शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण

By admin | Updated: January 7, 2016 23:29 IST

येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण

अंदरसूल : येवला तालुका हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळी तालुका आहे. पालखेड डाव्या कालव्यामुळे काही भाग प्रासंगिक ओलिताखाली येत असला तरी सिंचनासाठी पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमुळे बऱ्याच गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही; मात्र वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील व उत्तर- पूर्व भागातील जवळपास सर्वच गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. अंदरसूल गावात सध्या चार दिवसांनंतर पाणी मिळत आहे. गावाच्या धनगर वस्ती, जयहिंद वाडीवरील वस्टे, औटे, मुंगसे, धनगे वस्ती, खैरनार वस्ती, मन्याड थडीवरील जहागीर वस्ती, सोनवणे वस्ती, गायकवाड वस्ती, ढोले वस्ती, भोसले वस्ती, कोल्हे वस्ती, देवरे वस्ती आदिंसह उत्तरेकडील घोडके, केरे, जाधव, देशमुख आदि सर्व वाड्यावस्त्यांवर पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्याचप्रमाणे उंदीरवाडीचा काही भाग, बोकरे, दुगलगाव, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, आडसरे गाव, खरवंडी, भारम, कोळम, गारखेडे, तळवाडे, पिंपळखुटे, न्याहरखेडे, पांजरवाडी, सायगाव, धामणगाव, नागडे, गवंडगाव रस्ते, सुरेगाव या सर्व गावांत सिंचनासाठी पाणी तर नाहीच; मात्र पिण्यासाठी व जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे तरी ते मिळत नाही. पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी धाडस करून लागण केली. त्यात उसनवारी, सोसायटी कर्ज घेऊन पिके घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अपवाद वगळता सर्व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अखेर जनावरांना किमान चारा तरी मिळेल याकरिता ज्वारी पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)मुळातच पशुधन अल्प आहे, त्यांना जगविणेदेखील अवघड झाले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शेतीमाल नसल्याने बळीराजा दैनंदिन अडचणींना सामोरे जाऊन हतबल झाला आहे. येवला तालुक्याच्या बाहेरील कोपरगाव, वैजापूर, नांदगाव या भागातून सर्वाधिक कांदा मार्केटवर येत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती येवला व उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची विक्रमी आवक आहे. त्यामध्ये काही टक्के तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश असला तरी पूर्व भागातील व उत्तर पूर्व भागातील सिंचनासाठी तर नाहीच; मात्र वाड्यावस्त्यांवर शेतकरी व जनावरांना पाण्याची जानेवारी महिन्यातच टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी निव्वळ फार्स न करता सर्वांनी एकत्र येऊन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी निर्णायक भूमिका घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.