शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आमदार तीन, जागा अवघ्या पाच...

By admin | Updated: February 25, 2017 00:57 IST

दोन प्रभागांतील निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा

संजय पाठक : नाशिकउच्चभ्रू वसाहत म्हणजे भाजपाची मतपेढी असे मानल्या जात असले तरी नाशिक महापालिकेच्या पश्चिम प्रभागात हे आताच साध्य झाले आहे. कॉँग्रेससह सर्वच पक्षांच्या प्रभावात कमी अधिक असलेल्या या प्रभागात आज जोडलेल्या दोनच प्रभागांत भाजपाने आठपैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ज्या एका प्रभागात तीन भाजपा आमदार आहेत, त्या प्रभागातही संपूर्ण पॅनल विजयी न होणे ही बाब खचीतच आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहे. सीबीएसकडून पश्चिमेचा भाग असलेल्या पश्चिम प्रभागात मध्य नाशिकचे काही प्रभाग जोडले जातात. त्यामुळे केवळ गेल्यावेळेचाच विचार केला तर सात द्विसदस्यीय प्रभागात १४ पैकी भाजपाच्या वाटेला अवघ्या तीन जागाच होत्या. त्यापेक्षा अधिकतम मनसेच्या म्हणजेच पाच, त्याखालोखाल चार जागा कॉँग्रेस, तर दोन जागा सेनेच्या ताब्यात होत्या. आता प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने दोनच चार सदस्यीय प्रभाग जोडल्या गेलेल्या पश्चिम प्रभागात जेमतेम आठ जागा. अशा स्थितीत लागलेल्या निकालाने भाजपाच्या वाटेला पाच आणि दोन कॉँग्रेस, तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे. मनसेचा अपेक्षेनुसार विषय संपला आहे. या प्रभागात सात आणि बारा असे दोनच प्रभाग असून, प्रभाग सातमध्ये भाजपाचे एक नव्हे तर तीन आमदार आहेत. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर यांची प्रभागात प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी ती केवळ सोयीच्याच ठिकाणी होती का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे. याचे कारण म्हणजे सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर या आमदारद्वयींची प्रतिष्ठा जणू त्यांच्या कुटुंबीयांमधील योगेश हिरे आणि गौरी अहेर आडके यांच्या पुरतीच सीमित होती.  फरांदे यांनी आग्रहाने उमेदवारी मिळवून दिलेल्या स्वाती भामरे विजयी झाल्या, परंतु शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना मात्र त्या रोखू शकल्या नाहीत. त्यामुळे तीन तीन भाजपा आमदार असलेल्या प्रभागात बोरस्ते निवडून आलेले हे भाजपाला वर्मी लागायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. बाकी प्रभाग १२ मध्ये भाजपाचे शिवाजी गांगुर्डे आणि प्रियंका घाटे हे दोघे निवडून येऊ शकले. अन्य दोन प्रभागांमध्ये कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील व समीर कांबळे हे विजयी झाले. मतदारसंघावर प्रभुत्व नाहीएखाद्या विभागात किंवा तालुक्यात एक आमदार असला तर त्या संपूर्ण मतदारसंघावर त्यांचे प्रभुत्व मानले जाते, परंतु मध्य नाशिकमध्ये भाजपाचे तीन आमदार एकाच भागात असताना दोन प्रभागांवरही ताबा घेऊ शकले नाही, ही चूक कोणाची हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  महात्मानगर ते मुंबई नाका या भागापर्यंत आजवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात मनसेचा प्रभाव राहिला आहे. या प्रभागात भाजपाचा जो प्रभाव वाढणे अपेक्षित होता. तो मात्र वाढला नाही. त्यामुळे पक्षातील मूळ इच्छुकांवर विश्वास न टाकता चार आयात उमेदवारांवरही निवडणूक लढली गेली आणि त्यात शिवाजी गांगुर्डे व प्रियंका घाटे या दोघांनी बाजी मारली. त्यामुळे हा प्रभाव भाजपाच की संबंधित उमेदवारांचा, अशी शंका घेण्यास जागा आहे.