शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

भुजबळ फार्मवर सन्नाटा; राष्ट्रवादी भवन बनले केंद्र

By admin | Updated: January 15, 2017 01:05 IST

भुजबळ फार्मवर सन्नाटा; राष्ट्रवादी भवन बनले केंद्र

 धनंजय वाखारे नाशिकसन २०१२ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सारी सूत्रे ज्याठिकाणाहून हलविली गेली, जेथून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द अंतिम मानला गेला, तो मुंबई - आग्रा महामार्गावरील ‘भुजबळ फार्म’ आता २०१७च्या निवडणुकीत पुरता सुनासुना आहे. त्याऐवजी, भुजबळ यांच्याच प्रयत्नांतून उभे राहिलेले राष्ट्रवादी भवन आता निवडणुकीचे मुख्य केंद्र बनले असून, दोलायमान स्थितीत असलेल्या राष्ट्रवादीला भुजबळांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.नाशिक महापालिकेत १९९२ पासून लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. आजवर झालेल्या पाचही पंचवार्षिक निवडणुकांत नाशिकचे भूमिपुत्र व राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नेतृत्व कायम राहिले. भुजबळ सांगतील तोच शब्द प्रमाण मानत नाशकात आधी शिवसेनेची नंतर राष्ट्रवादीची वाटचाल सुरू राहिली. सन २०१२ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीची सारी सूत्रे छगन भुजबळ व त्यांचे पुतणे खासदार समीर भुजबळ यांच्याकडे होती. मुंबई - आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्म हेच राष्ट्रवादीतील प्रत्येक घडामोडीचे केंद्र असायचे. भुजबळ बंगल्यावरून आलेला निरोप हाच अंतिम मानला जायचा. पक्षाच्या बैठकाही याच बंगल्यावर व्हायच्या आणि निवडणुकीतील उमेदवारांना महत्त्वाच्या अशा अ‍ेबी फार्मचेही वितरण याच ठिकाणाहून व्हायचे. सन २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस बाजी मारेल आणि भुजबळांच्या स्नुषा शेफाली समीर भुजबळ या महापौर बनतील, अशी जोरदार हवा निर्माण झाली होती. परंतु, राज ठाकरे यांच्या एका सभेने गणित बिघडविले आणि राष्ट्रवादीसह अन्य सेना - भाजपासारखेही पक्षही डळमळले. मनसेने तब्बल ४० जागांवर कब्जा केला, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला २० जागा आल्या. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. परिस्थिती बदलली आहे. गेल्या दहा - अकरा महिन्यांपासून छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे दोघेही विविध आरोपांमुळे आर्थररोड तुरुंगात आहेत. आता २१ फेबु्रवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडे भुजबळांसारखे नेतृत्व नसल्याने नेत्यांसह कार्यकर्ते सैरभैर अवस्थेत आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी विविध आरोपांमुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा पाहून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या आहेत. २०१२ मध्ये निवडणुकीचे मुख्य केंद्र बनलेला भुजबळ फार्म आता सुनासुना झाला आहे. भुजबळांचे कुटुंबीय व नातेवाईक वगळता तेथे कोणाचाही वावर नाही. त्याऐवजी आता भुजबळांनीच उभारलेले राष्ट्रवादी भवन मुख्य केंद्र बनले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊनही अद्याप राष्ट्रवादी भवन येथे वर्दळ दिसून येत नाही. भुजबळांविना पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादीची स्थिती दोलायमान आहे. त्यामुळे यंदा आघाडी करण्यास कॉँग्रेसचीही पावले अडखळत आहेत.