शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

आघाडीचा आज फैसला

By admin | Updated: January 15, 2017 00:44 IST

कॉँग्रेसची बैठक : सटाण्यात राष्ट्रवादीकडून गोंजारण्याचा प्रयत्न

 सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या एक दशकापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची चलती होती .त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत वेळोवेळी आघाडीसाठी हात देणार्या कॉंग्रेसला झीडकारून आघाडीची बिघाडी केली. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला आलेले अपयश पाहता आगामी निवडणुकांमध्ये आघाडीसाठी कॉंग्रेसला आवतन देऊन एकप्रकारे गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक पातळीवर आघाडीसाठी उभय पक्षांमध्ये चर्चेचे गुर्हाळ सुरु असले तरी रविवारी (दि.१५ जानेवारी ) पक्षिनरीक्षक डी.जी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थित सटाण्यात होणार्या कॉंग्रेसच्या बैठकीत आघाडीबाबत फैसला होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.सटाणा पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रेसचा पराभव झाल्याने उभय पक्ष धास्तावले आहेत. गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहता कॉंग्रेसने जेव्हा जेव्हा आघाडीसाठी राष्ट्रवादीला आवतन दिले त्या त्या वेळी राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी कॉंग्रेसला झीटकारल्याचे बघायला मिळाले. आता भाजप सेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेसला आवतन दिले आहे. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया ,शहराध्यक्ष किशोर कदम ,विजय पाटील ,प्रल्हाद पाटील ,जिल्हा परिषद सदस्य प्रा.अनिल पाटील यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत एका बंद खोलीत दोन तास चर्चे गुर्हाळ चालले .या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा संजय चव्हाण ,तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनी ज्या गटात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता असेल ते गट राष्ट्रवादीला सोडावेत असा प्रस्ताव कॉंग्रेस पुढे ठेवला. मात्र कॉंग्रेसने ठेंगोडा ,जायखेडा ,वीरगाव ,ताहाराबाद अशा चार गटांची मागणी केली आहे. या चर्चे दरम्यान कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदम अधिकच आक्र मक होऊन राष्ट्रवादीला समोर पराभव दिसत असल्यामुळे कॉंग्रेसला गोंजारण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून आघाडी करायची असेल तर ठेंगोडा ,जायखेडा ,पठावे दिगर ,वीरगाव असे चार गट कॉंग्रेसला द्या अशी भूमिका कदम यांनी घेतली. दोन्ही कॉंग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे माजी आमदार संजय चव्हाण असे समीकरण आहे.शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडली.त्यावेळी नगराध्यक्षपदावर असतांना चव्हाण यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह पवारांसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला.तेव्हा पासूनच शहरात राष्ट्रवादीचे विचार रु जवून चव्हाण यांनी पक्षाला बळकट करण्याचे केले आहे. त्यानंतर पालिकेत राष्ट्रवादीची सत्ताही आली होती. (वार्ताहर)