शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

२६ मालमत्तांचा लिलाव केव्हा? बीएचआर पतसंस्था : संचालकांच्या जळगाव, तळेगाव व शेळगावील मालमत्तांचा अहवाल पोलिसांकडे पडून

By admin | Updated: May 20, 2016 00:41 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी माजी संचालकांच्या ११८ एकर जमिनीचे तसेच काही प्लॉटच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. जिल्हा शासनाने या मालमत्तांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठविल्या अहवालावर काहीच निर्णय न झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा अहवाल धूळखात पडून आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी माजी संचालकांच्या ११८ एकर जमिनीचे तसेच काही प्लॉटच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. जिल्हा शासनाने या मालमत्तांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठविल्या अहवालावर काहीच निर्णय न झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा अहवाल धूळखात पडून आहे.
बीएचआर पतसंस्थेला सेंट्रल रजिस्ट्रार, कृषी व सहकार विभागाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी अवसायनात काढली होती. या संस्थेतील संचालक मंडळाने असुरक्षित कर्जाचे वाटप केले होते. त्या कर्जाच्या वसुलीची अडचण निर्माण झाली आहे. अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सन २००८ ते २०१३ व अवसायकांनी पदभार घेईपर्यंतच्या संचालक मंडळाची यादी काढली. असुरक्षित कर्जाची वसुली होण्यासाठी व ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी या संचालकांच्या मालमत्तांचा शोध घेत अवसायकांनी इंटनेटद्वारे माजी संचालकांच्या २६ मालमत्तांचा शोध घेतला. या मालमत्तांचा एकत्रित अहवाल तयार करीत एमपीआयडी ॲक्ट नुसार कारवाई करण्यात यावी यासाठी दोन महिन्यांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल पाठविला आहे.
प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे जाणार
अवसायकांनी पाठविलेल्या ४७ हेक्टर २४ आर जमिनीचा तसेच काही प्लॉटचा एकत्रित अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर या मालमत्तांची आर्थिक गुन्हा शाखेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी शासनाकडे अहवाल पाठविणार आहे.

उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी नियुक्ती
महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ४ नुसार जर शासनाला खात्री पटली असेल की, कुठल्याही वित्तीय संस्था ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे किंवा ठेवीवर अधिक व्याज देण्याचे आश्वासन आणि इतरही लाभ देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची शक्यता नाही. अशा वित्तीय संस्थांच्या रकमा अथवा मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार शासनाला आहे. त्यानुसार शासन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करीत असतात. नियुक्त अधिकारी यांना ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी संस्थेच्या व संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्या विक्री करण्याचे अधिकार असतात.