शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

जिल्‘ाातील ७६२ पैकी १७८ पतसंस्था अडचणीत कर्जवसुलीचे आव्हान : दोन लाख २८ हजार ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी पायपीट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2015 00:08 IST

जळगाव : सहकार कायद्याचे उल्लंघन, बेकायदेशीर कर्जवाटप, क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप या कारणांमुळे जळगाव जिल्‘ातील सहकार क्षेत्र हे कोलमडले आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ७६२ सहकारी संस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत असल्याने ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी फरफट सुरूच आहे.

जळगाव : सहकार कायद्याचे उल्लंघन, बेकायदेशीर कर्जवाटप, क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप या कारणांमुळे जळगाव जिल्‘ातील सहकार क्षेत्र हे कोलमडले आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ७६२ सहकारी संस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत असल्याने ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी फरफट सुरूच आहे.
९ तालुक्यातील १७८ पतसंस्था
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जिल्हाभरातील ७६२ पतसंस्था आहेत. त्यात ६० जिल्हास्तरीय तर ६९४ तालुकास्तरीय पतसंस्था कार्यरत आहेत. यासह सहा राज्यस्तरीय व दोन विभागस्तरीय पतसंस्था आहेत. पतसंस्थामधील गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार, तसेच कामकाजातील अनियमितता या कारणांमुळे जुलै २००७ पासून राज्यभरात पतसंस्थांची आर्थिकस्थिती कोलमडली. राज्यभरातील ४६९ पतसंस्थापैकी जळगाव जिल्‘ातील ४२ पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. या पतसंस्थांमधील ठेवीच्या रकमा परत मिळत नसल्याने त्याचा परिणाम हा अन्य सहकारी पतसंस्थांवर पडला. त्यामुळे नव्याने अडचणीत आलेल्या १३६ पतसंस्थांसह एकूण अडचणीतील पतसंस्थांचा आकडा १७८ पर्यंत येऊन पोहचला.
जिल्हाभरात ६ लाख ठेवीदार
सहकार विभागाकडील नोंदीनुसार जिल्‘ातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमध्ये सहा लाख १४ हजार ७ ठेवीदारांच्या ११२५.९७ कोटी रुपये रकमेच्या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन लाख ८५ हजार २७८ ठेवीदारांना ५९८.७६ कोटी रकमेच्या ठेवी रोखीने तसेच मॅचिंग स्वरुपातील व्यवहाराने परत करण्यात आल्या आहेत.
तालुकास्तरीय समितीमार्फत वाटप
अडचणीतील पतसंस्थांमधील ठेवीदारांना ठेवीचे पारदर्शकपणे व प्राधान्याने वाटप करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी २८ ऑक्टोबर २०१० रोजी जिल्हास्तरीय कृती समितीला साहाय्यभूत अशा तालुकास्तरीय कृती समित्यांची जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, पारोळा, अमळनेर या सात तालुक्यांमध्ये निर्मिती केली. सन २०१३ पासून तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून सात हजार ६९१ ठेवीदारांना ३४.२० कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून वाटप करण्यात आली आहे.
जिल्हाभरात ९३ हजार कर्जदार
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे अडचणीतील पतसंस्थांमधील कर्जदारांची यादी मागविण्यात आली. त्यात या पतसंस्थांमधील ९२ हजार ९११ कर्जदारांकडे तब्बल १०६९.३५ कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे. त्यापैकी ४६ हजार ८७८ कर्जदारांकडील रक्कम ६०५.४० कोटी रकमेचे कर्ज वसूल करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीला ४४ हजार ५७१ कर्जदारांकडे ५३१.७३ कोटी रुपयांचे कर्ज वसुली बाकी आहे.