शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

सव्वा लाख शेतकर्‍यांना खरीप अनुदानाची प्रतीक्षा ३० कोटींचे अनुदान वाटप बाकी : भडगाव, जामनेर, जळगावातील शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 23:03 IST

जळगाव : अत्यल्प पाऊस आणि दुष्काळीस्थिती यामुळे हताश झालेल्या बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने जिल्‘ासाठी १७६ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकर्‍यांना दुसरा खरीप हंगाम सुरु झाला तरीदेखील मदत न मिळाल्याने प्रतिक्षा आहे. भडगाव, जामनेर व जळगाव तालुक्यात अनुदान वाटपाची संथगती आहे.

जळगाव : अत्यल्प पाऊस आणि दुष्काळीस्थिती यामुळे हताश झालेल्या बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने जिल्‘ासाठी १७६ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकर्‍यांना दुसरा खरीप हंगाम सुरु झाला तरीदेखील मदत न मिळाल्याने प्रतिक्षा आहे. भडगाव, जामनेर व जळगाव तालुक्यात अनुदान वाटपाची संथगती आहे.
जिल्‘ातील १२९२ गावातील शेतकर्‍यांना लाभ
खरीप अनुदानाचे जिल्‘ातील १२९२ गावातील शेतकर्‍यांना लाभ देण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्‘ातील ९२, जामनेर १५२, एरंडोल ६५, धरणगाव ८९, पारोळा ११४, भुसावळ ५४, बोदवड ५२, मुक्ताईनगर ८१, यावल १०, रावेर १९, पाचोरा १२७, भडगाव ६०, अमळनेर १५४, चोपडा ८७, चाळीसगाव १३६ गावातील शेतकर्‍यांना लाभ देण्यात आला आहे.
एक लाख १९ हजार शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतीक्षा
खरीप अनुदानासाठी जिल्‘ातील तीन लाख ९९ हजार २४६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी दोन लाख ७९ हजार ६५५ शेतकर्‍यांना खरीप अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यात भडगाव तालुक्यातील ३१ हजार ७५६ बाधित शेतकर्‍यांपैकी केवळ ८ हजार ८४१ शेतकर्‍यांना तर जामनेर तालुक्यातील ५६ हजार २४२ पैकी २८ हजार ८२८ शेतकर्‍यांना मदत मिळाली आहे. जळगाव तालुक्यातील ३२ हजार ३०५ शेतकर्‍यांपैकी १८ हजार ७८१ शेतकर्‍यांना मदत मिळाली आहे.
१७६ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण
शासनाकडून जिल्हा प्रशासनाला खरीप अनुदानाचे १७६ कोटी २८ लाख ५४ हजार ७७७ हजार रुपये प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनाने सर्व रक्कम तहसीलदारांकडे वितरित केली. मात्र आतापर्यंत या अनुदानापैकी केवळ १४६ कोटी २८ लाख ५४ हजार ७७७ रुपयांचे अनुदान हे शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. १८ टक्के शेतकर्‍यांना अजूनही खरीप अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.

शासकीय काम सहा महिने थांब
गेल्यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची रक्कम ही शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. यावर्षी दुसरा खरीप हंगाम सुरु झाला असताना तब्बल एक लाख १९ हजार ५९१ शेतकरी मदतीसाठी अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे शासकीय काम सहा महिने थांब असा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. त्रस्त झालेला शेतकरी हा तहसील कार्यालयात फेर्‍या मारत आहे.