शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

विंचूरला लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST

विंचूर : येथे गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरण मोहीम ठप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमारे पंधरा हजारांवर लोकसंख्या, ...

विंचूर : येथे गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरण मोहीम ठप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमारे पंधरा हजारांवर लोकसंख्या, परिसरातील वाड्यावस्त्या अन्‌ उपबाजार आवारात कायम असणारी वर्दळ यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असतानाही अनेक दिवसांपासून येथे लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

निफाड तालुक्यात कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून चर्चेत असणाऱ्या टॉप फाईव्ह गावांमध्ये विंचूरचा समावेश होता. असे असतानाही नागरिकांना लसीकरणासाठी बाहेरगावी जावे लागत होते;मात्र लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांनी पाठपुरावा केला असता येथील कर्मवीर विद्यालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. त्यातही आठवड्यात एकदा फक्त शंभर ते दीडशे लससाठा आणि त्यातही सातत्य नसल्याने लसीकरण प्रक्रिया सुरळीत चालली नाही. अद्यापही हजारो नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा येथे मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत असून, लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लसीकरण तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. काल निफाड तालुक्यासाठी ५३० डोस मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली; मात्र लसींची संख्या बघता तालुक्याच्या मानाने पुरवठा खूपच कमी असल्याने लसीकरण प्रक्रिया सर्व ठिकाणी राबवणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निमगाव वाकडा आरोग्य केंद्राच्या अन्य उपकेंद्रात लसीकरण बाकी होते अशा ठिकाणी लसीकरण सुरु आहे. दिवसाला शंभर-दीडशेच डोस येत असल्याने आरोग्य विभागही हतबल आहे.

-----------

लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

विंचूर पंचक्रोशीतील केंद्रस्थानी गाव असल्याने येथे मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी येत असतात. तसेच येथे लासलगाव बाजार समितीचा उपबाजार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह इतर तालुक्यातील शेतकरीही आपला शेतमाल विक्रीसाठी विंचूरला प्राधान्य देतात. त्यामुळे विंचूरसारख्या मोठ्या व कायम वर्दळीच्या गावात लसीकरण प्रक्रिया सातत्याने व मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असताना येथे साठा उपलब्ध होत नसल्याचे कारण देऊन लसीकरण अनेक दिवसांपासून ठप्प आहे.

सध्या येथे बोटांवर मोजण्याइतकी रुग्णसंख्या असताना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर लसीकरणाअभावी रुग्णसंख्या पुन्हा मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेशन दुकानदार यासह जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.