शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

विंचूरला लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST

विंचूर : येथे गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरण मोहीम ठप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमारे पंधरा हजारांवर लोकसंख्या, ...

विंचूर : येथे गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरण मोहीम ठप्प असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमारे पंधरा हजारांवर लोकसंख्या, परिसरातील वाड्यावस्त्या अन्‌ उपबाजार आवारात कायम असणारी वर्दळ यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असतानाही अनेक दिवसांपासून येथे लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

निफाड तालुक्यात कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून चर्चेत असणाऱ्या टॉप फाईव्ह गावांमध्ये विंचूरचा समावेश होता. असे असतानाही नागरिकांना लसीकरणासाठी बाहेरगावी जावे लागत होते;मात्र लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांनी पाठपुरावा केला असता येथील कर्मवीर विद्यालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. त्यातही आठवड्यात एकदा फक्त शंभर ते दीडशे लससाठा आणि त्यातही सातत्य नसल्याने लसीकरण प्रक्रिया सुरळीत चालली नाही. अद्यापही हजारो नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा येथे मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत असून, लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लसीकरण तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. काल निफाड तालुक्यासाठी ५३० डोस मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली; मात्र लसींची संख्या बघता तालुक्याच्या मानाने पुरवठा खूपच कमी असल्याने लसीकरण प्रक्रिया सर्व ठिकाणी राबवणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निमगाव वाकडा आरोग्य केंद्राच्या अन्य उपकेंद्रात लसीकरण बाकी होते अशा ठिकाणी लसीकरण सुरु आहे. दिवसाला शंभर-दीडशेच डोस येत असल्याने आरोग्य विभागही हतबल आहे.

-----------

लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

विंचूर पंचक्रोशीतील केंद्रस्थानी गाव असल्याने येथे मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी येत असतात. तसेच येथे लासलगाव बाजार समितीचा उपबाजार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह इतर तालुक्यातील शेतकरीही आपला शेतमाल विक्रीसाठी विंचूरला प्राधान्य देतात. त्यामुळे विंचूरसारख्या मोठ्या व कायम वर्दळीच्या गावात लसीकरण प्रक्रिया सातत्याने व मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असताना येथे साठा उपलब्ध होत नसल्याचे कारण देऊन लसीकरण अनेक दिवसांपासून ठप्प आहे.

सध्या येथे बोटांवर मोजण्याइतकी रुग्णसंख्या असताना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर लसीकरणाअभावी रुग्णसंख्या पुन्हा मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेशन दुकानदार यासह जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.