शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के भरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी ...

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी काही धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हावासीयांची चिंता मिटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही १२ टक्के जलसाठा कमी असला तरी दहा धरणांनी शंभरी गाठली असून, आठ धरणे लवकरच शतक ठोकण्याची दाट शक्यता आहे.

जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या जोरदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच ऑगस्ट महिना कोरडा गेला आणि जिल्ह्यात पाणीटंचाईची चर्चा सुरू झाली. सप्टेंबरच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम ५० ते ६० टक्के इतका जलसाठा असल्यामुळे जिल्ह्यावर जलसंकट निर्माण झाल्याने पाणी नियोजन करण्याची वेळ आली. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात झालेला दमदार पाऊस आणि त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली असून, जिल्ह्यातील २४ लहानमोठ्या धरणांपैकी दहा धरणे शंभर टक्के इतकी भरली आहेत.

गंगापूर, आळंदी, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नागासाक्या, ओणि माणिकपुंज ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. या सर्व धरणांमधून विसर्ग करण्याची वेळ आली असून, नांदुरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक विसर्ग केला जात असून हे पाणी मराठवाड्याला मिळत आहे. या धरणांमध्ये सकाळी सुरू असलेला विसर्ग दुपारनंतर चार पटीने कमी करण्यात आल्याने सायंकाळपर्यंत अनेक धरणांमधून विसर्ग कमी झाला. त्यामुळे नदी, नाल्यांना आलेली पूरपरिस्थितीही नियंत्रणात आली.

दरम्यान, गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी ही धरणे ९८ टक्के भरली असून, दोन दिवसांत त्यांची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे. पालखेड धरण शंभर टक्के होण्यास अवघे एक टक्का राहिला आहे. पुणेगाव प्रकल्पही ९५ टक्के इतका झाला आहे. कडवा धरण ९९ टक्के, तर चणकापूर ९७ टक्के भरले आहे. पुनद प्रकल्पातही ९८ टक्के इतका जलसाठा झाला आहे.

--इन्फो--

मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमीच

जिल्ह्यातील धरणांची पातळी वाढली असली तरीही गत वर्षीच्या तुलनेत अजूनही १२ टक्के जलसाठा कमीच आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील धरणांची सरासरी टक्केवारी ९५ टक्के इतकी होती, तर आता ८३ टक्के इतकी आहे. या धरण प्रकल्पांमध्ये ५४१८३ दलघफू उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी ६२२६० दलघफू इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक होता.