शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

त्र्यंबकेश्वर परिसर बहरला

By admin | Updated: July 8, 2016 23:37 IST

त्र्यंबकेश्वर परिसर बहरला

 त्र्यंबकेश्वर : येथे सलग चार दिवसांपासून पाऊस बरसत असून, छोटे-मोठे तलाव, बंधारे ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत, तर अंबोली, गौतमी, गोदावरी जलाशय मात्र भरलेले नाहीत. तथापि, पावसाचे सातत्य असेच राहिल्यास अंबोली, लघु पाटबंधारा ओव्हर फ्लो होऊ शकतो; पण बेझे गौतमी गोदावरी धरण भरणे शक्यच नाही. २ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.त्र्यंबकला आतापर्यंत २७९ मिमी पाऊस झाला असून, वरुणराजा सध्या तरी त्र्यंबकराजावर मेहरबान झाला आहे. पुनर्वसू नक्षत्र लागले आहे. त्यामुळे पाऊस विश्रांती घेतो की, असाच बरसणार हे आता पहायचे आहे. दरम्यान, बळीराजा सुखावला असून, पेरणी व अन्य नांगर वखरणीच्या कामांना गती आली आहे. जनावरांच्या चाऱ्या-पाण्याची सोय किमानपक्षी झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी केली; पण नंतर मोटार लावून पाणी भरले अशा शेतकऱ्यांच्या शेतातील रोपे आवणी करण्यायोग्य मोठी होऊन त्यांच्या आवणीही सुरू झाल्या आहेत. कृषी विभागातर्फे पेरणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बी-बियाणे, खते बाजारात उपलब्ध झाली आहेत.पावसाने आज (दि. ८) थोडीफार उघडीप दिली. मात्र अधून मधून एखादी सर येते. त्र्यंबकचा अहल्या बंधारा भरला आहे, तर अंबोली धरण अद्याप भरलेले नाही. गौतमी-गोदावरीचा पसारा मात्र मोठा असून, हेही धरण अद्याप भरलेले नाही. या पावसामुळे त्र्यंबकचे सृष्टीसौंदर्यखुलले असून, वृक्षवेली बहरल्या आहेत. रानफुले उमलली आहेत. चहुकडे दऱ्या-खोऱ्या, डोंगर हिरवाईने नटले आहेत. (वार्ताहर) त्र्यंबकेश्वरच्या डोंगरी भागाला निसर्गाने आपले भरभरून दान बहाल केले आहे. यामुळे सुटीच्या दिवशी निसर्गप्रेमींच्या झुंडीच्या झुंडी त्र्यंबकेश्वरकडे वळतात. मात्र काहीजण निव्वळ पिकनिकच्या नावाखाली पहिणे शिवारात अक्षरश: नंगानाच करीत असतात. तेथील बिअर शॉपीवर मद्याच्या बाटल्या खरेदी करून तेथीलच धाब्यावर मनसोक्त जेवण करून धुडघूस घालतात. विशेष म्हणजे अशा तक्रारी अनेकांनी केल्या आहेत.या वर्षी त्र्यंबकला पावसाची सरासरी अत्यंत कमी आहे. कृषी विभागाने दिलेल्या खरीप पेरणी अहवालानुसार ९५० हेक्टरमधील ९७५ रोपवाटिका तयार केल्या असून, ९०५१ हेक्टर क्षेत्रात तालुक्यात भात लागवड करण्यात येत आहे. खरीप ज्वारी ६८ हेक्टर, नागली रोपवाटिका ४५० हेक्टर, तर ३०३० हेक्टरमध्ये लागवड इतर तृणधान्य (वरई) १७० हेक्टर रोपवाटिका तर ३५२ हेक्टर लागवड केली जाईल. एकूण तृणधान्य १५९५ हेक्टर रोपवाटिका व १२५०१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येईल. तर उडीद १६४८ हेक्टर, इतर कड धान्य ९ हेक्टर तर एकूण कडधान्य २६७६ हेक्टर तेलबिया लागवडीमध्ये भुईमूग ११५२ हेक्टर, खुरसणी ९०६ हेक्टर, सोयाबीन ६६ हेक्टर, इतर तेलबिया २.४२ हेक्टर एकूण तेलबिया २१२६.४२ असे एकूण तालुक्यात १७,३०३.४२ हेक्टर असून, १५९५ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार केल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.