शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के भरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी ...

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी काही धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हावासीयांची चिंता मिटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही १२ टक्के जलसाठा कमी असला तरी दहा धरणांनी शंभरी गाठली असून, आठ धरणे लवकरच शतक ठोकण्याची दाट शक्यता आहे.

जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या जोरदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच ऑगस्ट महिना कोरडा गेला आणि जिल्ह्यात पाणीटंचाईची चर्चा सुरू झाली. सप्टेंबरच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम ५० ते ६० टक्के इतका जलसाठा असल्यामुळे जिल्ह्यावर जलसंकट निर्माण झाल्याने पाणी नियोजन करण्याची वेळ आली. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात झालेला दमदार पाऊस आणि त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली असून, जिल्ह्यातील २४ लहानमोठ्या धरणांपैकी दहा धरणे शंभर टक्के इतकी भरली आहेत.

गंगापूर, आळंदी, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नागासाक्या, ओणि माणिकपुंज ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. या सर्व धरणांमधून विसर्ग करण्याची वेळ आली असून, नांदुरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक विसर्ग केला जात असून हे पाणी मराठवाड्याला मिळत आहे. या धरणांमध्ये सकाळी सुरू असलेला विसर्ग दुपारनंतर चार पटीने कमी करण्यात आल्याने सायंकाळपर्यंत अनेक धरणांमधून विसर्ग कमी झाला. त्यामुळे नदी, नाल्यांना आलेली पूरपरिस्थितीही नियंत्रणात आली.

दरम्यान, गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी ही धरणे ९८ टक्के भरली असून, दोन दिवसांत त्यांची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे. पालखेड धरण शंभर टक्के होण्यास अवघे एक टक्का राहिला आहे. पुणेगाव प्रकल्पही ९५ टक्के इतका झाला आहे. कडवा धरण ९९ टक्के, तर चणकापूर ९७ टक्के भरले आहे. पुनद प्रकल्पातही ९८ टक्के इतका जलसाठा झाला आहे.

--इन्फो--

मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमीच

जिल्ह्यातील धरणांची पातळी वाढली असली तरीही गत वर्षीच्या तुलनेत अजूनही १२ टक्के जलसाठा कमीच आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील धरणांची सरासरी टक्केवारी ९५ टक्के इतकी होती, तर आता ८३ टक्के इतकी आहे. या धरण प्रकल्पांमध्ये ५४१८३ दलघफू उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी ६२२६० दलघफू इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक होता.