शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आमदार तीन, जागा अवघ्या पाच...

By admin | Updated: February 25, 2017 00:57 IST

दोन प्रभागांतील निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा

संजय पाठक : नाशिकउच्चभ्रू वसाहत म्हणजे भाजपाची मतपेढी असे मानल्या जात असले तरी नाशिक महापालिकेच्या पश्चिम प्रभागात हे आताच साध्य झाले आहे. कॉँग्रेससह सर्वच पक्षांच्या प्रभावात कमी अधिक असलेल्या या प्रभागात आज जोडलेल्या दोनच प्रभागांत भाजपाने आठपैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ज्या एका प्रभागात तीन भाजपा आमदार आहेत, त्या प्रभागातही संपूर्ण पॅनल विजयी न होणे ही बाब खचीतच आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहे. सीबीएसकडून पश्चिमेचा भाग असलेल्या पश्चिम प्रभागात मध्य नाशिकचे काही प्रभाग जोडले जातात. त्यामुळे केवळ गेल्यावेळेचाच विचार केला तर सात द्विसदस्यीय प्रभागात १४ पैकी भाजपाच्या वाटेला अवघ्या तीन जागाच होत्या. त्यापेक्षा अधिकतम मनसेच्या म्हणजेच पाच, त्याखालोखाल चार जागा कॉँग्रेस, तर दोन जागा सेनेच्या ताब्यात होत्या. आता प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने दोनच चार सदस्यीय प्रभाग जोडल्या गेलेल्या पश्चिम प्रभागात जेमतेम आठ जागा. अशा स्थितीत लागलेल्या निकालाने भाजपाच्या वाटेला पाच आणि दोन कॉँग्रेस, तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे. मनसेचा अपेक्षेनुसार विषय संपला आहे. या प्रभागात सात आणि बारा असे दोनच प्रभाग असून, प्रभाग सातमध्ये भाजपाचे एक नव्हे तर तीन आमदार आहेत. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर यांची प्रभागात प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी ती केवळ सोयीच्याच ठिकाणी होती का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे. याचे कारण म्हणजे सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर या आमदारद्वयींची प्रतिष्ठा जणू त्यांच्या कुटुंबीयांमधील योगेश हिरे आणि गौरी अहेर आडके यांच्या पुरतीच सीमित होती.  फरांदे यांनी आग्रहाने उमेदवारी मिळवून दिलेल्या स्वाती भामरे विजयी झाल्या, परंतु शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना मात्र त्या रोखू शकल्या नाहीत. त्यामुळे तीन तीन भाजपा आमदार असलेल्या प्रभागात बोरस्ते निवडून आलेले हे भाजपाला वर्मी लागायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. बाकी प्रभाग १२ मध्ये भाजपाचे शिवाजी गांगुर्डे आणि प्रियंका घाटे हे दोघे निवडून येऊ शकले. अन्य दोन प्रभागांमध्ये कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील व समीर कांबळे हे विजयी झाले. मतदारसंघावर प्रभुत्व नाहीएखाद्या विभागात किंवा तालुक्यात एक आमदार असला तर त्या संपूर्ण मतदारसंघावर त्यांचे प्रभुत्व मानले जाते, परंतु मध्य नाशिकमध्ये भाजपाचे तीन आमदार एकाच भागात असताना दोन प्रभागांवरही ताबा घेऊ शकले नाही, ही चूक कोणाची हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  महात्मानगर ते मुंबई नाका या भागापर्यंत आजवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात मनसेचा प्रभाव राहिला आहे. या प्रभागात भाजपाचा जो प्रभाव वाढणे अपेक्षित होता. तो मात्र वाढला नाही. त्यामुळे पक्षातील मूळ इच्छुकांवर विश्वास न टाकता चार आयात उमेदवारांवरही निवडणूक लढली गेली आणि त्यात शिवाजी गांगुर्डे व प्रियंका घाटे या दोघांनी बाजी मारली. त्यामुळे हा प्रभाव भाजपाच की संबंधित उमेदवारांचा, अशी शंका घेण्यास जागा आहे.