शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

सव्वा लाख शेतकर्‍यांना खरीप अनुदानाची प्रतीक्षा ३० कोटींचे अनुदान वाटप बाकी : भडगाव, जामनेर, जळगावातील शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 23:03 IST

जळगाव : अत्यल्प पाऊस आणि दुष्काळीस्थिती यामुळे हताश झालेल्या बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने जिल्‘ासाठी १७६ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकर्‍यांना दुसरा खरीप हंगाम सुरु झाला तरीदेखील मदत न मिळाल्याने प्रतिक्षा आहे. भडगाव, जामनेर व जळगाव तालुक्यात अनुदान वाटपाची संथगती आहे.

जळगाव : अत्यल्प पाऊस आणि दुष्काळीस्थिती यामुळे हताश झालेल्या बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने जिल्‘ासाठी १७६ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकर्‍यांना दुसरा खरीप हंगाम सुरु झाला तरीदेखील मदत न मिळाल्याने प्रतिक्षा आहे. भडगाव, जामनेर व जळगाव तालुक्यात अनुदान वाटपाची संथगती आहे.
जिल्‘ातील १२९२ गावातील शेतकर्‍यांना लाभ
खरीप अनुदानाचे जिल्‘ातील १२९२ गावातील शेतकर्‍यांना लाभ देण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्‘ातील ९२, जामनेर १५२, एरंडोल ६५, धरणगाव ८९, पारोळा ११४, भुसावळ ५४, बोदवड ५२, मुक्ताईनगर ८१, यावल १०, रावेर १९, पाचोरा १२७, भडगाव ६०, अमळनेर १५४, चोपडा ८७, चाळीसगाव १३६ गावातील शेतकर्‍यांना लाभ देण्यात आला आहे.
एक लाख १९ हजार शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतीक्षा
खरीप अनुदानासाठी जिल्‘ातील तीन लाख ९९ हजार २४६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी दोन लाख ७९ हजार ६५५ शेतकर्‍यांना खरीप अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यात भडगाव तालुक्यातील ३१ हजार ७५६ बाधित शेतकर्‍यांपैकी केवळ ८ हजार ८४१ शेतकर्‍यांना तर जामनेर तालुक्यातील ५६ हजार २४२ पैकी २८ हजार ८२८ शेतकर्‍यांना मदत मिळाली आहे. जळगाव तालुक्यातील ३२ हजार ३०५ शेतकर्‍यांपैकी १८ हजार ७८१ शेतकर्‍यांना मदत मिळाली आहे.
१७६ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण
शासनाकडून जिल्हा प्रशासनाला खरीप अनुदानाचे १७६ कोटी २८ लाख ५४ हजार ७७७ हजार रुपये प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनाने सर्व रक्कम तहसीलदारांकडे वितरित केली. मात्र आतापर्यंत या अनुदानापैकी केवळ १४६ कोटी २८ लाख ५४ हजार ७७७ रुपयांचे अनुदान हे शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. १८ टक्के शेतकर्‍यांना अजूनही खरीप अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.

शासकीय काम सहा महिने थांब
गेल्यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची रक्कम ही शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. यावर्षी दुसरा खरीप हंगाम सुरु झाला असताना तब्बल एक लाख १९ हजार ५९१ शेतकरी मदतीसाठी अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे शासकीय काम सहा महिने थांब असा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. त्रस्त झालेला शेतकरी हा तहसील कार्यालयात फेर्‍या मारत आहे.