शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

विमानाने आलेल्यांपैकी २२७ जणांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:17 IST

वंदे भारत मोहीम; केंद्राने मुंबई उच्च न्यायालयाला दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना साथीमुळे विदेशात अडकलेल्या व वंदे भारत मोहिमेद्वारे विशेष विमानांतून मायदेशात परतलेल्या ५८,८६७ भारतीय नागरिकांपैकी फक्त २२७ जणांना म्हणजे ०.३८ टक्के लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, अशी माहिती केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

विदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानाने परत आणताना एअर इंडियाने फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत, असा आरोप या कंपनीचे वैमानिक देवेन कनानी यांनी एका याचिकेत केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. काठावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

नागरी हवाई वाहतूक संचालनालयातर्फे मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, वंदे भारत मोहिमेद्वारे भारतात परतलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. विमानातून प्रवास करताना हा संसर्ग झाला होता का याबद्दल ठोस पुरावे मिळालेले नाहीत. या मोहिमेद्वारे विशेष विमानातून भारतात येण्याआधी संसर्ग नसलेल्या व देशात परतल्यानंतर या विषाणूची बाधा झालेल्या प्रवाशांची राज्यवार माहिती सादर करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नागरी हवाई वाहतूक संचालनालय व एअर इंडिया यांना मंगळवारी दिला होता.

रुग्णांची संख्या मोठी असण्याची शक्यतावंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत विदेशातून महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा येथे परतलेल्या १८,८९६ भारतीय नागरिकांपैकी किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद वैमानिक देवेन कनानी यांच्या वतीने अ‍ॅड. अभिलाष पण्णीकर यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या