शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के भरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी ...

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी काही धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हावासीयांची चिंता मिटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही १२ टक्के जलसाठा कमी असला तरी दहा धरणांनी शंभरी गाठली असून, आठ धरणे लवकरच शतक ठोकण्याची दाट शक्यता आहे.

जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या जोरदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच ऑगस्ट महिना कोरडा गेला आणि जिल्ह्यात पाणीटंचाईची चर्चा सुरू झाली. सप्टेंबरच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम ५० ते ६० टक्के इतका जलसाठा असल्यामुळे जिल्ह्यावर जलसंकट निर्माण झाल्याने पाणी नियोजन करण्याची वेळ आली. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात झालेला दमदार पाऊस आणि त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली असून, जिल्ह्यातील २४ लहानमोठ्या धरणांपैकी दहा धरणे शंभर टक्के इतकी भरली आहेत.

गंगापूर, आळंदी, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नागासाक्या, ओणि माणिकपुंज ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. या सर्व धरणांमधून विसर्ग करण्याची वेळ आली असून, नांदुरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक विसर्ग केला जात असून हे पाणी मराठवाड्याला मिळत आहे. या धरणांमध्ये सकाळी सुरू असलेला विसर्ग दुपारनंतर चार पटीने कमी करण्यात आल्याने सायंकाळपर्यंत अनेक धरणांमधून विसर्ग कमी झाला. त्यामुळे नदी, नाल्यांना आलेली पूरपरिस्थितीही नियंत्रणात आली.

दरम्यान, गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी ही धरणे ९८ टक्के भरली असून, दोन दिवसांत त्यांची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे. पालखेड धरण शंभर टक्के होण्यास अवघे एक टक्का राहिला आहे. पुणेगाव प्रकल्पही ९५ टक्के इतका झाला आहे. कडवा धरण ९९ टक्के, तर चणकापूर ९७ टक्के भरले आहे. पुनद प्रकल्पातही ९८ टक्के इतका जलसाठा झाला आहे.

--इन्फो--

मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमीच

जिल्ह्यातील धरणांची पातळी वाढली असली तरीही गत वर्षीच्या तुलनेत अजूनही १२ टक्के जलसाठा कमीच आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील धरणांची सरासरी टक्केवारी ९५ टक्के इतकी होती, तर आता ८३ टक्के इतकी आहे. या धरण प्रकल्पांमध्ये ५४१८३ दलघफू उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी ६२२६० दलघफू इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक होता.