शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण

By admin | Updated: January 7, 2016 23:29 IST

येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण

अंदरसूल : येवला तालुका हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळी तालुका आहे. पालखेड डाव्या कालव्यामुळे काही भाग प्रासंगिक ओलिताखाली येत असला तरी सिंचनासाठी पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमुळे बऱ्याच गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही; मात्र वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील व उत्तर- पूर्व भागातील जवळपास सर्वच गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. अंदरसूल गावात सध्या चार दिवसांनंतर पाणी मिळत आहे. गावाच्या धनगर वस्ती, जयहिंद वाडीवरील वस्टे, औटे, मुंगसे, धनगे वस्ती, खैरनार वस्ती, मन्याड थडीवरील जहागीर वस्ती, सोनवणे वस्ती, गायकवाड वस्ती, ढोले वस्ती, भोसले वस्ती, कोल्हे वस्ती, देवरे वस्ती आदिंसह उत्तरेकडील घोडके, केरे, जाधव, देशमुख आदि सर्व वाड्यावस्त्यांवर पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्याचप्रमाणे उंदीरवाडीचा काही भाग, बोकरे, दुगलगाव, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, आडसरे गाव, खरवंडी, भारम, कोळम, गारखेडे, तळवाडे, पिंपळखुटे, न्याहरखेडे, पांजरवाडी, सायगाव, धामणगाव, नागडे, गवंडगाव रस्ते, सुरेगाव या सर्व गावांत सिंचनासाठी पाणी तर नाहीच; मात्र पिण्यासाठी व जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे तरी ते मिळत नाही. पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी धाडस करून लागण केली. त्यात उसनवारी, सोसायटी कर्ज घेऊन पिके घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अपवाद वगळता सर्व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अखेर जनावरांना किमान चारा तरी मिळेल याकरिता ज्वारी पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)मुळातच पशुधन अल्प आहे, त्यांना जगविणेदेखील अवघड झाले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शेतीमाल नसल्याने बळीराजा दैनंदिन अडचणींना सामोरे जाऊन हतबल झाला आहे. येवला तालुक्याच्या बाहेरील कोपरगाव, वैजापूर, नांदगाव या भागातून सर्वाधिक कांदा मार्केटवर येत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती येवला व उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची विक्रमी आवक आहे. त्यामध्ये काही टक्के तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश असला तरी पूर्व भागातील व उत्तर पूर्व भागातील सिंचनासाठी तर नाहीच; मात्र वाड्यावस्त्यांवर शेतकरी व जनावरांना पाण्याची जानेवारी महिन्यातच टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी निव्वळ फार्स न करता सर्वांनी एकत्र येऊन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी निर्णायक भूमिका घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.