शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

...मग दोषी पोलिसांवर कारवाई करा

By admin | Updated: January 7, 2017 01:30 IST

नांदगाव जमीन घोटाळा प्रकरण : लाचलुचपत खातेच संशयाच्या भोवऱ्यात

नाशिक : नांदगाव तालुक्यातील जमीन व्यवहारापोटी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दाखल केलेल्या गुन्ह्यातून अनेक कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले असून, मुळात शर्तींच्या जमिनींचे नजराणा न भरताच व्यवहार झाले असतील व तशी बाब महसूल खात्याच्या निदर्शनास आली असेल तर अशा जमिनींचे कोणतेही व्यवहार नजराणा रक्कम भरल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत. महसूल कायद्यातच तशी तरतूद असल्यामुळे नांदगावच्या प्रकरणात शासनाचा महसूल बुडवून नुकसान केले व नजराणापोटी मिळणाऱ्या रकमेचा अपहार केल्याचा निष्कर्ष लाचलुचपत खात्याने कशाच्या आधारे काढला, असा प्रश्न निर्माण तर होतोच परंतु नांदगावच्या प्रभारी तहसीलदार पूनम दंडिले व प्रांत वासंती माळी यांना अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल तर पवार यांनी दंडिले व माळी यांच्याप्रमाणे नांदगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधीक्षक व मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक यांनाही पत्र पाठवून जमीन व्यवहारातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली होती व त्यांनीही पवार यांचे पत्र मनावर घेतले नाही, त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता दोषी पोलिसांवरही गुन्हे दाखल करणार का, असा तांत्रिक मुद्दाही उपस्थित केला जात आहे. नांदगावच्या जमीन महसूल प्रकरणावरून पोलीस व महसूल खाते यांच्यात पुन्हा जुंपेल अशी चिन्हे आहेत. ज्या जमिनींच्या खरेदी-विक्री प्रकरणावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने २३ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले त्याचा पूर्वेतिहास पाहता शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारात नजराणा भरलेला नसेल तर तो संबंधितांकडून भरून घेण्याची महसूल खात्याची जबाबदारी आहे; मात्र असा नजराणा भरून न घेताच खरेदी-विक्रीचे व्यवहार केले असतील तर संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी कोणतीही तरतूद महसूल अधिनियमात करण्यात आलेली नाही. उलट शासनाचा महसूल वाढावा म्हणून राजस्व अभियानातून अशा प्रकरणांचा शोध घेण्याचा व त्यातून नजराणा रक्कम भरून घेण्याचा शासनाचाच आग्रह आहे. इतका सरळ कायदा असताना त्याचा कोणताही विचार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेला नसल्यामुळे त्यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची सारी कृतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, यात खऱ्या अर्थाने शासनाच्या हिताचा विचार केला गेला आहे की, तपास अधिकाऱ्यांनी काही तरी हेतू ठेवून हा गुन्हा दाखल केला असा घेतला जाणारा आक्षेपही खरा ठरू पाहत आहे. मुळात या साऱ्या प्रकरणात महसूल खात्यात बरीच भवती न भवती यापूर्वीच झाली आहे. ज्यावेळी सदरचे प्रकरण महसूल खात्याच्या निदर्शनास आले, त्याचवेळी सदर जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरविण्यात आले व साऱ्या जमिनी सरकार जमा करण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ या जमिनींचा भविष्यात ज्यावेळी कोणताही व्यवहार करण्याचा प्रयत्न होईल त्यावेळी संबंधितांना दंडासह नजराणा रक्कम भरावीच लागणार आहे. त्यामुळे संबंधितांनी थेट पावणेचार कोटी रुपयांचा अपहार केला असा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काढलेला निष्कर्ष म्हणजे साप साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकारच मानला जात आहे. (क्रमश:)