शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

२६ मालमत्तांचा लिलाव केव्हा? बीएचआर पतसंस्था : संचालकांच्या जळगाव, तळेगाव व शेळगावील मालमत्तांचा अहवाल पोलिसांकडे पडून

By admin | Updated: May 20, 2016 00:41 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी माजी संचालकांच्या ११८ एकर जमिनीचे तसेच काही प्लॉटच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. जिल्हा शासनाने या मालमत्तांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठविल्या अहवालावर काहीच निर्णय न झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा अहवाल धूळखात पडून आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी माजी संचालकांच्या ११८ एकर जमिनीचे तसेच काही प्लॉटच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. जिल्हा शासनाने या मालमत्तांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठविल्या अहवालावर काहीच निर्णय न झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा अहवाल धूळखात पडून आहे.
बीएचआर पतसंस्थेला सेंट्रल रजिस्ट्रार, कृषी व सहकार विभागाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी अवसायनात काढली होती. या संस्थेतील संचालक मंडळाने असुरक्षित कर्जाचे वाटप केले होते. त्या कर्जाच्या वसुलीची अडचण निर्माण झाली आहे. अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सन २००८ ते २०१३ व अवसायकांनी पदभार घेईपर्यंतच्या संचालक मंडळाची यादी काढली. असुरक्षित कर्जाची वसुली होण्यासाठी व ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी या संचालकांच्या मालमत्तांचा शोध घेत अवसायकांनी इंटनेटद्वारे माजी संचालकांच्या २६ मालमत्तांचा शोध घेतला. या मालमत्तांचा एकत्रित अहवाल तयार करीत एमपीआयडी ॲक्ट नुसार कारवाई करण्यात यावी यासाठी दोन महिन्यांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल पाठविला आहे.
प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे जाणार
अवसायकांनी पाठविलेल्या ४७ हेक्टर २४ आर जमिनीचा तसेच काही प्लॉटचा एकत्रित अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर या मालमत्तांची आर्थिक गुन्हा शाखेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी शासनाकडे अहवाल पाठविणार आहे.

उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी नियुक्ती
महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ४ नुसार जर शासनाला खात्री पटली असेल की, कुठल्याही वित्तीय संस्था ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे किंवा ठेवीवर अधिक व्याज देण्याचे आश्वासन आणि इतरही लाभ देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची शक्यता नाही. अशा वित्तीय संस्थांच्या रकमा अथवा मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार शासनाला आहे. त्यानुसार शासन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करीत असतात. नियुक्त अधिकारी यांना ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी संस्थेच्या व संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्या विक्री करण्याचे अधिकार असतात.