शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

विमानाने आलेल्यांपैकी २२७ जणांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:17 IST

वंदे भारत मोहीम; केंद्राने मुंबई उच्च न्यायालयाला दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना साथीमुळे विदेशात अडकलेल्या व वंदे भारत मोहिमेद्वारे विशेष विमानांतून मायदेशात परतलेल्या ५८,८६७ भारतीय नागरिकांपैकी फक्त २२७ जणांना म्हणजे ०.३८ टक्के लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, अशी माहिती केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

विदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानाने परत आणताना एअर इंडियाने फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत, असा आरोप या कंपनीचे वैमानिक देवेन कनानी यांनी एका याचिकेत केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. काठावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

नागरी हवाई वाहतूक संचालनालयातर्फे मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, वंदे भारत मोहिमेद्वारे भारतात परतलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. विमानातून प्रवास करताना हा संसर्ग झाला होता का याबद्दल ठोस पुरावे मिळालेले नाहीत. या मोहिमेद्वारे विशेष विमानातून भारतात येण्याआधी संसर्ग नसलेल्या व देशात परतल्यानंतर या विषाणूची बाधा झालेल्या प्रवाशांची राज्यवार माहिती सादर करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नागरी हवाई वाहतूक संचालनालय व एअर इंडिया यांना मंगळवारी दिला होता.

रुग्णांची संख्या मोठी असण्याची शक्यतावंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत विदेशातून महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा येथे परतलेल्या १८,८९६ भारतीय नागरिकांपैकी किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद वैमानिक देवेन कनानी यांच्या वतीने अ‍ॅड. अभिलाष पण्णीकर यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या