शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव वनपरिक्षेत्रातील वन्यजीव पाण्याअभावी कासावीस

By admin | Updated: March 30, 2017 00:59 IST

मालेगाव, सटाणा, ताहाराबाद परिसरातील ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनपरिक्षेत्रातील ३४८ वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे

अतुल शेवाळे : मालेगावमालेगाव, सटाणा, ताहाराबाद परिसरातील ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनपरिक्षेत्रातील ३४८ वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सध्या कसमादे परिसरातील तपमानाने चाळिशी गाठली आहे. असे असताना वनविभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदा जंगलांमध्ये पाणवठे व वनतळे निर्मितीचे काम हाती घेण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी अन्न व पाण्याच्या शोधार्थ वन्यजिवांनी मानवी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कसमादे परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेती, शिवारे बहरली होती; मात्र सध्या वैशाख वणव्याची धग बसू लागली आहे. तपमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसताना जंगलातील प्राण्यांना पाणी कोठून उपलब्ध होणार? मालेगाव उपविभागीय वन कार्यालयाच्या कक्षेत मालेगाव, सटाणा व ताहाराबाद परिसरातील जंगलक्षेत्राचा समावेश आहे. या ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनक्षेत्रात यंदा एकही वनतळे वा पाणवठे निर्माण करण्यात आले नाहीत. पाणवठे व वनतळे निर्मितीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचा दावा येथील वनविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे. शासनाचा लालफितीचा कारभार व प्रस्ताव मंजुरीसाठी लागणारा वेळ यात वन्यजिवांचे काय होणार, असा सवाल प्राणिमित्रांनी व्यक्त केला आहे. सन २०१४-१५ मध्ये १६२ वनतळी बनविण्यात आली होती, तर चिंचवे, निंबायती, टेंभे, जाखोड, मानूर, मोरदरा, वाडीचौलेर, पिंपळदरे, सकर आदि ठिकाणी १३ पाणवठे निर्माण करण्यात आले होते. उन्हाची तीव्रता भयानक आहे. कसमादे परिसरात उष्णतेची लाट पसरली आहे. जंगल परिक्षेत्रात पाणी उपलब्ध नसल्याने प्राण्यांनी अन्न व पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्त्यांकडे धाव घेतली आहे.