शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

विंचूरला लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST

विंचूर : येथे गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरण मोहीम ठप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमारे पंधरा हजारांवर लोकसंख्या, ...

विंचूर : येथे गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरण मोहीम ठप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमारे पंधरा हजारांवर लोकसंख्या, परिसरातील वाड्यावस्त्या अन्‌ उपबाजार आवारात कायम असणारी वर्दळ यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असतानाही अनेक दिवसांपासून येथे लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

निफाड तालुक्यात कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून चर्चेत असणाऱ्या टॉप फाईव्ह गावांमध्ये विंचूरचा समावेश होता. असे असतानाही नागरिकांना लसीकरणासाठी बाहेरगावी जावे लागत होते;मात्र लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांनी पाठपुरावा केला असता येथील कर्मवीर विद्यालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. त्यातही आठवड्यात एकदा फक्त शंभर ते दीडशे लससाठा आणि त्यातही सातत्य नसल्याने लसीकरण प्रक्रिया सुरळीत चालली नाही. अद्यापही हजारो नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा येथे मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत असून, लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लसीकरण तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. काल निफाड तालुक्यासाठी ५३० डोस मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली; मात्र लसींची संख्या बघता तालुक्याच्या मानाने पुरवठा खूपच कमी असल्याने लसीकरण प्रक्रिया सर्व ठिकाणी राबवणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निमगाव वाकडा आरोग्य केंद्राच्या अन्य उपकेंद्रात लसीकरण बाकी होते अशा ठिकाणी लसीकरण सुरु आहे. दिवसाला शंभर-दीडशेच डोस येत असल्याने आरोग्य विभागही हतबल आहे.

-----------

लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

विंचूर पंचक्रोशीतील केंद्रस्थानी गाव असल्याने येथे मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी येत असतात. तसेच येथे लासलगाव बाजार समितीचा उपबाजार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह इतर तालुक्यातील शेतकरीही आपला शेतमाल विक्रीसाठी विंचूरला प्राधान्य देतात. त्यामुळे विंचूरसारख्या मोठ्या व कायम वर्दळीच्या गावात लसीकरण प्रक्रिया सातत्याने व मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असताना येथे साठा उपलब्ध होत नसल्याचे कारण देऊन लसीकरण अनेक दिवसांपासून ठप्प आहे.

सध्या येथे बोटांवर मोजण्याइतकी रुग्णसंख्या असताना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर लसीकरणाअभावी रुग्णसंख्या पुन्हा मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेशन दुकानदार यासह जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.