शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

८७९ जवानांना ‘हिम समाधी’

By admin | Updated: February 7, 2016 01:42 IST

जम्मू-काश्मीरच्या सियाचीनमध्ये हिमकडे कोसळून एक लष्करी चौकीच बर्फाखाली गेल्याने भारताने पुन्हा आपले १० जांबाज जवान गमावले आहेत. या ७४ किलोमीटर बर्फाच्छादित क्षेत्रावर

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या सियाचीनमध्ये हिमकडे कोसळून एक लष्करी चौकीच बर्फाखाली गेल्याने भारताने पुन्हा आपले १० जांबाज जवान गमावले आहेत. या ७४ किलोमीटर बर्फाच्छादित क्षेत्रावर आपला ताबा कायम ठेवण्याच्या कवायतीत गेल्या तीन दशकांत ८७९ जवान मृत्युमुखी पडले आहेत.सियाचीन ही जगातील सर्वाधिक धोकादायक युद्धभूमी आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान गेल्या तीन दशकांपासून या क्षेत्राचा वाद सुरू असून, या ग्लेशिअरवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी भारतातर्फे येथे १० हजारांवर जवान तैनात करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सियाचीनमधील लष्कराच्या तैनातीवर दररोज सुमारे सात कोटी रुपये खर्च केला जातो. शिवाय या बर्फाच्छादित क्षेत्रासाठी भारतीय सेनेलाही जवानांच्या रूपात फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. (वृत्तसंस्था)सियाचीनवर होणारा खर्चभारतातर्फे आपल्या जवानांच्या सोयीसुविधांसाठी प्रतिदिन येथे सुमारे ६.८ कोटी रुपये खर्च केले जातात. म्हणजेच दर सेकंदाला १८,००० रुपये खर्च होतात.एवढ्या रकमेत वर्षभरात ४,००० माध्यमिक शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. अथवा ३० वर्षांत १,७२,००० शाळा उभारता आल्या असत्या. देशात एक चपाती (पोळी) पाच ते दहा रुपयांना मिळते; परंतु सियाचीनला पोहोचेपर्यंत तिची किंमत २०० रुपयांपर्यंत जाते. १९४९ च्या कराची आणि १९७२ च्या सिमला करारात दोन्ही देश या क्षेत्रात जवान तैनात ठेवणार नाहीत असे ठरले होते. भारत-पाकिस्तानदरम्यान नियंत्रण रेषेच्या उत्तर ध्रुवावर सियाचीन आहे.एप्रिल १९८४ मध्ये पाकिस्तानद्वारे घुसखोरी आणि कब्जा मिळविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याकरिता भारतीय लष्कराने सियाचीन ग्लेशियवर चढाई केली होती. पाकिस्तानने या उंच शिखरावर वास्तव्यायोग्य विशेष जॅकेटस् खरेदीचा करार केल्याचे समजल्यावर भारत सतर्क झाला होता. जवानांना येणाऱ्या अडचणी१९८४ पासून आतापर्यंत भारतीय लष्कराच्या ३३ अधिकाऱ्यांसह ८७९ जवानांनी येथे आपले प्राण गमावले आहेत.यापैकी बहुतांश जवानांचा मृत्यू युद्धात नव्हे तर हिमस्खलनात झाला आहे. येथे आॅक्सिजनचा स्तर फार कमी असल्याने त्यामुळे होणाऱ्या आजारांनी जवान पीडित आहेत. १८,००० फूट उंचीनंतर मानवी शरीर टिकून राहणे फार अवघड आहे. येथे टूथपेस्टसुद्धा गोठून जाते. व्यवस्थित बोलताही येत नाही. जवान विशिष्ट प्रकारच्या ‘इग्लू’कपड्यांमध्ये राहतात.इ.स. २००९ साली झालेल्या एका अध्ययनानुसार सियाचीन ग्लेशियर हळूहळू वितळत असून, निम्म्यावर आला आहे. हवामानाची स्थितीहिवाळ्यामध्ये सियाचीनचे तापमान उणे ५० अंश सेल्सिअसपेक्षाही खाली घसरते. अशा परिस्थितीत जवानांना येथे आपले पाय रोवणे किती कठीण होत असेल याचा अंदाज येऊ शकतो. थंडीच्या मोसमात येथे सरासरी १००० सें.मी. बर्फवृष्टी होते. सियाचीनमधील बर्फ वितळून निर्माण होणारे पाणीच लडाखच्या नुब्रा नदीचे मुख्य स्रोत आहे.