शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मालेगाव वनपरिक्षेत्रातील वन्यजीव पाण्याअभावी कासावीस

By admin | Updated: March 30, 2017 00:59 IST

मालेगाव, सटाणा, ताहाराबाद परिसरातील ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनपरिक्षेत्रातील ३४८ वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे

अतुल शेवाळे : मालेगावमालेगाव, सटाणा, ताहाराबाद परिसरातील ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनपरिक्षेत्रातील ३४८ वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सध्या कसमादे परिसरातील तपमानाने चाळिशी गाठली आहे. असे असताना वनविभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदा जंगलांमध्ये पाणवठे व वनतळे निर्मितीचे काम हाती घेण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी अन्न व पाण्याच्या शोधार्थ वन्यजिवांनी मानवी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कसमादे परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेती, शिवारे बहरली होती; मात्र सध्या वैशाख वणव्याची धग बसू लागली आहे. तपमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसताना जंगलातील प्राण्यांना पाणी कोठून उपलब्ध होणार? मालेगाव उपविभागीय वन कार्यालयाच्या कक्षेत मालेगाव, सटाणा व ताहाराबाद परिसरातील जंगलक्षेत्राचा समावेश आहे. या ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनक्षेत्रात यंदा एकही वनतळे वा पाणवठे निर्माण करण्यात आले नाहीत. पाणवठे व वनतळे निर्मितीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचा दावा येथील वनविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे. शासनाचा लालफितीचा कारभार व प्रस्ताव मंजुरीसाठी लागणारा वेळ यात वन्यजिवांचे काय होणार, असा सवाल प्राणिमित्रांनी व्यक्त केला आहे. सन २०१४-१५ मध्ये १६२ वनतळी बनविण्यात आली होती, तर चिंचवे, निंबायती, टेंभे, जाखोड, मानूर, मोरदरा, वाडीचौलेर, पिंपळदरे, सकर आदि ठिकाणी १३ पाणवठे निर्माण करण्यात आले होते. उन्हाची तीव्रता भयानक आहे. कसमादे परिसरात उष्णतेची लाट पसरली आहे. जंगल परिक्षेत्रात पाणी उपलब्ध नसल्याने प्राण्यांनी अन्न व पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्त्यांकडे धाव घेतली आहे.