधाऱ्यांचे बहुमत नसल्याने तेथे ते अडकून पडू नये यासाठी हे विधेयक ‘मनी बिल’ म्हणून मांडण्यात आले. राज्यघटनेनुसार राज्यसभा ‘मनी बिल’ फेटाळू शकत नाही, फार तर दुरुस्त्या सुचवून लोकसभेकडे परत पाठवू शकते.लोकसभेने ११ मार्च रोजी मंजूर केलेले हे विधेयक बुधवारी राज्यसभेत आले. काँग्रेसचे सदस्य जयराम जयेश यांनी या विधेयकात पाच दुरुस्त्या सुचविल्या. त्या दुरुस्त्यांसह विधेयक लोकसभेकडे परत पाठविले गेले. लोकसभेने लगेच ते विषयपटलावर घेतले व राज्यसभेने सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या अमान्य करून मूळ विधेयक मंजूर केले.राज्यसभेने सुचविलेल्या पाच दुरुस्त्यांपैकी एक दुरुस्ती ‘आधार’ सक्तीचे न करता ऐच्छिक करण्यासंबंधीची होती. परंतु लोकसभेने ही दुरुस्ती अमान्य केली. परिणामी, या विधेयकानुसार जो कायदा लागू होईल त्यानुसार सरकारी योजनांचे लाभ व अनुदान मिळण्यासाठी ‘आधार’ सक्तीचे होईल.नेमक्या याच मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या गेल्या होत्या व त्यात न्यायालयाने ‘आधार’ची सक्ती न करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. राज्यसभेतील चर्चेत हा विषय उपस्थित झाला. परंतु एखादा विषय न्यायालयात प्रलंबित आहे म्हणून संसद कायदा करण्याचे आपले कर्तव्य टाळू शकत नाही, असे म्हणून अर्थमंत्री व सभागृह नेते अरुण जेटली यांनी त्यास उत्तर दिले.हे विधेयक ‘मनी बिल’ म्हणून मांडले जाणे हाही राज्यसभेत विरोधकांच्या टीकेचा मुख्य मुद्दा होता. परंतु एखादे विधेयक ‘मनी बिल’ आहे की नाही याविषयी लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम मानण्याची राज्यघटनेत तरतूद आहे. त्यानुसार अध्यक्षांनी हे ‘मनी बिल’ ठरविले आहे. त्यामुळे आपण फक्त दुरुस्त्या सुचवून ते लोकसभेकडे परत पाठवू शकतो, असे राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी यांनी स्पष्ट केले.संपुआ सरकारच्या योजनेहून या विधेयकातील तरतुदी नागरिकांच्या खासगी बाबींमध्ये अधिक प्रमाणात हस्तक्षेप करणाऱ्या आहेत, हाही राज्यसभेत विरोधकांचा टीकेचा आणखी एक मुद्दा होता. परंतु राज्यसभेस विधेयक नामंजूर करण्याचा अधिकारच नसल्याने हा विषयही केवळ चर्चेपुरताच राहिला.(लोकमत न्यूज नेटवर्क)