शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के भरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी ...

नाशिक : गेल्या ऑगस्ट महिन्यात नाशिककरांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या उत्तरार्धात केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांनी शंभरी गाठली असून, आणखी काही धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हावासीयांची चिंता मिटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही १२ टक्के जलसाठा कमी असला तरी दहा धरणांनी शंभरी गाठली असून, आठ धरणे लवकरच शतक ठोकण्याची दाट शक्यता आहे.

जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या जोरदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच ऑगस्ट महिना कोरडा गेला आणि जिल्ह्यात पाणीटंचाईची चर्चा सुरू झाली. सप्टेंबरच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम ५० ते ६० टक्के इतका जलसाठा असल्यामुळे जिल्ह्यावर जलसंकट निर्माण झाल्याने पाणी नियोजन करण्याची वेळ आली. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात झालेला दमदार पाऊस आणि त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली असून, जिल्ह्यातील २४ लहानमोठ्या धरणांपैकी दहा धरणे शंभर टक्के इतकी भरली आहेत.

गंगापूर, आळंदी, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नागासाक्या, ओणि माणिकपुंज ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. या सर्व धरणांमधून विसर्ग करण्याची वेळ आली असून, नांदुरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक विसर्ग केला जात असून हे पाणी मराठवाड्याला मिळत आहे. या धरणांमध्ये सकाळी सुरू असलेला विसर्ग दुपारनंतर चार पटीने कमी करण्यात आल्याने सायंकाळपर्यंत अनेक धरणांमधून विसर्ग कमी झाला. त्यामुळे नदी, नाल्यांना आलेली पूरपरिस्थितीही नियंत्रणात आली.

दरम्यान, गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी ही धरणे ९८ टक्के भरली असून, दोन दिवसांत त्यांची पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे. पालखेड धरण शंभर टक्के होण्यास अवघे एक टक्का राहिला आहे. पुणेगाव प्रकल्पही ९५ टक्के इतका झाला आहे. कडवा धरण ९९ टक्के, तर चणकापूर ९७ टक्के भरले आहे. पुनद प्रकल्पातही ९८ टक्के इतका जलसाठा झाला आहे.

--इन्फो--

मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमीच

जिल्ह्यातील धरणांची पातळी वाढली असली तरीही गत वर्षीच्या तुलनेत अजूनही १२ टक्के जलसाठा कमीच आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील धरणांची सरासरी टक्केवारी ९५ टक्के इतकी होती, तर आता ८३ टक्के इतकी आहे. या धरण प्रकल्पांमध्ये ५४१८३ दलघफू उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी ६२२६० दलघफू इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक होता.