शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

आघाडीचा आज फैसला

By admin | Updated: January 15, 2017 00:44 IST

कॉँग्रेसची बैठक : सटाण्यात राष्ट्रवादीकडून गोंजारण्याचा प्रयत्न

 सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या एक दशकापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची चलती होती .त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत वेळोवेळी आघाडीसाठी हात देणार्या कॉंग्रेसला झीडकारून आघाडीची बिघाडी केली. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला आलेले अपयश पाहता आगामी निवडणुकांमध्ये आघाडीसाठी कॉंग्रेसला आवतन देऊन एकप्रकारे गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक पातळीवर आघाडीसाठी उभय पक्षांमध्ये चर्चेचे गुर्हाळ सुरु असले तरी रविवारी (दि.१५ जानेवारी ) पक्षिनरीक्षक डी.जी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थित सटाण्यात होणार्या कॉंग्रेसच्या बैठकीत आघाडीबाबत फैसला होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.सटाणा पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रेसचा पराभव झाल्याने उभय पक्ष धास्तावले आहेत. गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहता कॉंग्रेसने जेव्हा जेव्हा आघाडीसाठी राष्ट्रवादीला आवतन दिले त्या त्या वेळी राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी कॉंग्रेसला झीटकारल्याचे बघायला मिळाले. आता भाजप सेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेसला आवतन दिले आहे. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया ,शहराध्यक्ष किशोर कदम ,विजय पाटील ,प्रल्हाद पाटील ,जिल्हा परिषद सदस्य प्रा.अनिल पाटील यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत एका बंद खोलीत दोन तास चर्चे गुर्हाळ चालले .या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा संजय चव्हाण ,तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनी ज्या गटात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता असेल ते गट राष्ट्रवादीला सोडावेत असा प्रस्ताव कॉंग्रेस पुढे ठेवला. मात्र कॉंग्रेसने ठेंगोडा ,जायखेडा ,वीरगाव ,ताहाराबाद अशा चार गटांची मागणी केली आहे. या चर्चे दरम्यान कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदम अधिकच आक्र मक होऊन राष्ट्रवादीला समोर पराभव दिसत असल्यामुळे कॉंग्रेसला गोंजारण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून आघाडी करायची असेल तर ठेंगोडा ,जायखेडा ,पठावे दिगर ,वीरगाव असे चार गट कॉंग्रेसला द्या अशी भूमिका कदम यांनी घेतली. दोन्ही कॉंग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे माजी आमदार संजय चव्हाण असे समीकरण आहे.शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडली.त्यावेळी नगराध्यक्षपदावर असतांना चव्हाण यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह पवारांसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला.तेव्हा पासूनच शहरात राष्ट्रवादीचे विचार रु जवून चव्हाण यांनी पक्षाला बळकट करण्याचे केले आहे. त्यानंतर पालिकेत राष्ट्रवादीची सत्ताही आली होती. (वार्ताहर)