शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

जिल्‘ाातील ७६२ पैकी १७८ पतसंस्था अडचणीत कर्जवसुलीचे आव्हान : दोन लाख २८ हजार ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी पायपीट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2015 00:08 IST

जळगाव : सहकार कायद्याचे उल्लंघन, बेकायदेशीर कर्जवाटप, क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप या कारणांमुळे जळगाव जिल्‘ातील सहकार क्षेत्र हे कोलमडले आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ७६२ सहकारी संस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत असल्याने ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी फरफट सुरूच आहे.

जळगाव : सहकार कायद्याचे उल्लंघन, बेकायदेशीर कर्जवाटप, क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप या कारणांमुळे जळगाव जिल्‘ातील सहकार क्षेत्र हे कोलमडले आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ७६२ सहकारी संस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत असल्याने ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी फरफट सुरूच आहे.
९ तालुक्यातील १७८ पतसंस्था
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जिल्हाभरातील ७६२ पतसंस्था आहेत. त्यात ६० जिल्हास्तरीय तर ६९४ तालुकास्तरीय पतसंस्था कार्यरत आहेत. यासह सहा राज्यस्तरीय व दोन विभागस्तरीय पतसंस्था आहेत. पतसंस्थामधील गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार, तसेच कामकाजातील अनियमितता या कारणांमुळे जुलै २००७ पासून राज्यभरात पतसंस्थांची आर्थिकस्थिती कोलमडली. राज्यभरातील ४६९ पतसंस्थापैकी जळगाव जिल्‘ातील ४२ पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. या पतसंस्थांमधील ठेवीच्या रकमा परत मिळत नसल्याने त्याचा परिणाम हा अन्य सहकारी पतसंस्थांवर पडला. त्यामुळे नव्याने अडचणीत आलेल्या १३६ पतसंस्थांसह एकूण अडचणीतील पतसंस्थांचा आकडा १७८ पर्यंत येऊन पोहचला.
जिल्हाभरात ६ लाख ठेवीदार
सहकार विभागाकडील नोंदीनुसार जिल्‘ातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमध्ये सहा लाख १४ हजार ७ ठेवीदारांच्या ११२५.९७ कोटी रुपये रकमेच्या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन लाख ८५ हजार २७८ ठेवीदारांना ५९८.७६ कोटी रकमेच्या ठेवी रोखीने तसेच मॅचिंग स्वरुपातील व्यवहाराने परत करण्यात आल्या आहेत.
तालुकास्तरीय समितीमार्फत वाटप
अडचणीतील पतसंस्थांमधील ठेवीदारांना ठेवीचे पारदर्शकपणे व प्राधान्याने वाटप करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी २८ ऑक्टोबर २०१० रोजी जिल्हास्तरीय कृती समितीला साहाय्यभूत अशा तालुकास्तरीय कृती समित्यांची जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, पारोळा, अमळनेर या सात तालुक्यांमध्ये निर्मिती केली. सन २०१३ पासून तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून सात हजार ६९१ ठेवीदारांना ३४.२० कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून वाटप करण्यात आली आहे.
जिल्हाभरात ९३ हजार कर्जदार
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे अडचणीतील पतसंस्थांमधील कर्जदारांची यादी मागविण्यात आली. त्यात या पतसंस्थांमधील ९२ हजार ९११ कर्जदारांकडे तब्बल १०६९.३५ कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे. त्यापैकी ४६ हजार ८७८ कर्जदारांकडील रक्कम ६०५.४० कोटी रकमेचे कर्ज वसूल करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीला ४४ हजार ५७१ कर्जदारांकडे ५३१.७३ कोटी रुपयांचे कर्ज वसुली बाकी आहे.