शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

व्यापरी उद्योजकांच्या समस्य सोडविण्यासाठी टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:15 IST

नाशिक- कोरोना संसर्ग वाढ रोखण्यासाठी राज्य शासनापाठोपाठ जिल्हा प्रशासनाने देखील १२ दिवसांचे कडक निर्बंध लागू केले आहेत. पहिली लाट, ...

नाशिक- कोरोना संसर्ग वाढ रोखण्यासाठी राज्य शासनापाठोपाठ जिल्हा प्रशासनाने देखील १२ दिवसांचे कडक निर्बंध लागू केले आहेत. पहिली लाट, दुसरी लाट अशाप्रकारे एकेक लाटांसाठी निर्बंध ठेवले तर व्यापार उद्योग करायचे कधी असा प्रश्न नाशिक शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्यावतीने आयोजित बैठकीत गुरुवारी (दि. १४) केला. लॉकडाऊनमुळे कर भरणे तसेच बँकाचे हप्ते फेडणे इतकेच नव्हे तर कामगारांचे वेतन देणे शक्य होत नसल्याने राज्य सरकारने आर्थिक पॅकेज आणि कर सवलती द्याव्यात, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शासनाकडे समस्या मांडण्यासाठी सर्व संघटना प्रतिनिधींचा टास्क फोर्स स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स ॲंड इंडस्ट्रीजच्यावतीने निर्बंधांमुळे गुरुवारी (दि.१४) ऑनलाईन बैठक घेण्यात आली. तसेच विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.

राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्याला व्यापारी आणि उद्योजकांनी समर्थन दिले आहे. मात्र त्यानंतर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला. त्याच बरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ ते २२ असे दोन दिवस कडक लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. शासन आणि प्रशासन व्यापारी आणि उद्योजकांना विश्वासात न घेता निर्णय घेत असून त्यामुळेच या घटकांना येत असलेल्या अडचणींबाबत शासनाकडे दाद मागण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.

भाजप महाउद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हे समर्थनीय नसल्याचे सांगितले. आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दोन दिवसात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केल्याची माहिती दिली. तसेच सर्वांनुमते जो निर्णय होईल त्यास पाठिंबा असेल असे सांगितले.

या बैठकीस सुरेश चावला, कैलास चावला, प्रफुल संचेती, एकनाथ अमृतकर, सुमित पटवा, गिरीश नवसे, हसमुख पटेल, मिलिंद कुलकर्णी, ललिता पाटोळे, राजेंद्र फड, मिलिंद जहागीरदार, रसिक बोथरा, प्रफुल्ल जैन, मनीष रावळ, भवन साखला, महेंद्र पटेल, शरद मिश्रा, संतोषकुमार लोढा, मुस्तानगीर मोगरावाला या व्यापारी प्रतिनिधींनी यावेळी अडचणी मांडल्या.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा यांनी आभार मानले.

कोट...

निर्बंधामुळे व्यापार बंद आहे.कर्जाचे हप्ते, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे याबाबत व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे.

- दिग्विजय कापडिया, व्यापारी

कोट...

सरकार दररोज नवनवीन पत्रके काढत आहे. त्यामुळे गोंधळ होत आहे. त्यातच शासन आणि प्रशासनात कोणताही समन्वय नाही. नाशिकमध्ये केवळ व्यापारावर एक लाख कुटुंब अवलंबून आहेत, त्याची अडचण होत आहे.

- हेमंत राठी, उद्योजक

कोट...

मार्चपासून आत्तापर्यंत केवळ २० टक्के माल विकला गेला आहे. उद्याेग आणि व्यापार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कुठले तरी एक सुरू ठेवणे अयोग्य वाटते, मुंबईत दुकानांना परवानगी आहे, मग नाशिकला का नाही?

- खुशालभाई पोद्दार, व्यापारी