शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

‘जल’ चळवळ

By admin | Updated: July 16, 2016 00:53 IST

‘जल’ चळवळ

अपुरा पडणारा पाऊस, दरवर्षी भासणारी भीषण पाणीटंचाई व शेती उत्पादनांवर त्याचा होणारा परिणाम लक्षात घेता, शासनाने पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील पावसाचे पाणी त्याच शिवारात अडविण्याचा व त्याचा योग्य वापर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान गेल्या वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभर जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये ७७७८ कामे हाती घेण्यात आली. काही ठिकाणी लोकसहभाग, तर काही ठिकाणी यंत्रांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आलेल्या या कामांचा दृश्य स्वरूपात लाभ दिसू लागला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे जलयुक्तच्या कामांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून काही तलावे तुडूंब भरले, नाल्यांमध्ये पाणी खळाळून वाहू लागले तर विहिरी पाण्याने तुडूंब भरल्या आहेत, अशाच कामांची प्रातिनिधिक घेतलेली दखल..

.चांदवड तालुक्यातील कल्की व पांझण नदीचे रूपडे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बदलले आहे. गेली अनेक वर्षे गाळाने पूर्णपणे भरलेल्या या लहान नद्यांमध्ये फक्त पावसाळ्यात व तेही काही काळापुरतेच पाणी दिसणाऱ्या या नद्यांमधून गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. आर्ट आॅफ लिव्हिंग व स्थानिक ग्रामस्थांच्या श्रमदानातून या दोन्ही नद्यांना गतवैभव प्राप्त झाले.

सटानेच्या पाझर तलावाने ४६५ एकर जमीन होणार सुपीक

अनकाई डोंगराच्या पायथ्याशी व नांदगाव तालुक्यातील सटाने येथे १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जनतेच्या हाताला काम देण्याबरोबरच, पंचक्रोशीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेल्या पाझर तलावाकडे गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष गेले नाही. परिणामी पाच ते सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली व बघता बघता तलावच नामशेष होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली. अशा परिस्थितीत शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गंत सटाणे गावातील पाझर तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला व प्रांत अधिकारी वासंती माळी यांनी ग्रामस्थांना घेतलेल्या विश्वासातून हजारो हात पुढे झाले.