शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

लवकरच परिपत्रक : पणन संचालकांचे सूतोवाच

By admin | Updated: December 19, 2014 23:46 IST

आडत बंदला व्यापाऱ्यांचा विरोध, शेतकरी संभ्रमात

नाशिक : राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांना लावण्यात येणारी आडत पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत दोन दिवसांत पत्रक काढण्यात येणार असल्याचे सुतोवाच पणन संचालक डॉ़ सुभाष माने यांनी केले आहे़ आडत बंद होणार असेल तर व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे, तर आडत बंद झाल्यास मालास किंमत व हमी मिळेल काय, अशा संभ्रमात शेतकरी आहेत़ बाजार समित्यांसाठी उपविधी व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ मधील तरतुदींप्रमाणे बाजार समितीस कामकाज करणे बंधनकारक आहे. (पान २ वर)बाजार समितीस लागू कायद्यातील तरतुदीनुसार आडत्या हा घटक शेतकऱ्यांचे शेतीमालाचे विक्र ीस व अनुषंगिक बाबीस जबाबदार घटक म्हणून कामकाज पाहत आहे. प्रचलित पद्धतीनुसार शेतकरी शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्र ीस आणतो. त्याच्या इच्छेनुसार आडत्याची निवड करण्याचे त्याला संपूर्ण स्वातंत्र्य असते. आडत्या हा शेतकऱ्याचा माल जास्तीत जास्त भावाने लिलाव पुकारून विकणे, मोजमाप करणे आदि कामे करतो. व्यापाऱ्याकडून रक्कम नाही मिळाली तरी २४ तासांच्या आत शेतकऱ्याला मालाची रक्कम देतो, तर व्यापाऱ्यांकडून १ टक्के मार्केट फी वसूल करून बाजार समितीला देण्याचे काम आडते करत आहेत़ बदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून तीन ते साडेतीन टक्के आडत मिळते यावरच त्यांचा व्यवसाय सुरू आहे़ बाजार समित्यांनी या पद्धतीत बदल करून आडत्या या महत्त्वपूर्ण घटकास दूर केल्यास शेतकऱ्यांच्या मालाची जबाबदारी कोण घेणार? खरेदीदाराने शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास त्याला जबाबदार कोण? शेतीमालाला चांगला भाव मिळणार का? आदि प्रश्न उपस्थित झाले आहेत़ तसेच कायद्यातील तरतुदीनुसार व प्रचलित बाजार आवारात प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून कामकाज सुरू आहे. यात बदल झाल्यास कायदेशीर बाबी उद्भवणार असल्याचे संचालकांचे म्हणणे आहे़ शासन आडतीला पर्यायी व्यवस्था काय करणार हे अगोदर स्पष्ट करावे़ तसेच आडत बंद केल्यानंतर आडत्यांनी शेतकऱ्यांच्या पैशाची हमी का घ्यावी, असे प्रश्न उपस्थित करत आडत बंद के ल्यास सर्व व्यापारी, आडतदार या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरतील असे व्यापारी संघटनेचे सोहन भंडारी यांनी सांगितले़ चौकट स्वागतार्ह, परंतु हमीचे काय शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु बाजार समितीत आडतदार बोलीपद्धतीने मालाची विक्री करून चढ्या भावाने माल विक्री करतो़ तो स्थानिक असल्याने त्याच्या वतीने विक ल्या गेलेल्या मालाला तो जबाबदार असतो़ उद्या आडत्या नसेल तर शेतमालाला योग्य भाव मिळेल का? तसेच खरेदीदार व्यापाऱ्याच्या पैशाची हमी कोण घेणार हा प्रश्न आहे़ शासनाचा निर्णयाने शेतकऱ्यांच्या काही पैशांची बचत होईल; परंतु विक्रीच्या पैशाची हमी कोण घेणाऱ - दत्तात्रय सोनू जमदाडे, शेतकरी, वडनेर भैरव....तर शेतकऱ्यांना कोणी वाली नसेलआडत्या हा शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये होणाऱ्या व्यवहारात मध्यस्थाची भूमिका बजावतो़ त्याच्या विश्वासावरच शेतकरी आपला माल घेऊन बाजार समितीत येत असतात़ शासनाने आडत बंद केली, तर दुसरी पर्यायी यंत्रणा शासनाकडे नाही़ आडत बंद झाल्यास शेतकऱ्यांच्या पैशाची हमी कोणी घेणार नाही, तर बाहेरील व्यापारी शेतकऱ्यांची केवळ लुबाडणूक करतील़ त्यावेळी शेतकऱ्यांना कोणीही वाली नसेल़- अनिल बूब, व्यापारी प्रतिनिधी, कृषी उत्त्पन्न बाजार समिती, नाशिक.