शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून १८ गावांत पाणी : प्रमोद गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST

विधायक उपक्रमाने बळ कुपोषण, शिक्षणासाठीही कार्य नाशिक : सोशल नेटवर्किंगचा उपयोग हा विधायक कामांसाठी होऊ शकतो, याच जाणिवेतून सुरू ...

विधायक उपक्रमाने बळ

कुपोषण, शिक्षणासाठीही कार्य

नाशिक : सोशल नेटवर्किंगचा उपयोग हा विधायक कामांसाठी होऊ शकतो, याच जाणिवेतून सुरू झालेल्या चळवळीला चांगले यश लाभत आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या १८ गावांना किमान पिण्यासाठी पाणी देऊन त्यांची समस्या दूर करण्यात या चळवळीला यश आले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी दिली.

प्रश्न- सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावात पाणी आल्यानंतरच जल्लोष झाल्याचा विषय व्हायरल झाला आहे. ही किमया कशी घडली?

गायकवाड- सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव पाणीटंचाईमुळे अत्यंत अडचणीत होते. दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्याची दखल मीडियात घेतली जात होती. त्यामुळे सोशल नेटवर्किंग फोरमने गेले दीड वर्ष यासाठी परिश्रम घेतले आणि पाणीप्रश्न सेाडवला. या गावापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर वर्षभर पाणी असणारे धरण होते. त्याजवळच एक विहीर खोदली आणि तेथे खूप पाणी लागल्याने चर खेादून श्रमदानातून पाणी गावात आणले. काही सेवाभावी संस्थेच्या मदतीने पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यामुळे या गावााचा पाणीप्रश्न सुटला. आत्तापर्यंत १७ गावांत पाणी आणण्यात आले होते आणि हे अठरावे गाव होते.

प्रश्न - सोशल नेटवर्किंग फोरमची चळवळ कशी सुरू झाली?

गायकवाड - सोशल मीडियाचा वापर हा विधायक कामांसाठी झाला पाहिजे या उद्देशाने २०१० मध्येच सोशल नेटवर्किंग फोरम फॉर सोशल कॉज ही चळवळ सुरू केली. २०१२ मध्ये त्याला संस्थात्मक स्वरूप दिले. आरोग्य शिक्षण आणि पाणी यासंदर्भात तेव्हापासून लक्ष केंद्रित केले आहे.

प्रश्न- कुपोषणाबाबत संस्थेने काय काय उपक्रम राबवले?

गायकवाड- २०१७ मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुपोषणाची समस्या गंभीर झाल्याने एका गावात स्रीरोगतज्ज्ञ आणि बाल रोगतज्ज्ञांच्या मदतीने फोरमने काम केले. या ठिकाणी ३५२ कुपोषित मुले होती. त्यातील २८२ मुले कुपोषणाबाहेर आली. कुपोषण हे सरकारी पद्धतीने त्याच त्या पद्धतीचा पोषण आहार देऊन कमी होणार नाही तर त्यासाठी वेगळे काम केले पाहिजे यासाठी एक अहवाल करून केंद्र सरकारला सादर केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून वीस गावांतही कुपोषणमुक्तीसाठी काम सुरू आहे. याशिवाय डिजिटल शिक्षणासाठीदेखील दहा ते बारा गावांना संगणक आणि अन्य साहित्य पुरवले आहे. संगणक साक्षरतेसाठी मोहीमदेखील हाती घेण्यात आली.